Skip to main content

मी नाही बोलणार जा.............

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 04/05/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
अवनी आज प्रचंड घुश्श्यात होती. घरी आल्या आल्या तिने सोफ्यावर दफ्तर आपटलं आणि तडक वर आपल्या खोलीत निघून गेली. ज्योती किचनमधुन बाहेर पाणी घेउन येईपर्यंत वरुन धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तिला आजच हे प्रकरण थोड विचित्रच वाटलं. सहसा अवनी अस कधी वागायची नाही. हा थोड़ी हट्टी होती, ती तर सगळीच मुलं ह्या वयात असतात पण इतरांप्रमाणे अवनी कधी आततायीपणा करायची नाही. आईविना पोर म्हणून ती तिच्या आजीची ज़रा जास्तच लाडकी होती एव्हढंच. पण बाक़ी अवनी होती अगदी गोड आणि लाघवी. पूर्वी दंगा करून घर डोक्यावर घेणारी अवनी मम्मा गेल्यापासून मात्र थोडी बदलली होती.

प्रताधिकार कायदा: अस्पष्टता, गल्लत, गफलती, विरोधाभास इत्यादी

लेखक माहितगार यांनी सोमवार, 04/05/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
कायदे मंडळांपुढे मंजुरीसाठी बहुतांश कायदे शासन यंत्रणा आणत असली तरी श्रेय कायदे मंडळांना जाते पण कायदेमंडळांच्या विशेषाधीकारांमुळे कायद्यात काही उणीवा शिल्लक राहील्यास उणीवांवर टिका करता येते, पण कायदेमंडळातील सदस्यांच्या कारभाराकडे बोट दाखवणे कठीण असते. भारत सरकारकडची कायदे तयार करणारी यंत्रणा, (सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकील मंडळी सरकार दरबारी आणि विरोधी पक्षात आणि संसदेत मोठ मोठे मानमरातब मिरवत असतात) त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या समीत्या संसद सभागृह, कायदे राबवणारी यंत्रणा या सर्वातून जाऊन बहुतेक सर्व शुद्धीकरण करूनच कायदे बाहेर येत असावेत.

एम बी बी एस = बी ए एम एस ???

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 04/05/2015 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तपत्रीय बातमीनुसार शासनाने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्‍टिशनल ऍक्‍ट संदर्भातील जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील आयुर्वेदिक डॉक्‍टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्‍टिस करण्याची मुभा मिळाली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभही मिळणार आहे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्‍टरांची संख्या 80 हजारांच्या घरात आहे. त्यातील बहुतांशी डॉक्‍टर हे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देतात. या डॉक्‍टरांना ऍलोपॅथिक सेवा देण्याची मुभा कायद्याने प्राप्त नसल्याने त्यांना ही वैद्यकीय सेवा देता येत नव्हती. धावपळीच्या जगात "आजारावर त्वरित मात करणारेच उपचार करा‘, अशी मागणी वाढू लागली.

गोवा कट्टा

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 04/05/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो आणि मैत्रीणींनो, मी पुढल्या आठवड्यात गोव्यामधे सहकुटुंब सुट्टीसाठी येत आहे. आपल्यापैकी कुणी गोव्यात राहत असल्यास १२, १३, १४ मे पैकी एक संध्याकाळ कट्टा करू शकतो. हा माझा नंबर ९९३०९३०९०१. कोण कोण आहे आणि कोण कोण उपलब्ध आहे हे नक्की कळवा. आमचा मुक्काम BENAULIM SALCETTE येथे असणार आहे. . मुंबईतल्या मित्रांसाठी पि.एस.: गोव्याहून कुणासाठीही काहीही आणण्यात येणार नाहीये. धन्यवाद.

हं ! ते तुला कधी जमलेय

लेखक खटासि खट यांनी सोमवार, 04/05/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/31151 (मूळ कवीची मनापासून क्षमा मागून हे विडंबन शोलेकालीन व्यथा वेदनांना वाचा फोडण्यासाठी प्रसृत झाले. कळावे आपला नकवी - खट (नक्वी नव्हे) ) अरे द्यायचेच असेल तर दे गब्बरलाही पकडीत घेवु पाहणारे ते हात हं ! ते तुला कधीच जमलेय तोडलेल्या हातांवरती, कशास शाली अन बंदुकी रामलाल काकांना या कसली आहे निवांत डुलकी अरे गायचेच असेल तर गा ते स्वर मेहबुबी हेलनेचे... हं ! ते तुला कधी रे जमलेय हिंडत्या बसंतीचे ..
काव्यरस

