Skip to main content

राम जन्मला गं सखे,राम जन्मला ।

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 01/04/2012 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
तर श्रोतेहो,आज जी राम-जन्म कथा परिचित करवुन देतोय,ती आहे एका वेगळ्या राम जन्माची... पिंपरी/चिंचवड महानगरपालिकेच्या इमारती मागिल P.M.T म्हणजेच परफेक्ट मशिन टूल्स कंपनीमधे हा रामजन्माचा कार्यक्रम(सोहळा नव्हे हो...!सोहळे रामाच्या नावा-वर निघालेली मंडळं करतात,भक्त नव्हे..!) गेली चाळीसएक वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे,त्याची...! ऐकुन तंसं फारसं काही विशेष वाटणार नाही,हो ना..? ''एखाद्या कंपनीत वर्षानुवर्ष एखादी पुजा होते काय..? आणी तीचं खास लिहावं,असं विशेष ते काय..?'' असा प्रश्न माझ्याही मनात आलावता खरा.

तू घे विसावा जरा........!

लेखक रसप यांनी रविवार, 01/04/2012 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ? कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ? जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी घाई ही कसली असे?
काव्यरस

सूडाची ठिणगी - उत्तरार्ध

लेखक योगप्रभू यांनी रविवार, 01/04/2012 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
सम्राज्ञी गांधारीदेवींच्या भेटीला जाताना आपल्या मनातील योजना संशय येऊ न देता कशी मांडायची, यावर भानुमतीने बारकाईने विचार करुन ठेवला होता. राजमाता कुंतीदेवी आणि पांडव स्त्रियांनी आपला अपमान केला, हे गांधारीदेवींना सांगून चालणार नव्हते. तसं सांगितलं असतं तर उलट 'बरी जिरली सुनेची' म्हणून थेरडी मनातून सुखावली असती. त्यातून पांडवस्त्रियांचे एकवेळ ठीक, पण कुंतीदेवींबद्दल उलटसुलट सांगून चालणार नव्हते. सुनांवर दबाव ठेवण्यात या म्हातार्‍या नेहमीच एकमेकींच्या मैत्रिणी असतात.

एप्रिल फूल -

लेखक विदेश यांनी शनिवार, 31/03/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही पान नाही, पाकळी नाही, देठही नाही - अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ; फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते - एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते, मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !

( प्रवास विडंबनाचा....)..

लेखक रामजोशी यांनी शनिवार, 31/03/2012 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
लिहिण्याची लय उसवली असं जाणवताच बोटे सरसावतात विडंबन करायला काही येणारच आडवे त्यांच्या शिवाय मजा ती कसली अपरिहार्य लेखनातील लोणची खायचीच जणू बिघडतेच तेही लेखक मात्र तसाच अखंडित त्याच प्रतिचा येणार जळके शब्दटणकार धनुष्यी कवितेस विडंबनाची भेट घडवून आणण्याची सर्कस आणि झिम्मा फक्त त्याचाच फसवल दोस्तांनी ना की मग सहज जमत अतृप्त रहायला
काव्यरस

सिमोल्लंघनी ट्रेक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 31/03/2012 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदर्शनचे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव २१ मार्च रोजी प्रतिनिधी, मुंबई सुचेता मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित केला आहे.

विडंबन करुक अक्खो दिवस जाय...

लेखक निश यांनी शनिवार, 31/03/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन करुक पडत्याती कष्ट, दुसर्‍यांच्या जीवावर बांडगुळा होती धष्टपुष्ट. विडंबन करुन थकुन जाय चांगली कविता ह्यांच्या डोक्यावरुन जाय. ह्यांका घरात नसा मान विडंबना करुन नवकवीक म्हणतत, ह्यांची कविता असता घाण. घरचो राग कवितेत काढतत नवकवींच्या जीवावर आपलो धंदो चालवतत. चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो. जाउन जाउन हे लोका जाती खय स्वताक झाकायचा सोडुन दुसर्‍यांक उघडो बघुची सवय. ऑफीसातला काम ह्यांका येणा नाय एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय. एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय

डॉ. आनन्दीबाई गोपाळराव जोशी

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 31/03/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३१ मार्च्.. ह्याच दिवशी १८६५ रोजी ह्यान्चा जन्म झाला.. ज्या वेळी स्त्रियान्ना परदेशी एकट्याने, प्रवास करणे तर सोडाच, पण शिकायला पण बन्दी होती...त्या काळात एक स्त्री फक्त शिकतच नाही तर अजुन पुढे शिकायला म्हणुन थेट एकटी अमेरिकेत जाते काय आणि इथल्या स्त्रियान्चे भले व्हावे, त्याना योग्य ते औषधोपचार वेळेवर मिळावेत म्हणुन प्रसुती शास्त्राची डॉ.

प्रवास जीवनाचा...!

लेखक वेणू यांनी शनिवार, 31/03/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्याची लय गवसली, असं जाणवताच सर्वांग सरसावतं ठेका धरायला.... 'पण-परंतू' येणारच आडवे.....! खाच-खळग्यांशिवाय मजा ती कसली? अपरिहार्य प्रवासातलं- ठेचकाळणं, बांधीलच जणू! बिघडतोच ठेकाही! प्रवास मात्र, तसाच अखंडित.. त्याच्याच गतीचा...!! येणार खळगे, विस्कटणार सूरही.. तालास लयीची भेट घडवून आणण्याची कसरत आणि जिम्मा, फक्त आपलाच! जगणं असं स्विकारलं ना की मग सहज जमतं, लयीत ठेचकाळायला.... -बागेश्री (पूर्वप्रकाशित- दीपज्योती दिवाळी अंक २०११ - http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_09.html)