दृश्य १:
कुठे आहे तुझा तो देव/जगदीश्वर? जर तो सर्वत्र आहे तर मला ह्या खांबात का दिसत नाही? असे म्हणत ज्यावेळेला हिरण्यकश्यपुने(भक्त प्रल्हाद च्या वडिलांनी) खांबावर गदेने वार केला व खरोखर त्यातून भगवान "नृसिंह अवतारात" प्रगट झाले. पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. संदर्भ :श्रीमद भागवत कथा
काय भक्त प्रल्हाद एक शास्त्रज्ञ होता गॉड पार्टीकल्स शोधणारा? कि हिरण्यकश्यपु?
ही निव्वळ साहित्यकथा समजायची कि काही गूढ लपले आहे त्यात?
"नृसिंहपुराण" यात काही मुलतत्वे सापडतील का?
दृश्य २:
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ॥
नमू शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥
दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें| बरें पाहतां गूज तेथेचि आहे| करीं घेउं जातां कदा आडळेना| जनीं सर्व कोंदाटले तें कळेना ॥ श्लोकार्थ: या दृष्य सृष्टीत जे सहज दिसत नाही त्याचा सूक्ष्म विचाराने शोध घ्यावा. शुध्द विचाराने नीट पाहिले की त्याचे गूढरहस्य तेथेच दडलेले आढळेल. मात्र ते हातात प्रत्यक्ष घेता येणार नाही. कारण ते इंद्रियांना कदापि जाणवत नाही. वस्तूमात्रात ते ओतप्रोत भरलेले असूनही सहजासहजी कळून येत नाही. जे जगतात चर्मचक्षूंना दिसत नाही त्या ब्रह्माचाच शोध घेऊन अनुभव पाहावा.
हा उपदेश वरवर पाहिल्यास चमत्कारिक वाटेल. पण विचारांती हाच योग्य ठरेल. जे बाहेर दिसते तेच पाहण्याची दृष्टीला सवय असते. पण पुष्कळ ठिकाणी महत्त्वाची वस्तू अंतरात गुप्त असते. नारळातील खोबरे बाहेर दिसत नाही, आत असते. नरोटी फेकून तेच घ्यावे लागते. असेच परमार्थात आहे.
समर्थ म्हणतात, ‘प्रगट तें जाणावें असार| आणि गुप्त तें जाणावें सार| गुरुमुखें हा विचार| उमजो लागें॥ (दासबोध)ब्रह्म हे चर्मचक्षूनें दिसत नसले तरी अनेक सज्जनांनी ज्ञानचक्षूने ते अनुभविले असून त्यासंबंधी सर्वांची एकवाक्यता आहे. मग ते डोळ्याला दिसत नसले तरी नाही असे कसे म्हणता येईल? म्हणून त्या संत आनंताचा शोध घेण्याचे कष्ट घेतले पाहिजेत कारण त्यापासून बुध्दिग्राह्य अशा आत्यंतिक शाश्वत सुखाचा लाभ आहे.
चंद्रावर वास्तव्य, अणुसंशोधन या क्षणिक सुखाच्या गोष्टी विज्ञानांत स्तुत्य, प्रगतीच्या व मानवी ज्ञानाच्या द्योतक ठरतात, तर चंद्रालाही जी तेज पुरविते व अणूलाही जी वस्तू आधार आहे ती वस्तू आपण स्वत: असल्याचा अनुभव घेणे हा मानवाचा महापुरुषार्थ नव्हे का? सृष्टीयंत्रात कोणतीही गडबड न माजविता सस्वरुपाची ओळख पटवून घेणे यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. एखाद्या सृष्ट पदार्थाचे ज्ञान असावयाचे पण आपण स्वत: कोण याचे ज्ञान नसावयाचे हा आत्मघातच. म्हणून न दिसणार्याण ब्रह्माचाच शोध घे, असे समर्थ म्हणतात. ज्ञानाने बुध्दीवरील अज्ञानाचे आवरण दूर झाले की स्वयंप्रकाश आत्मा आहेच.
