Skip to main content

एका शेतकर्याची आत्महत्या

लेखक आकाश कंदील यांनी शुक्रवार, 24/04/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवाल नावाचा हिमनग पाण्यात किती आणि दिसतो किती जे झाले ते खूपच दुखदायी होते पण खालील मुद्दये सौंशय उत्पन करतात १. १० एकर शेत, २ फळबागाचा मालक. २. फेटा बांधायाचा व्यावसाय करत होता. ३. आत्महत्येच्या दिवशी त्याच्याकडे १.५० लाख होते(शंका वाटते) ४. समाजवादी पार्टीतून २ वेळा निवडणूक लढला. ५. कॉंग्रेस मध्ये गेला होता. ६. आता आप मध्ये होता. ७ झी न्यूज (२३/०४/१५) दाखवलायानुसार, त्याचा भाऊ सांगतो आत्महत्येच्या चिट्ठीतले अक्षर त्याचे नाही, पुरावा म्हणून त्याचे हस्ताक्षार दाखवले. ७. श्री मनीष सिसोदियानि बोलावले म्हणून दिल्लीला गेला असे घरचे सांगतात.

केक वाला आणि देशी मिठाई

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 24/04/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक खंडप्राय देश होता आणि तिथे नानाविध प्रकारेचे लोक भाषा परंपरा वगैरे जपत होते ... मुद्दा होता गोड पदार्थांचा ... त्या देशात शास्त्रोक्त पद्धतीने अनेक उत्तमोत्तम गोड पदार्थ मिठाया बनवल्या जात ... त्या बनवायला वेळ लागत असे आणि पचायलाही ..पण लोक मजेत होते त्या मिठायांमध्ये चोष्य लेह्य खाद्य असे अनेक प्रकार होते ... एके दिवशी त्या देशात काही फिरंगी लोक आले त्यांनी त्यांची संस्कृती आणली आणि त्यात त्यांच्या मिठाया पण होत्या... त्यात होता एक पदार्थ केक ...बनवायला सोपा ....दिसायला सुंदर...

कै. स गो बर्वे जन्मशताब्दी

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 24/04/2015 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
B माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख : कॉलेजात असताना मॉडर्न कॅफेचा चौक ''कै. स. गो. बर्वे चौक'' आहे हे माहीत होते पण त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग , बर्वेनगरची बस वगैरे दिसत दिसत असे.

ऐक स्वखे : त्रिधारा भाग-३

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 24/04/2015 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
स्व भाग १: ======= एक घटना आपल्याच लोकांना कसं बदलविते ते पहा लग्न होई पर्यंत जर कश्यालाही विरोध केला तरी पटवून दिले तर घरच्यांना पटत असे पण आता मात्र प्रत्येक लहान सहान गोष्टीत सुद्धा "हे तुला बायकोने सांगीतले असेल","तीचे ऐकून असे बोलतोयस झालं" असा समारोप होऊ लागला. सोसयटीच्या लोकांची आपल्या संसारात नको इतकी लुड्बूड आणि स्वखीच्या धार्मीकतेवर शेरेबाजी कशी “अस्थानी आणि अन्यायी” आहे हे घरच्यांना पटवणे अवघड होऊन बसले.

रातराणी

लेखक Vimodak यांनी शुक्रवार, 24/04/2015 04:25 या दिवशी प्रकाशित केले.
डोह काळा डोक्यावरी अन् , तारकाही भरजरी.. एक चन्द्र वाहता अन् एक होड़ी धावती. हिरे माणिक तरंगते, जणू लक्ष दिव्यांच्या मैफिली, कुजबुज त्यांची मोकळी.. 'ति' राहिली ना आपली. निखळले कमजोर तारे, दोष देऊनि मला... मी मूक राहून पळभरी, श्रद्धांजलि त्यांस वाहिली. लोटुनी गुंबज मनोहर, तिज पापण्या मग श्रांतल्या.. भिस्त मजवर टाकुन सारी, ती 'रातराणी' झोपली.

