Skip to main content

भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?

लेखक सस्नेह यांनी रविवार, 04/08/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं. ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे.

अमृत वाणी

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 04/08/2013 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
संत राज प.पु अनंत स्वामी ,तासगावकर ,यांची अमृत वाणी शारीरिक मिलन क्षणिक सुख देते,मनोमिलन सदैव सुख देते. मन खंबीर असेल तर गंभीर रोग सुद्धा बरा होतो. देवास कधी मंदिराच्या गाभाऱ्यात शोधू नका ,तो मनाच्या गाभाऱ्यात सापडेल निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे ,निसर्गाशी जवळीक साधा मनावर ताबा ठेवण्यास शिका,कोणत्याही संकटास सामोरे जाता येईल . भगवी वस्त्र,. जटा ,भस्म लावून काही होत नाही,मनाची निर्मलता असावी लागते . प्रेमानीच प्रेम मिळते ,रुपया पैशांनी नाही मना पासून जोडलेली नाती कायम असतात,रुपया,पैशांची नाती टिकत नाहीत .

कटरले

लेखक त्रिवेणी यांनी रविवार, 04/08/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक्स, मागच्या आठवड्यातील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्याचा तुम्ही अभिप्राय दिलात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. (आणि परत एक पाकृ ईथे टाकावी असे वाटले.) कटरले ही तशी डोंगरात उगवणारी भाजी आहे आणि माझ्या आवडीची सुद्धा. ithe ithe पण पुण्यात मला ही भाजी क्वचित दिसली, या वर्षीही ईथे पुण्यात शोधली पण नाही मिळाली.

मरण झाले स्वस्त

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 04/08/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
खरे सांगतो मी देवा तेला एक गोष्ट जीवन झाले महाग आणि मरण झाले स्वस्त ॥ धॄ ॥ महागाईचा आलेख किती वर गेला कसे जगावे देवा सांग तुच मला गरीबाच्या दुखाला नाही कुठे अंत..॥१॥ कर्जापाई शेतकरी हवालदिल झाले कितितरी आत्म्हत्या करुनिया मेले देऊनिया जातात अस्वासने फ्क्त...॥२॥ बाँब स्फोट घातपात येथे घडतात निष्पाप लोक त्यात बळी पडतात काही आपल्या घरामध्ये रहातात मस्त...॥३॥ दोन गाड्यांमध्ये जेंव्हा टक्कर होते बघताबघता बस कधी दरीमध्ये जाते पिऊनिया चालवी गाडी नाही त्याल धास्त..॥४॥ पुर आणि भुकंपाने होई नुक्सान रिलीफ फंडामध्ये जमा करतात धन टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...॥५॥ ................बी.डी.वायळ

"केनी" च्या पानांची भजी

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 03/08/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रहो , मिपाचे सदस्य झाल्यापासून पाककृती मधे आमचा हा पहिलाच धागा आहे. तो गोड मानून घ्यावा असे म्हणायची सोय नाही. कारण तो पदार्थ तिखट आहे. आपल्या महाराष्ट्र देशी जास्तीत जास्त साधे सोपे पदार्थ तयार करण्याची महान परंपरा आहे. त्यात भजी नावाचा पदार्थ तर महा लोकप्रिय आहे. कांदा,( यात चकती, गोल, लांब काप असे प्रकार ) बटाटा, वांगे, मिरची, घोसाळे( की घोसावळे), केळे, पालक, चाकवत पाने, मायाळू पाने, ओवा पाने, कोबी ई ई वापरून भजी करतात. ती चवीचवीने खातात. बरोबर पावाची , पुदीन्याच्या चटणीची, लसणीच्या चटणीची साथ घेतात. ( ऐला तोंडाला पाणी सुटायला लागले राव !) .तर असे हे भजी महात्म्य !

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं(९)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 03/08/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158 : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५) http://misalpav.com/node/3583

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.

मोदकेन ताडय

लेखक शरद यांनी शनिवार, 03/08/2013 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक दंतकथा एका राजाची कन्या उपवर झाल्यावर त्या राजाच्या प्रधानाला वाटले की राजकन्येने आपल्या मुलाशी विवाह करावा. पण राजकन्येने ते नाकारले. प्रधान अतिशय भडकला. त्याने सूड उगवावयाचे ठरविले. राजाने त्याला कन्येकरिता वर शोधावयास सांगितले. वरसंशोधनाकरिता हिंडत असतांना त्याला एक अतिशय सुस्वरूप मुलगा एका झाडाच्या फांदीवर बसून बुंध्याकडून ती फांदी तोडतांना दिसला. प्रधानाने त्याला "असे कां करतोस ?" विचारले. तो मुलगा उत्तरला "खाली उतरण्याकरिता". हा महामूर्ख तरुण पाहून प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्याला खाली उतरवून, प्रधानाने त्याला आपल्याबरोबर राजधानीला आणले.

पाऊस एक चिंतन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 03/08/2013 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही.
काव्यरस

रायगड ट्रेक | Fort Raigad Trek

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 02/08/2013 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
तीर्थक्षेत्री जाण्यासाठी योग यावा लागतो म्हणतात. तसंच काहीसं झालं. ट्रेकिंग ची, गड किल्ल्यांची आवड लागून दोन वर्ष झाली परंतु दुर्गदुर्गेश्वर रायगड ला जाणं झालं नव्हतं. खरं तर जून मधलाच हा प्लॅन होता. पण एक नाही दोन वेळा पुनर्नियोजित झाला होता. शेवटी तो योग आला. रायगडास जाणे झाले, शिवतीर्थाची भेट झाली. a रायगड ट्रेक योजला. तिघांची टीम जमली. आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला, पण आमचा शाळेपासूनचा मित्र असलेला, आणि आमच्या तिघांपैकी खरंच 'शिवभक्त' असलेला अनिकेत.