चर्मचक्षूने न दिसणारी वस्तू ज्ञानचक्षूने शोधिली पाहिजे. अशा बर्या> रीतीने पाहत गेल्यास ब्रह्म हे सर्वत्र अगदी जवळ असून जणू काय गुप्त असल्याचे आढळून येईल. डोळ्यासमोर डोळ्यात असूनही त्यांना न दिसणारी अशी ही अजब वस्तू आहे. सर्व ठिकाणी भरलेली असूनही एखाद्या पदार्थाप्रमाणे हातावर देण्यासारखी ही वस्तू नाही. समर्थ सांगतात, करी घेतां नये टाकितां न जाये| ऐसें रुप आहे राघवाचें॥ राघवाचें रुप पाहातां न दिसे| डोळां भरलेसे सर्व काळ॥
स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे| कांही येकासारिखे नव्हे| ज्ञानदृष्टीवीण नव्हे| समाधान॥ (दासबोध)
परब्रह्माचा सुगावा लागेल व त्याच्याशी तादात्म्य होईल अशी ज्ञानदृष्टी सज्जन देऊ शकतात. त्यांच्याकडून होणार्याे महावाक्योपदेशाने ही ज्ञानदृष्टी प्राप्त होते. असे सुद्गुरुकडून ज्ञान झाल्याशिवाय जन्ममरणांतून सुटका नाही.
पदार्थापलिकडे चिरंतन अशी ही वस्तू आहे व तेच आपले स्वरुप आहे, हे कळून येते. ब्रह्म हा कांही एखादा पदार्थ नाही की जो चटकन हातात देता येईल. तो एक अनुभव आहे व तो ज्याचा त्यानेच घेतला पाहिजे. पण हा अनुभव कसा घ्यावा याचा संकेत म्हणजे निश्चअय हा सद्गुरूंकडूनच होतो.
समर्थ सांगतात,पदार्थाऐसे ब्रह्म नव्हे| मा तें हाती धरून द्यावें| असो हे अनुभवावें| सद्गुरूमुखें॥ (दासबोध) हा निश्चहय खुणेने कसा होतो हे समजण्यासाठी शाखाचंद्रन्यायाचा दृष्टांत समर्थांनी दिला आहे. अगदी सूक्ष्म कोर असलेला शुद्ध द्वितीयेचा चंद्र दिसत नाही. तो ज्याने पाहिलेला असतो तो न पाहिलेल्यास झाडाच्या विवक्षित फांदीची खूण दाखवून त्या दिशेने पाहावयास सांगतो, त्या खुणेच्या दिशेने पाहिले की चंद्रकोर दिसते. चंद्रदर्शनानंतर तो खुणेची फांदी सोडून देतो व चंद्रच पाहात राहतो. असेच सज्जनांच्या विवेचन श्रवणाने घडते. परब्रह्म हा चंद्र, महावाक्य ही फांदी, मुमुक्षु हा चंद्र पाहण्याची इच्छा करणारा व सज्जन सद्गुरू हे ज्याने आधीच चंद्र पाहिलेला असतो तो. हे श्लो्काचे विवरण झाले. येथे तत्त्वे पंचीकरण बरोबरच महावाक्याचे स्वरुप काय हे ठाऊक असणे जरुरीचे. कारण आत्मज्ञानासाठी महावाक्य उपदेश महत्त्वाचा विषय असून त्याचे विवरण हे मुख्य ज्ञान आहे, असे समर्थ म्हणतात.
महावाक्याचे विवरण| हे मुख्य ज्ञानाचे लक्षण| शुद्ध लक्ष्यांशे आपण| वस्तूच आहे॥ (दासबोध)
हे मुख्य ज्ञानदान ब्रह्मनिष्ठ, अनुभवी अशा सद्गुरूकडूनच व्हावयास हवे. चार वेदांची प्रत्येकी एक अशी चार महावाक्ये आहेत. ऋग्वेद – प्रज्ञानं ब्रह्म॥ यजुर्वेद – अहं ब्रह्मास्मि॥ सामवेद – तत्त्वमसि॥ अथर्ववेद – अयमात्मा ब्रह्म॥ चारीही महावाक्ये ब्रह्मात्मैक्य म्हणजेच जीव हा ब्रह्मस्वरूपच असा बोध करितात. महावाक्यरूप शाखेवरून संत हे ब्रह्मचंद्राची दिशा दाखवितात. परंतु मनन व अभ्यास या दोन डोळ्यांनी मुमुक्षूनेच याचा प्रत्यय घेतला पाहिजे असा या श्लोाकाचा भावार्थ आहे.
