Skip to main content

कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे. समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही .

दापोली इथे अमृते यांचे निसर्ग सहवास एग्रो टुरिस्म रिसोर्ट...

लेखक पुश्कर यांनी रविवार, 26/02/2012 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
दापोली पासून 5km अंतरावर गव्हे या निसर्गरम्य गावात हे ठिकाण आहे.... लाल मातीचे रस्ते , वळणदार घाट व नारळ आणि सुपारी च्या बागा यांनी नटलेले सृष्टीसौंदर्य बघत कोकणात कसे पोहोचलो हे कळलंच नाही.

मुक्तिबंध

लेखक रेशा यांनी रविवार, 26/02/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
मलाही एकदा मृद्क्कण बनून गरारा वार्यावर भरारायचय खूप खूप उंच जाऊन एकदा त्या आभाळाला शिवायचं नात, मुलगी, बहिण, प्रेयसी मैत्रीण सुद्धा नाही बनायचंय हात पसरून खुल्या मनान फक्त मी म्हणून जगायचंय बांधीव उंबरा ओलांडून मला स्वत:ला ओळखायचंय मोकळा मोकळा श्वास घेऊन मनावरल मळभ पुसायचंय तो उंबरा ओलांडताना मन स्थिर ठेवायचंय खोल काही तुटेल आत तरी स्वत:ला सावरायचंय स्वैर करताना संचार जगापासून अलिप्त राहायचंय सारे सारे तुटतील आधार तरी स्वप्नांना जगवायचंय त्या स्वप्नांचा ध्यास घेऊन वेड्यासारख त्यांमागे धावायचंय सारी सारी बंधने झुगारून फक्त एकदाच स्वत:साठी जगायचंय

आवारगी .....

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ये दिल ये पागल दिल मेरा क्यू बुझ गया ...आवारगी !...इस दस्त मै एक शहर था वो क्या हुवा ....आवारगी ! कल जब मुझे बेशक्ल की आवाजने चौका दिया ....मैंने कहा तू कोन हैं ..उसने कहा .....आवारगी !!!!! गुलाम आली ने ही गझल गायली आणि आवारगी प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली . आवारगी याची व्याख्या या ठिकाणी उनाडपणा ...म्हणजे राज कपूर च्या भाषेत " आवारा हु " अशी नाही. आवारगी याचा उर्दूतील खरा अर्थ म्हणजे मनाची संभ्रमित अवस्था. आज राज कपूरच्या नातवाचा म्हणजे रणबीर कपूरचा " रॉकस्टार " सिनेमा मी स्वाती आणि आदित्य तिघंच पाहत होतो. रणबीर ने रंगवलेला जॉर्डन बघत असताना कॉलेज च्या दिवसांची आठवण आली.

भगवी वस्त्रे आणि राजकारणी

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 26/02/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
भगव्या वस्त्राला आपल्याकडे एक वेगळे स्थान आहे. समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे भगवी वस्त्रे परिधान करीत. ज्याने सार्‍या भैतिक सुखांचा त्याग केला आहे अशांनीच भगवे कपडे घालावेत असा काही संकेत असावा. भारतीय राजकारणात वावरणार्‍या काही व्यक्तीदेखील भगवे कपडे वापरताना दिसतात. त्यामुळे जाणून घ्यावेसे वाटते भगवी वस्त्रे घालण्यासाठी काही नियम आहेत का ? कुणा अधिकारी गुरूने दिक्षा द्यावी लागते का ! भगवे कपडे घातल्यानंतर घरादाराचा त्याग करावा लागतो का ? भगवी वस्त्रे घालूनही घरातच राहिल्याने स्वतःवर काही वाइट परिणाम होतो का ?

कविता हवी आहे

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 25/02/2012 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आमच्या बाळाशी खेळताना माझी आई त्याला अनेक छान छान कविता, गाणी म्हणून दाखवते. काल असंच कविता म्हणत बाळाशी खेळताना तिला लहानपणी शाळेत असलेली ग. ह. पाटीलांची "पाखरांची शाळा" ही कविता अर्धवट आठवली. इंटरनेटवर शोध घेतल्यावर इथे त्या कवितेच्या चार ओळी सापडल्या - पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करीती उतरते उन जाते टळूनी दूपार पारावर जसा यांचा भरतो बाजार संपूर्ण कविता मात्र मला सापडली नाही. मिपाकरांकडून ही कविता मिळण्यास नक्की मदत होईल असा विश्वास आहे.