Skip to main content

हजार चुराशीर मा – महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 12/01/2014 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय? ते पटत असल्यास त्याचा आस्वाद जास्त चांगल्या तर्‍हेने घेता येईल काय? हा प्रश्न मला सुरुवातीला “हाजार चुराशीर मा” पुस्तक वाचण्याआधी पडला होता. मात्र महाश्वेतादेवींचे हे पुस्तक हाती पडल्यावर हे सारे प्रश्न विरुन गेले आणि एक अतिशय सुंदर पुस्तक वाचल्याची अनुभुती मिळाली. मला मिळालेले पुस्तक अनुवादीत होते मात्र त्याने फार काही फरक पडला असे वाटले नाही. अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकर यांचा प्रत्यक्ष परिचय असल्याने आणि त्यांचा बंगाली भाषेचा प्रदीर्घ व्यासंग माहित असल्याने अनुवाद उत्तम असणारच याची खात्री होती.

आय ए एस आणि शेतकरी

लेखक Rahul Bhuskute यांनी रविवार, 12/01/2014 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओळखीचे एक व्यक्ती सतत म्हणायचे की आजकालचे आय ए एस ऑफिसर हे सगळॅ कॉन्व्हेन्ट मधले आहेत आणि त्यान्चा सामान्य माणसाच्या जीवनाशी / शेतकर्यान्च्या जिव्हाळ्याच्या प्रश्नान्शी काहीही सम्बन्ध न आल्याने सगळी नोकरशाही व किम्बहुना राज्यव्यवस्था कुचकामी व कागदी बाहुली ठरते ... हे मला बर्याच अन्शी पटले . खरोखर एखादा शेतकर्याचा मुलगा आय ए एस झाला , किम्वा आय ए एस परीक्षे मध्ये येणारे प्रश्न शेती/शेतकरी व त्यान्च्या समस्या या सन्दर्भात असले , तर परिस्थितीत काही फरक पडू शकेल का?

गॉड पार्टीकल्स, समर्थ रामदास आणि गुगल ग्लास

लेखक आयुर्हित यांनी रविवार, 12/01/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
दृश्य १: कुठे आहे तुझा तो देव/जगदीश्वर? जर तो सर्वत्र आहे तर मला ह्या खांबात का दिसत नाही? असे म्हणत ज्यावेळेला हिरण्यकश्यपुने(भक्त प्रल्हाद च्या वडिलांनी) खांबावर गदेने वार केला व खरोखर त्यातून भगवान "नृसिंह अवतारात" प्रगट झाले. पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. संदर्भ :श्रीमद भागवत कथा काय भक्त प्रल्हाद एक शास्त्रज्ञ होता गॉड पार्टीकल्स शोधणारा?

वाफाळलेली कटींग चहा .. !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 12/01/2014 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्‍याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते.

एक सुखाचा रविवार

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 12/01/2014 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्‍यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात.

एकच व्यायाम सर्वांगाचं काम - बर्पी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 12/01/2014 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
२० मिनिटात होणारा सर्किट ट्रेनिंगचा व्यायाम बरीच जणं करतायत असं कळलं :) तर, त्या २० मिनिटाच्या व्यायामाचं जे प्रिन्सिपल म्हणजे तत्व होतं, की वेळ कमी, आणि त्यात व्यायाम जास्त प्रभावी; तेच तत्व साधणारा आणखी एक व्यायामप्रकार तुम्हाला सांगावा म्हणतो. असंच `हे वाच ते वाच' करताना मला कळलेल्यांपैकी ही एक गोष्ट. या व्यायामाचं नाव, `बर्पी'. हा व्यायामाचा प्रकार नाही; तर एरोबिक प्रकारात आणि काहीसा प्लायोमेट्रिक प्रकारात मोडणारा एक व्यायाम आहे. पण हा व्यायाम सॉलिडा प्रभावी आहे.

प्रीत खुळी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 12/01/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचीत कशी कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी मेघ दाटल्या नभओळी अंगणी सणाची रांगोळी वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी ……………………… अज्ञात
काव्यरस

गुलाबाचे फळ

लेखक रम्या यांनी रविवार, 12/01/2014 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात. काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही!

अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 12/01/2014 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक : headphone वर गाणे ऐकत बसलो होतो . बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? " "आतिफ अस्लम ." त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही . "तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत .

संबंध

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 11/01/2014 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख मी खालील लिखाणाला पुरवणी म्हणून काढत आहे. श्री खटासी खट यांनी काढलेला धागा http://www.misalpav.com/node/26446. यात माझे स्वतःचे काही अनुभव मला विशद करायचे आहेत. मुळात स्त्री पुरुष संबंध (केवळ शरीर संबंध नव्हे) या बद्दल मला फार कुतूहल आहे. माझे लग्न होऊन २१ वर्षे झाली आहेत आणि ते बर्‍यापैकी सफल आहे असे मला वाटते. वैद्यकीय शास्त्र शिकून त्याबद्दल थोडीफार शास्त्रीय माहिती मिळाली तरीहि बहुसंख्य गोष्टींबद्दल अजूनही खूप कुतूहल बाकी आहे.