यावरून जीव =ब्रम्ह म्हणजेच गॉड पार्टीकल्स तर नाहीत ना? अशी दाट शंका येते.
तदृश्य ३:
जयपूरमधे पायाची शस्त्रक्रिया सुरु आहे,जे अमेरिकास्थित भारतीय डॉक्टर पारेख करत आहेत आणि जगभरात हि दृश्ये आंतर्जालावर LIVE बघितली जाऊ शकतात. हा नवा शोध जगासमोर आला तो म्हणजे गुगल ग्लास ह्याच्या सहाय्याने डॉक्टर शस्त्रक्रिया करत असतांना नजर न हटवता आपल्या चर्मचक्षुंच्या सहाय्याने रुग्णाचे क्ष किरण/ MRI scan बघू शकतो व फोटो व वीडीओ देखील काढू शकतो व ही दृश्ये आंतर्जालावर पाठवली जाऊन दुसऱ्या ठीकाणी असलेल्या डॉक्टरांची मदत हि instantly घेऊ शकतो.
आजच्या या जगात जो पर्यंत सद्गुरू भेटत नाही तो पर्यंत चर्मचक्षुंवरच आपली श्रद्धा/विश्वास ठेवत असतो, यात काही गैर नाही.
कळावे, लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत
ता.क. संपादक मंडळाने सांगितल्याप्रमाणे हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता खास राखून ठेवले आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो.येथे होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!
बुद्धीवादी चर्चा करणाऱ्यांनीच ह्यात प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती.
वाचने
21824
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओहो!
स्वरूपानुसंधान
छान मांडणी.
लेख आवडला.
अंतिम पंक्ती/tag lines खूप छान आहेत
लेख तीनदा टाईप झालाय का ?
यावरून जीव =ब्रम्ह म्हणजेच
"गॉड पार्टीकल" याचे मुळचे नाव सोमाजी गोमाजी कापसे मूलकण
In reply to यावरून जीव =ब्रम्ह म्हणजेच by काळा पहाड
ह्या संकल्पनेवर बऱ्याच
In reply to "गॉड पार्टीकल" याचे मुळचे नाव सोमाजी गोमाजी कापसे मूलकण by आयुर्हित
उत्तम
In reply to "गॉड पार्टीकल" याचे मुळचे नाव सोमाजी गोमाजी कापसे मूलकण by आयुर्हित
तीनही दृश्यांचा एकमेकांशी
धन्यवाद!
ह्म्म...
ब्याक टू स्क्वेअर वन !
>>>परब्रह्माच्या ठिकाणी कसलेच
In reply to ब्याक टू स्क्वेअर वन ! by आयुर्हित
प्यारे१/विटेकर काका
In reply to >>>परब्रह्माच्या ठिकाणी कसलेच by प्यारे१
>>कारण माया ही परब्रह्मातूनच
In reply to ब्याक टू स्क्वेअर वन ! by आयुर्हित
कशी?
In reply to >>कारण माया ही परब्रह्मातूनच by मारकुटे
ज्याप्रमाणे आकाश शांत असताना
In reply to कशी? by धन्या
आकाश का अवकाश?
In reply to ज्याप्रमाणे आकाश शांत असताना by प्यारे१
आधी च्या वाक्यात आकाश
In reply to आकाश का अवकाश? by प्रचेतस
ओके
In reply to आधी च्या वाक्यात आकाश by प्यारे१
>>>परब्रह्मामध्ये हालचाल झाली
In reply to ज्याप्रमाणे आकाश शांत असताना by प्यारे१
पळवाट म्हणताय? म्हणा.
In reply to >>>परब्रह्मामध्ये हालचाल झाली by मारकुटे
१.ओके
In reply to पळवाट म्हणताय? म्हणा. by प्यारे१
माहीत नाही
In reply to >>>परब्रह्मामध्ये हालचाल झाली by मारकुटे
ही हालचाल किंवा काय जे असेल ते का झाले?याचे प्लेन उत्तर " माहीत नाही " हेच आहे !! ही त्या परमात्म्याची लीला आहे . आपण एकाचे बहु व्हावे असे त्याला/ तिला का वाटले ? माहीत नाही! ? When Swami Vivekananda had gone to Europe, in one of his lectures, one question was put to him: why had God created this world? Swamy Vivekanand answered, the Indian philosophers have given the boldest answer to this question, we don't know,. It is Leela."एकोहं बहुस्याम" आणि कर्माचा
In reply to माहीत नाही by विटेकर
ह्म्म....
