छावणी - ८
छावणीच्या फाटकाच्या दिशेने आलेल्या घोषणा ऐकून सर्वजण काय समजायचे ते समजून चुकले.
हल्ला!
सर्वत्र धावाधाव पळापळ सुरु झाली. छावणीवर असा अचानक हल्ला होईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. गुजरानवाला इथून निघाल्यापासून आतापर्यंतची वाटचाल निर्विघ्नपणे पार पडली होती, त्यामुळे सर्वजण काहीसे गाफील राहीले होते. अर्थात आतापर्यंत हल्ला झाला नाही म्हणजे पुढे होणारच नाही याची काही खात्री देता आली नसतीच. हा विचार ध्यानात घेऊन आपण सावध असायला हवं होतं असं प्रत्येकाला वाटून गेलं. पण आता असं वाटून उपयोग नव्हता!
आणि सावध असून तरी करणार काय हा यक्षप्रश्न होताच!
मिसळपाव