Skip to main content

अंधार क्षण भाग ४ - तात्याना नानियेव्हा (लेख १८)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 11/12/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - तात्याना नानियेव्हा एका क्षणात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, होत्याचं नव्हतं होऊ शकतं. तात्याना नानियेव्हाच्या आयुष्यात तो क्षण २६ आॅक्टोबर १९४२ या दिवशी आला. सोविएत रशिया आणि नाझी जर्मनी यांचं युद्ध सुरू होऊन एव्हाना एक वर्षाहून जास्त काळ होऊन गेला होता. ती युक्रेनमध्ये सोविएत सैन्याच्या इस्पितळात नर्स म्हणून काम करत होती. त्या दिवशीही ती कामात होती. अचानक तिने एक थरकाप उडवणारा खडखडाट ऐकला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि जेव्हा तिने हिंमत करुन खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा समोरचं पूर्ण क्षितिज रणगाड्यांनी व्यापलं आहे हे तिच्या लक्षात आलं.

पूर्वेच्या समुद्रात-३

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 10/12/2014 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा कारवारच्या आसपास नुसते इकडून तिकडे भटकणे झाल्यावर कोची च्या दिशेने कूच केले. तालसेरी (जुने नाव तेल्लीचेरी) च्या आसपास ( मंगळूरू च्या दक्षिणेस) परत काही रडारवर तपास लागला म्हणून पहाटे आमचा मोर्चा तिकडे वळविला गेला. तेंव्हा तेथे दोन मच्छीमार नौका दिसल्या. हे सर्व वीर श्रीलंकेतून येथे आले होते. तेंव्हा त्यांना ताबडतोब थांबण्याचा इशारा दिला गेला. सवयीप्रमाणे त्यांनी पळायला सुरुवात केली. आमच्या नौकेने त्यांच्यावर मशीनगन ने थोड्या गोळ्या डागल्या तरी ते दाद देईनात.

बस्स इतकेच..

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/12/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले बस्स इतकेच.. ---- परवा अलमारी उचकतांना तुझे एक पैंजण हाताला लागले छन्न झालं एकदम आपल्या जोडीदाराअभावी एकाकी,केविलवाणे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला 'त्या' तस्बिरीतले तुझे डोळे आणि त्या डोळ्यातले ते काजळ.. बघता बघता कां कोण जाणे टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने काही ठोके चुकतात

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

लेखक खेडूत यांनी बुधवार, 10/12/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.

चारोळ्या

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 10/12/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता. बाटली रिकामी ग्लास घरंगळलेला, टेबलावरचा थेंब केव्हाचाच सुकलेला. ढग विखुरलेले पाऊस थांबलेला, कुंदाळ हवेत मी गारठलेला. काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.

ये रे माझ्या मागल्या........

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/12/2014 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....

नात्यांचे महत्त्व आणि सिद्धता

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/12/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे. नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही. पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही. वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही. सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही. पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही. भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही. आपल्याला जे साध्य होत नाही त

नाव

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 10/12/2014 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ०८/१२/२०१४ – लेख १० – नाव http://kalamnaama.com/nav/ नाव नावात काय आहे? हे वाक्य शेकस्पिअरचं किंवा हा प्रश्न शेकस्पिअरचा. त्याचा या वाक्यामागील अर्थ असा होता की जर गुलाबाला काही वेगळ्या नावाने संबोधलं तर त्यातून येणारा सुगंध बदलेल का? किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का? उत्तर आहे ‘नाही’. मग नावात काय आहे? नाव का असतं? इतिहासातील किंवा वर्तमानातील कित्येक नावं मोठी किंवा महान आहेत म्हणजे नेमकं काय? नाव बदलल्याने नक्की माणूस बदलतो का? एखाद्या नावाशी असलेला संबंध किंवा नातं आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय?

अत्तरायण..! भाग - २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 10/12/2014 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तरायण..! भाग - १ इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा। पुढे चालू..... ==================== २) अत्तरफूल :- काय वाटतं नाव ऐकल्यावर? गोंधळात पडायला होतं ना? पण हे अत्तर ज्याचं आहे..त्या फुलानीच आजवर कित्येकांना गोंधळात टाकलय. कित्येकांचे गोंधळ सोडवलेत,वाढवलेतंही! मी ही पहिल्यांदा गोंधळलोच होतो. (आणि तो गोंधळाचा प्रसंग मला पुन्हा आठवून दिला तो एका गोंधळ्यानीच!) म्हणजे ही केवळ शब्दक्रीडा नव्हे.