गिरिजा इन अ वंडर लॅन्ड

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 24/04/2015 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
गिरिजाचा लॉग : १२:१६:१६ घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन ! सतरा . अंक १७ ! बिझिनेस येस बिझिनेस ! गूड आयडीया ! ग्रेट आयडीया इन्डीड ! मनात येतात ते विचार लिहुन काढ आणि वेळ नोंडवुन ठेव ! ग्रेट आयडीया ! गिरिजा यु आर जिनियस ... येस अ नार्सिसिस्टीक जिनियस ! फकिंग जिनियस ! ब्लडी पॅरामाऊंट जीनीयस ! गिरिजाचा लॉग : १२:१६:१५ घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन ! नो .

अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!!

लेखक Rajvardhan यांनी शुक्रवार, 24/04/2015 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझा कुंचला कागदावर शिंपित आहे लेखणी दवात डूबवतो आहे कागदावर लेखणीच काय कुंचलासुद्धा आज निष्प्रभ झालाय कारण तू जाताना माझी लेखणी माझा कुंचला सोबत घेऊन गेलीस ते ही कायमची ! जाताना तेवढ माझं मन मात्र विसरलीस माझं मन , माझा कुंचला , माझी लेखणी आजही तेवढीच तळपते आहे रंग भावनांचे, रंग उत्कटतेचे , रंग उसत्वाचे , रंग विरहाचे ,रंग प्रणयाचे ,रंग प्रेमाचे , रंग सदोदित संवादांचे आताशा मी कागदावर उमटवत आहे आजही तळपते आहे माझी लेखणी, माझा कुंचला !! तुझी नेत्रापालवी औस्तुक्याने फुलते आहे तुझ्या भाळी सौभाग्य नांदते आहे तुझ्या कर्ण -स्फुटिकावर मोती झळाळत आहे केसांतून निघालेली एक खट्याळ बट
काव्यरस

नकळत …

लेखक अनामिक२४१० यांनी गुरुवार, 23/04/2015 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम …. ??? खरंच हे प्रेम असतं …. ? एक अनामिक हुरहूर दाटलेली केवळ तिच्या ओढीसाठी नकळत … आपल्याच नकळत मी तिला Follow करू पाहतो मी तिच्याच गोष्टी Follow करू लागतो ह्याला काय म्हणावे …. जितका मी दूर जाईन जाईल तितकंच माझ्या विचारे गुंती तिचं मन तिच्यातच का अडकत जातो मी … ??? नकळत माझाच मी …… समोर काय होणारय हे माहीत असूनही परत माझ मन तिच्यातच नकळत हळूहळू गुंतत जातं … असं कसं असतं हे प्रेम … नकळत … झालेलं … तिच्याच आठवणीचा साठा असलेलं ..... पुन्हा एकदा प्रेमात मी … नकळत … ... प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आपलाच अनामिक …

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 23/04/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळ

शाळा

लेखक चिनार यांनी गुरुवार, 23/04/2015 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षांचे निकाल लागण्याचा मौसम सुरु आहे. ओळखीतल्या शाळकरी मुलांपैकी जवळपास सगळेच पहिल्या नंबरात पास होतायेत. मला प्रश्न पडलाय की सगळेच पहिल्या नंबरात असतील तर दुसरं कोण येतं? की दुसरा नंबर बादच केलाय शिक्षणपद्धतीतून ? शिवाय आजकाल पहिल्या नंबरात येणाऱ्या मुलांचे फारसे कौतुक होत नाही. पहिल्या नंबरात आला तरी अमक्या विषयात मार्क जरा कमीच पडलेत अशी चर्चा जास्त होते. कारण त्या कमी मार्कांमुळे पहिला आणि दुसऱ्यातली तफावत कमी होते. या तफावतीमुळे काय फरक पडतो ते माहिती नाही. कदाचित पालकांना 'अनबीटेबल लीड" हवी असावी असा माझा कयास आहे.