डब्यातलं तत्त्वज्ञान... १
आज तिला विचारायचंच, असं मी ठरवलं होतं.
अगदी घट्ट मैत्री झालेली नसली तरी ओळख बर्यापैकी झाली होती. एकाच ग्रुपात होतो दोघंही. एकमेकांशी बोलणं फारसं होत नसलं तरी कधी अवघडलेपण जाणवलं नव्हतं एकमेकांसोबत. शाळेत असल्यापासून मनावर बिंबवलं गेलं होतं की स्त्री-पुरुष हे दोघंही समान आहेत. जी वागणूक पुरुषांना मिळते ती स्त्रियांनादेखील मिळायला हवी. मला हे अगदी मनोमन पटलं होतं आणि मी अजूनही यावर ठाम आहे. म्हणूनच मी जसा माझ्या मित्रांशी बोलायचो तसाच मुलींशीही बोलायचो.
पीयूष
काळजावर मोगर्याचे वार झाले
आज डोळा आसवांचे भार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
दुश्मनांची राहिली ना जरब काही
ओळखीचे चोर येथे फार झाले
देवभोळा साव आता मी न उरलो
दैव माझे यारहो गद्दार झाले
भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..?
चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले?
आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्याचे वार झाले
वाचले जे झुंजले जगती 'विशाला'
पाठ दावुन धावले ते ठार झाले !
***********************************
(वृत्त:मंजुघोषा)
काव्यरस
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २७ (यज्ञयाग विशेष!)
मागिल भाग..
शिवाय.. दरवर्षी एका माजी विद्यार्थ्याला अनुष्ठानाचं यजमानपद लाभत असे. आणि तो नुकताच विवाहित झालेला असेल..तर गुरुजि अगदी हमखास त्यालाच बसवणार्,हे ही ठरलेलं असे.
पुढे चालू...
=======================
आमचा अनुष्ठानाचा महिना कोणता? तर पौष. दरवर्षीचा अगदी ठरलेला. मग आंम्ही रानातून सदाशिव दादा बरोबर जाऊन लाकडं/फाटी/गाठी आणि येता जाता जेव्हढ्या म्हणून गोळा होतील तेव्हढ्या शेण्या समिधा असं अगदी १ महिना आधिपासून आणून गोठ्यामागे रचायला लागायचो.
अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.
मागे राहिली आवली ......
तिच्या डोळ्यातली व्यथा , कुणी नाही रे जाणली
तुका वैकुंठासि गेले, मागे राहिली आवली
सावधान म्हणताच, पाशातून सुटलात
तुम्ही झालात समर्थ, ती गजाआड खोळंबली
तिची प्रीती तिची भक्ती, काळापार कान्ह्यासाठी
एका हाकेवर भोज ,त्याला मीरा ना लाभली
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
त्याचे घर भोगी पण, निजसूर्याची काहली
अमृतसर ५ - खादाडी
पंजाबी खाणं म्हटलं की डोळ्यापुढे सरसो का साग, मकई रोटी, छोले भटुरे, आलु गोबी, तडका दाल, पनीर चे नाना चमचमीत पदार्थ, खुसखुशीत रोट्या, नान, पराठे, कुलचे डोळ्यापुढे येतात. जोडीला पंचरंगा आचार आणि मसाला पापड हवेतच. भरल्या पोटी हौसेनं लस्सी हाणणं आलच.च वै तू हि आणि मराठी मालिका ....
संस्कृत काव्यामध्ये च वै तू हि ह्याचे अनन्यसाधारण महत्व आहे ...फिलर्स म्हणून अतिशय कामास येणारे
हल्ली मराठी मालिकांमधील काही संवाद ... अत्यंत फुटकळ बाबही काहीतरी विशेष महत्वाची असल्यासारखे दाखवणे ...तसेच काही दृश्यांकने ह्या फिलर्स सारखे पण अत्यंत डोक्यात जाणारे
१. कुणीही कुठूनही बाहेरून आले कि : तू 'फ्रेश' होऊन ये ...अरे तो/ती फ्रेशच दिसत असतांना पुन्हा काय ...आणि हात पाय धुवून घे असे सोपे वाक्य नाही ...फ्रेश होऊन ये
२. कोणताही तणाव आला कि : त्याला / तिला थोडा वेळ दे
किंवा
तू आधी/थोडी शांत हो
३.
मिसळपाव