Skip to main content

एका म्यानात दोन तलवारी

लेखक आळश्यांचा राजा यांनी गुरुवार, 26/07/2012 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नऊ वाजता चीफ डिस्ट्रिक्ट मेडीकल ऑफिसर डॉ कर यांचा फोन आला. कलेक्टरांनी उचलला. "गुड मॉर्निंग सर. मला लगेच भेटायचंय, येऊ का?" "गुडमॉर्निंग डॉक्टर. या. काय अर्जंट? " कलेक्टर उत्तरले. "सर मी चाललो तुमच्या जिल्ह्यातून. मी एकही क्षण इथे थांबणार नाही. माझ्यावर काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. " उत्तेजित स्वरात डॉक्टर बोलले. कलेक्टर म्हणाले, "लगेच या डॉक्टर. बोलू आपण." ********* कलेक्टरांना आश्चर्य वाटले. डॉ करांना जिल्ह्यात येऊन चारच महिने झाले होते. आल्यापासून त्यांनी कलेक्टरांना कसलीच तोशीस पडू दिली नव्हती. एनआरएचएमचा कोट्यवधी रुपयांचा व्याप सांभाळणे साधी बाब नव्हती.

पैठणचा ताजमहाल

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/07/2012 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
पैठणचा ताजमहाल ============== पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध.

डॉक्टर डॉक्टर

लेखक आनंद भातखंडे यांनी गुरुवार, 26/07/2012 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी प्रमाणे ऑफिस मधून उशिरा न येता वेळेवरच आलो …. जरा चेंज म्हणून बरं असतं कधी कधी. थोडा घसा पण दुखत होता. तरल पदार्थाव्यतिरिक्त कुठलीही इतर खाद्य वस्तू घश्याखाली उतरताना आतून चिमटे काढत जात आहे असे वाटत होते. कदाचित आत्ताच गावी जाऊन आल्यामुळे तेथील पाण्याचा त्रास झाला असावा. तेथील पाण्या मध्ये घालून काही द्रव पदार्थ घेतला असल्याचे शल्य घशात डसत असेल असा मौलिक निष्कर्ष माझ्या बायकोने काढला होता. बऱ्याच बाबतीत आमचे जसे एकमत होत नाही ते या बाबतीत देखील झाले नाही हे उघड झाले.

आसाममधील वांशिक हिंसाचार

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 26/07/2012 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना बातम्या वाचून सर्वाना कळले असेलच की आसाम मध्ये वांशिक हिंसाचार चालू आहे. गुजरात दंगल १० वर्षानंतर देखील उ:करून काढणार्‍या आपल्या 'जबाबदार' आणि मानवतावादी माध्यमाना याबद्दल बातमी देण्यासही वेळ नाही. बातम्यांमधून असे दिसते की हा हिंसाचार स्थानिक 'बोडो' जमातिचे लोक आणि त्या भागात स्थायिक होणारे मुस्लिम यान्च्यात होत आहे.

हट्ट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी गुरुवार, 26/07/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी | आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे | 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे | म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात | असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार | हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? -चैतन्य दीक्षित
काव्यरस

हिंदू धर्माभिमान्यांसाठी...

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 26/07/2012 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता घेतलेल्या संस्था आणि संघटनानी संस्कृतीच्या स्वच्छतेसाठी काही केलेले दिसत नाही. गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल मी बरेच ऐकले होते पण ते फारच सौम्य होते. ते इतके भयानक आहे हे फकत परदेशी लोकांमुळे कळले. कृपया आमीर खानच्या पुढाकाराची वाट बघू नका अधिक काही लिहीण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कमकुवत मनाच्या लोकांनी ही छायाचित्रे पाहू नयेत. http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-net…

चावडीवरच्या गप्पा - 'टोल'वाटोलवी

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 25/07/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
अरे वा!, सामान्यांची, आम जनतेची काळजी घेणारे आहे कुणीतरी”, खणखणीत आणि अनुनासिक आवाजात बोलत घारूअण्णांनी चावडीवर हजेरी लावली. “काय झाले?”, कोणीतरी विचारले. “काय? आजकाल पेपर वाचायचा सोडून सकाळी सकाळी नातवासाठीच वापरता की काय?” घारूअण्णा एंट्रीलाच नाट लागल्यामुळे खवळले. “अरे त्या राजने, म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेतल्या राजसाहेबांनी टोलवसूली विरूद्ध आवाज उठवला आहे, टोल भरू नका असा आदेश दिला आहे जनतेला”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा आनंदाने फुलून गेला होता. “चला!

राज ठाकरे यांची 'टोळधाड'

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 25/07/2012 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या लिहायला फारसे काही सुचत नाही आहे. पण काहीतरी खरडायचे आहे. काय करावे ? म्हणून आता दिसेल ती नवी बातमी मिपावर चिकटवावी असे ठरवले आहे. कुणाचा वाढदिवस, कुणाचे परीक्षेतील यश, कुणाचे लग्न, कुणाचा जन्म हेही मिपावर चिकटवणार आहोत. याही पलिकडील बातमी असेल तर सोन्याहून पिवळे... टोल बाबत सत्य काय ते जनतेसमोर मांडण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आले की मूळ खर्चापेक्षा काहीपट टोल वसूल होत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र टोल हा गंभीर प्रश्न बनला होता.

(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)

लेखक रमताराम यांनी बुधवार, 25/07/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...) आता पुन्हा उपोषण होणार मग देश ढवळून निघणार मग बेदींना कंठ फुटणार मग मध्येच मोदी बोलणार मग जुनाच खेळ चालू होणार... काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार... मग सारीपाट मांडणार... मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार... मग ते कुणीतरी ओरडणार मग अण्णा-मित्र असतील तर रडणार रामदेव बाबा असतील तर चिडणार मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना काहीच घेण-देणं नसणार... काय रेऽऽ देऽऽवा मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार... मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार... मग त्याला अण्णांनी आप
काव्यरस