Skip to main content

स्मरणीय " संध्या" - एका कट्ट्याची कहाणी

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 19/12/2013 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आपण सारे मुख्यत" दोन गोष्टीसाठी येतो .व्यक्त होण्यासाठी व व्यक्त झालेल्याना प्रतिसाद देण्यासाठी. प्रिट मिडीयाचे मालक, संपादक निरनिराळ्या ईझम्सचे रंग फासून वावरत असतात. सुदैवाने मिपा सारखे माध्यम असा कोणताही एकच रंग घेऊन वावरत नाही. मिपा हे व्यक्तीगत आयुष्यातली कसे भिनत जाते याचे प्रत्यंतर आम्हा काहीना येणार होते. १७ डिसेंबर २०१३ ची संध्याकाळ काही पुणेकरांसाठी एक अचानक जमलेला कट्टा या स्वरूपात अवतरली. अत्यंत अल्प काळात आपल्या दर्जेदार लेखनाने मिपाप्रिय ठरलेले श्री इस्पिक एक्का हे पुण्यात आले आहेत असे ब्याटम्यान याना कळले.

निष्पक्षपाती, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी वगैरे

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 19/12/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज बाजारात असलेली बहुतांश वृत्तपत्रे स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणवून घेतात. अर्थात त्यांना कोणत्या पक्षाचा कैवार आहे हे काही लपून राहत नाही. परंतु सामना प्रमाणे आपण मुखपत्र आहोत असे जाहीरपणे मान्य करण्याची कोणाची इच्छा असत नाही. सध्या भारतात चालू असणार्‍या नाट्यपूर्ण (?) घडामोडींमुळे या सर्व वृत्तपत्रांची विचित्र कोंडी झालेली दिसून येते. आपल्या पक्षाचा कैवार घ्यावा तर मग आपण बहुतांश असणार्‍या वाचकवर्गापासून दूर जातो, म्हणजे ते लोक आपले वृत्तपत्र वाचणे बंग करणार, म्हण्जे प्रत्यक्ष फटका आपल्या विचारसरणीच्या पक्षाला बसणार.

संशयास्पदरीत्या चहा प्यायल्याबद्दल अटक...............

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/12/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुर पोलीसानी एका ४९ वयीन इसमास संशयास्पद रीत्या चहा पिण्याअबद्दल अटक केली. त्याबद्दल न्यायालयाने त्याना फटकारले आनि संशयास्पदरीत्या चहा कसा पितात ते दाखवुन द्या असेही सांगितले. मटा मधील बातमीचा भाग कॉपी करतोय
" संशयास्पदरित्या चहाचे घुटके घेतल्याचे कारण देत ४९ वर्षीय इसमाला अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. 'चहा कसा प्यावा याबद्दल कोणताही कायदा काहीही सांगत नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची वेगळी स्टाईल असू शकते.

येसर आमटी

लेखक मितान यांनी बुधवार, 18/12/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून ही पाककृती लिहायची राहून गेली होती. मागे महालक्ष्म्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या येसर आमटीची ही पाकृ. मराठवाड्यातली पारंपारिक आमटी. बर्‍याच लग्न कार्यात पाहुण्यांना जाताना शिदोरी म्हणून मसाला नि मेतकूट देतात. मराठवाड्यात येसर नि मेतकूट देतात. खूप भाज्यांची रेलचेल मराठवाड्यातल्या जेवणात अजूनही नसते. ग्रामीण भागात तर असेल ती पालेभाजी, घट्ट वरण आणि भाकरी हे जेवणच कॉमन आहे. अशा भागात चवबदल, चमचमीत झणझणीत काही खायचं असेल तर येसर करतात. लग्नकार्यात घरी पाहुण्यांची खूप गर्दी असे. आठ आठ दिवस आधी नि नंतर वर्‍हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत.

लेखकु

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 18/12/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कविता माझी वाच, कथा माझी वाच लेख नक्की वाच, लेखकु म्हणे आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि आव पिडीताचा, सात्विक संतापाचा वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट इतरांची लावू वाट, दिसता क्षणी ओलावले डोळे, भारावले मन शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद वर आणण्याचा नाद, लेखनाला इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान काढी फेसबुकी पान, स्वत:चे नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा || --------------------------

'योगायोग'

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 18/12/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
' योगायोग ' योगायोग By डॉ.सुनील अहिरराव मी' त्याला पहिल्यांदा भेटलो ते डॉ. प्रशांत च्या क्लिनिकमध्ये. बाहेर दोन चार पेशंटस् आणि तो केबिनमध्ये खुर्चीत बसलेला. एक गुडघा टेबलाच्या कोपऱ्याला टेकवून . हातात वर्तमानपत्र. खूप एकाग्रतेने काही वाचत असावा. चेहऱ्यावर एक गूढ गंभीर भाव. नजर वर्तमानपत्राच्या पानांवर , पण कदाचित त्या पलीकडे जाणारी.. त्याला डिस्टर्ब करावसं वाटेना. पण आत गेलो तरी त्याला माझ्या अस्तित्वाची जणू जाणीवच नव्हती. "नमस्ते डॉक्टर " त्याने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिले. कदाचित पूर्वीच्या कसल्यातरी गूढात तो अजून बुडालेला. कदाचित त्याला टोकलेले आवडले नसावे.

२०१४-निवडणुकांची रणधुमाळी

लेखक सचीन यांनी बुधवार, 18/12/2013 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.

पुढच्यासाठी

लेखक अमेय६३७७ यांनी बुधवार, 18/12/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
कुणास ठाउक बाग कुणाची कुणी शिंपली हिरवी झाडे तारुण्याचे मोल, कुणाच्या हाडांची अन झाली काडे हिरवळ दिसते, पानोपानी मंजुळ किलबिल मंद स्वरांची जागोजागी खूण सापडे चराचरातिल अद्वैताची विश्वाचा हा जरी कोपरा कोप-यातले विश्व सुखाचे भय- क्रोधाला इथे न थारा इथे न वाढे तण्य फुकाचे आनंदाने भोग दान हे घाल तशी भर अपुली काही किंवा केवळ पाही इतुके कीड- वाळवी लागत नाही ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे -- अमेय

घनन-घन घनगड

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 18/12/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला. भूषण मुंबई वरून पहाटे चारची गाडी पकडून पुण्यात ९ वाजता हजर.

<<<<<त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार>>>>

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 18/12/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चाललेल्या वैचारिक धुळवडीनिमित्त आणखी एका त्रिगुणात्मक तत्वाचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी तीन आरत्यांचा नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या तिन्ही रंगाच्या अंशावताराची हि दुनिया.