ऐक स्वखे त्रिधारा : भाग ६

लेखक नाखु यांनी सोमवार, 04/05/2015 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
स्व भाग २:
स्वखीला हारदवून टाकणार्या दु:खातून बाहेर काढणे हीच महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.
क्रमशः ज़िंदगी ... कैसी है पहेली, हाए कभी तो हंसाये कभी ये रुलाये ज़िंदगी ... कभी देखो मन नहीं जागे पीछे पीछे सपनों के भागे एक दिन सपनों का राही चला जाए सपनों के आगे कहाँ ज़िंदगी ... आता खरा कसोटीचा काळ होता एक बाजूला स्वखीला यातून सावरणे आणि दुसरीकडे तीचे मन गुंतवून ठेवणे आवश्यक झाले होते.मुले शाळेमुळे घराबाहेर त्यामुळे स्वखी एकटीच घरी, जास्त वेळ त्यामुळे नैराश्य आणी थोडीशी अबोल झाली होती. यावर उपाय म्हणून म्हणा की थोडी हवापालट म्हणून मी बेंगलोरला ट्रीप

साधु हास्यानंद 2

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 03/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि ते पुढे म्हणाले, ' जो जन्माला येतो त्याला दुःख हे येते पण जगात आनंद ही तेवढाच आहे , मग आपण दुःखाच्या मागे का धावतो.  भुतकाळातील आनंदी क्षण  विसरतो,  दुःखाचे क्षण मात्र लक्षात ठेवतो.  आशा स्थितीत जर वर्तमानात राहीले तर त्याचा परिणाम भविष्यातील जीवनावर होतो.  जर तुम्ही त्याच ठिकाणी आनंदाचे क्षण आठवले तर त्याचा परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होईल,  आणि सहाजिकच तुमचा भविष्यकाळ सुदंर आसेल, ' हे ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसु लागला.

शंकर अभ्यंकर यांचे ओवीबद्ध रामायण

लेखक श्रीनिवास टिळक यांनी रविवार, 03/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
शंकर अभ्यंकर हे सध्या वाल्मीकि रामायणावर 'शंकर रामायण' या नावाचा एक टीकाग्रंथ लिहित आहेत आणि त्याच्या जवळ जवळ १५,००० ओव्या लिहून झाल्या आहेत. मंगलाचरणच एक हजार ओव्यांचे आहे आणि त्यात हे 'शंकर रामायण' कशासाठी आणि आधीची रामायणे कोणती याचा सविस्तर उहापोह आहे. मिपाकरांच्या सोयीसाठी त्यातील काही ओव्या खाली उधृत करीत आहे. अधिक माहितीसाठी अभ्यंकरांच्या आदित्य प्रतिष्ठान चा २०१४ चा आदित्य दीप हा दिवाळी अंक पहावा (4/15 वेदांतनगरी सोसायटी कर्वेनगर पुणे ४११०५२). माझी खात्री आहे कि गदिमांच्या गीत रामायणाप्रमाणेच हे 'ओवी रामायण' सुद्धा मराठी मनाचा आणि ह्रदयाचा ठाव घेईल.

आधुनिकता व भारत :- काही इंटरेस्टींटिंग मुद्दे

लेखक मन यांनी रविवार, 03/05/2015 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, १ मे रोजी वसंत व्याख्यानमालेत राजीव साने ह्यांचं व्याख्यान होतं. इंटरेस्टिंग वाटलं. त्यातील मुद्दे आठवतील तसे आता चोवीस तासानं लिहून काढलेत. . . दिनांक १ मे .वसंत व्यख्यानमाला. साडेसहाची वेळ. टिळक स्मारक मंदिर. वक्ते राजीव साने. त्यांची काही पुस्तकं गाजलित; काही पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कारही आहे. मला त्यांचं लोकसत्तेतलं 'गल्लत गफलत फजहब ' हे सदर आवडलं. तार्किक मांडणी आवडली. 'आधुनिकता व भारत' हा विषय. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पाच दहा मिनिटं नजर फिरवली. सभागृह अर्ध्याहून थोडं जास्त भरलं असावं. ज्येष्ठ नागरिकांचा भरणा अधिक.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.