Skip to main content

मामाचे गाव - तात्या (३)

लेखक दशानन यांनी शनिवार, 20/09/2014 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग मळ्यामध्ये कच्चा रस्त्याच्या एकाबाजूला मावशीचे घर होते व मागे दूरवर पसरलेले शेतच शेत. त्यामध्ये गावातील अनेक लोकांच्या शेताबरोबर मामाचे शेत देखील दूरवर दिसत असे. त्याची ओळख पटवणारी ओळखीची खुण म्हणजे त्याच्या बांधावर उभी असलेली नारळीची ८-१० झाडे आणि शेताच्या मध्यभागी असलेले आंब्याचे भले मोठे झाड. मावशीच्या घराच्या मागच्या बाजूला लागूनच भला मोठा जमिनीचा तुकडा मावशीचा होता, त्यात तात्याने केळीची बाग, डाळिंब्याची झाडे, पापी आणि रोज लागणाऱ्या हिरव्या मिरच्या पासून कोथिंबीरीपर्यंत अनेक वेगवेगळी झाड लावलेली होती.

फुले शाहु आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र .....???????

लेखक अतुल झोड यांनी शनिवार, 20/09/2014 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ साठी आज पासुन अर्ज भरणे सुरु झाले ...परंतु अद्याप पर्यन्त आघाड्या तयार झालेल्या नाहीत....किंबहुना तयार असुन सुध्दा घोषीत केल्या नसेल......कारन पितृपक्ष सुरु आहे.......... उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का?....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय?

जीवन - सार

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/09/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का? रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती. तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा.

देर न हो जाये

लेखक भावना कल्लोळ यांनी शनिवार, 20/09/2014 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी. स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल. वेळ : सकाळची . संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग. नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे. अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.

शिकार

लेखक कल्पतरू यांनी शनिवार, 20/09/2014 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा.

भोलेबाबा अमरनाथ दर्शन २००१

लेखक खुशि यांनी शनिवार, 20/09/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी अमरनाथसाठी निघालो, श्रीनगर शहरात रस्त्यावर मोठमोठे चिनारचे व्रुक्ष आहेत.रस्त्याच्या मधोमध असले तरी रस्ता रुंदीकरणासाठी त्यांची कत्तल केलेली नाही तर जागोजाग रस्त्यालाच वळण दिलेले आहे.गन्दरबल येथे माताश्री खिरभवानीच्या दर्शनासाठी गेलो.निसर्गरम्य ठिकाण आहे.छोटीसी स्वच्छ वाहत्या पाण्याची नदी आहे घाट आहे,सरोवरात खिरभवानी मातेचे छोटेसे मन्दीर आहे.५१शक्तिपीठा पैकी एक आहे.येथे साबुदाण्याच्या खिरीचा प्रसाद मिळतो.प्रसादालयाच्या जवळ एका ठिकाणी उभे राहुन वर आकाशाकडे पाहिले असता झाडांच्या फांद्यांमधुन भारताचा नकाशा दिसतो.घनदाट व्रुक्षराजी आहे.भरपुर कावळे आहेत पण ते पिवळ्या चोचीचे आणि गोड आवाजाचे आहेत

हापिस-हापिस

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 20/09/2014 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून) ‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’ ‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’ ‘ते का ?’ ‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात... ...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात. ....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’ ‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’ ‘हम्म..

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 20/09/2014 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्‍यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.

भोले बाबा अमरनाथ दर्शन २००१

लेखक खुशि यांनी शुक्रवार, 19/09/2014 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा मित्र श्री.गिरीश वडनेरकर १९९६ पासुन दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातो बरोबर काही लोकानाही नेतो{ना नफा ना तोटा या तत्वावर} हे माहित होते,गेल्यावर्षी शेजारचे रावेरकर जाऊन आल्यावर त्यानी केलेले सुंदर काश्मीरचे वर्णन ऐकून आम्हाला कधी आपणही जाऊ असे झाले होते आणि यावर्षी भोलेबाबानी आम्हाला बोलावले. मंगळवार ३जुलै २००१ संध्याकाळी ७-१५च्या सेवाग्राम एक्सप्रेसने प्रस्थान ठेवले.मनमाडस्टेशनवर सर्वसहयात्रीशी ओळखदेख झाली.रात्री ११-३०च्या झेलमएक्सप्रेसने जम्मूसाठी प्रयाण केले.

आयुष्य म्हणजे....

लेखक चेतन677 यांनी शुक्रवार, 19/09/2014 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
"आयुष्य म्हणजे काय असते, आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष... जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा, आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात, काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात, काहीजण शेवटपर्यंत साथ देतात... आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते, तर त्या प्रवासात असते...... तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही, पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."