In reply to ज्याप्रमाणे आकाश शांत असताना by प्यारे१
विटेकरांशी प्रचंड सहमत!!!!!
In reply to ह्म्म.... by विटेकर
प्रश्न :
In reply to ह्म्म.... by विटेकर
निव्वळ वाद विवादात कापाकापी
In reply to प्रश्न : by प्यारे१
गोड बोला हो .. आज संक्रांत आहे ना ?
In reply to प्रश्न : by प्यारे१
>>> साधन - नरदेह आणि सदगुरु
In reply to गोड बोला हो .. आज संक्रांत आहे ना ? by विटेकर
सुंदर प्रतिसाद !!!
In reply to ह्म्म.... by विटेकर
हे सगळं कसं झालं हे समजून
In reply to ज्याप्रमाणे आकाश शांत असताना by प्यारे१
ओके!
In reply to हे सगळं कसं झालं हे समजून by बॅटमॅन
ज्याप्रमाणे आकाश शांत असताना
In reply to ज्याप्रमाणे आकाश शांत असताना by प्यारे१
अरे धनोत्तम, असं काय करतोस,
In reply to ज्याप्रमाणे आकाश शांत असताना by धन्या
वा !
In reply to अरे धनोत्तम, असं काय करतोस, by बॅटमॅन
तात्या, किती अगरबत्त्या
In reply to अरे धनोत्तम, असं काय करतोस, by बॅटमॅन
अहो बक्कळ विकल्या गेल्या की.
In reply to तात्या, किती अगरबत्त्या by गवि
गप की मेल्या...!!!
In reply to अरे धनोत्तम, असं काय करतोस, by बॅटमॅन
का ओ आज्जी उगा नातवांना गप्प
In reply to गप की मेल्या...!!! by पिलीयन रायडर
वर एवढी गंभीर चर्चा चालु आहे.
In reply to का ओ आज्जी उगा नातवांना गप्प by बॅटमॅन
मी हसुन हसुन मेले ना..
In reply to वर एवढी गंभीर चर्चा चालु आहे. by पिलीयन रायडर
टैम्प्लीज!
In reply to मी हसुन हसुन मेले ना.. by बॅटमॅन
१. अरेरे!
In reply to टैम्प्लीज! by पैसा
भयानक प्रतिसाद!
In reply to अरे धनोत्तम, असं काय करतोस, by बॅटमॅन
एक नंबर,अगदी चित्र डोळ्यासमोर
In reply to अरे धनोत्तम, असं काय करतोस, by बॅटमॅन
धन्या श्री !
In reply to ज्याप्रमाणे आकाश शांत असताना by धन्या
"भेदाभेद अमंगल"
In reply to धन्या श्री ! by विटेकर
जाऊ दया, मरु दया...
In reply to धन्या श्री ! by विटेकर
दासबोध.
In reply to जाऊ दया, मरु दया... by धन्या
धनाजीराव
In reply to जाऊ दया, मरु दया... by धन्या
आमच्या माहितीप्रमाणे
In reply to धनाजीराव by अनिरुद्ध प
हा हा.
In reply to आमच्या माहितीप्रमाणे by बॅटमॅन
हो हो
In reply to आमच्या माहितीप्रमाणे by बॅटमॅन
ही ही
In reply to हो हो by अनिरुद्ध प
विटेकर काका
In reply to ही ही by विटेकर
ते तर स्वता धनाजीरावानी धागा
In reply to हो हो by अनिरुद्ध प
कशीबशी!!
In reply to >>कारण माया ही परब्रह्मातूनच by मारकुटे
ऑ नो.
का हो अर्धवट राव
उत्तर दिलय तर..
In reply to का हो अर्धवट राव by विटेकर
प्रश्न
वा वा
In reply to प्रश्न by विटेकर
>>>सत्यसंकल्पात
In reply to वा वा by अर्धवटराव
आपणास लेखाच्या टायट्ल मधे गुगल आणलेले भावते काय ?
ओढवून घेतलेले लाडकेपण
मला असले धागे आवडत नाहीत
उगी उगी
In reply to मला असले धागे आवडत नाहीत by प्रसाद गोडबोले
वितेकरनचे सगळे प्रतिसाद आवडले
खत्त्तरनाक लेख.