Skip to main content

MIDC

लेखक अर्थहीन यांनी बुधवार, 12/08/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
लंच संपवून डेस्क वर येऊन बसतो. अर्थहीन लंच-चा टॉपिक- त्याहून जास्त अर्थहीन असतो. "शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज असते का?" एकजण शहरातला त्यात ताड़-ताड़ बोलत असतो. सगळ्यांना सपशेल निरुत्तर करुन सोडतो. म्हणतो- ते गरीब तिकडं राना-ऊना-पावसात राबतात, कधी लाईट नसते, तर कधी पाणी. तरी आपलं खायचं अन्न पिकवतात. त्यांना हवी ती मदत सरकारने करायलाच हवी. बायोस्कोपची 'बैल' कथा बघुन रडलो होतो मी. मला त्याचं पटतं. (--ती कथा भक्कम होती.) हा शहरातला असून याला कळवळा किती असं मी मनाला म्हणतो. तर मन म्हणतं -खरंय तुझं. ऐकताना मलापण असंच वाटलं याच्याबद्दल.

मसाण

लेखक कोमल यांनी बुधवार, 12/08/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
कहानी शुरू होती है एक पोर्न से। देवी. एका कॉम्प्युटर क्लास मधली ट्यूटर. तिच्या एका मित्राकडे, पियुषकडे आकृष्ट होते. लैंगिक संबंधांचे कोडे उलगडण्यासाठी ती पोर्न पाहून पियुषसोबत एका स्वस्तातल्या लॉज मध्ये जाते. तिथे अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीला घाबरून पियुष आत्महत्या करतो. पोलिसांनी या धाडीचा विडिओ बनवलेला असतो. त्यांपैकी एक इन्स्पेक्टर मिश्रा, देवी आणि तिच्या वडीलांपुढे एक मार्ग ठेवतो;
३ लाख रुपये द्या, कोर्ट-कचेरी आम्ही पाहून घेऊ नाहीतर तिचा विडिओ इंटरनेट वर टाकू.

(स्पर्धेसाठी नाही) क्लोज

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 12/08/2015 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
भोसले, एक बी पंटर सुटला नाय पायजे. चारी बाजूनी प्याक करायचे, काय? होय सर. तिज्यायला रतनखत्रीची औलाद. एकबी चिट्ठी दिसायला नाय पायजे. मटका बंद म्हण्जे बंद. होय सर. चला सुटा. +++++++++++++++++++++ उचल उचल भाड्याला. भोसले ते पिवळा शर्टवालं गाबडं पळालं बघा. आपल्याच व्हॅनकडं पळतय. धरा त्येला. +++++++++++++++++++++ भाडखाऊ कुठं पळतो बे? न्हाय साहेब. तुमच्याच गाडीकडं आलो की. कुत्र्या, पळायला काय झालं सांग अन बस आत नीट. व्हय साह्येब. मागच्या टायमाला जागाच मिळाली नाही व्हॅनमदी. पार जेलरोडपत्तर उभ्याने नेलता मला. तुझ्यातर आयला. भडव्या ओपनला काय आज? साह्येब तिर्री सत्ती. उभा राहा भेनचोद आता.

अमेरीका...अमेरीका...अमेरीका...

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 12/08/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एक नवी फॅशन आली आहे. काही झालं की अमेरीकेला दोष देवून मोकळं व्हायचं. इराण इराकशी भांडतो. तालिबानी स्वतःच्या देशाशीच भांडतात. यामधे सग्गळा दोष म्हणे अमेरीकेचा असतो. आयसिस बर्‍याच गमजा करते. यामागेही अमेरीकेचाच हात असतो. मानलं काही प्रमाणात असेलही पण....मनात येतं खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? औरंगझेब महाराष्ट्रात येऊन क्रौर्य दाखवत होता, हाल हाल करीत होता तेव्हाही अमेरीका होती का... आसामात दंगा होतो... तिथे अमेरीका असते का आझाद मैदानात ...

[शतशब्द्कथा स्पर्धा] पहाट

लेखक बोलघेवडा यांनी बुधवार, 12/08/2015 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
" मालक सोडा तिला, म्या हुवतर पाया पडते, पर लेकीला सोडा", तमासगीर कमळाक्कान हंबरडा फोडला. "आमी येकदा धरलं, का मंग सोडत नसतोय" "आमी काय म्हनल त्ये ध्यानी आलं न्हाई का? ह्या लोकास्नी वाड्यातून भाइर काडा, आन ह्या पोरीला वर माडीवर न्ह्या. आमी आलोच लगोलग" संभानं भेदरलेल्या नाजुकाला पकडण्यासाठी हात म्होर केला, त्योच, "तिच्या आंगाला हात लावशील तर, जित्ता गाडीन हितं" करकर वहान वाजवत धाकलं मालक वाड्यात दाखल झालं. त्यास्नी बघून खुद्द पाटील बी टरकला. धाकल्या मालकाच्या आडदांड हातातलं कडं मशालीच्या प्रकाशात लखलखत हुतं.

हरिद्वारची कावड यात्रा - एक उन्माद

लेखक दा विन्ची यांनी मंगळवार, 11/08/2015 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज घडीला आपल्या भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी आहे आणि त्यापैकी अंदाजे तीन कोटी हिंदू शिव भक्त १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या बारा दिवस चालणाऱ्या कावड यात्रेसाठी देवभूमी उत्तराखंड मधील हरिद्वार मध्ये येवून गेले . एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के लोक्स . आपल्या सगळ्यांना आपल्या आषाढी वारी आणि त्या गर्दीचे भारी कौतिक . यावर्षी बहुधा ५ ते ६ लाख लोक विठू माउलीच्या दर्शनासाठी आले असतील . हि तुलना फ़क़्त या यात्रेची भव्यता समजावी म्हणून पण मला एक फरक जाणवला. वारीमध्ये एक प्रकारचे पावित्र्य, शिस्त आणि भक्तिभाव सहज जाणवतो . या उलट कावड यात्रा म्हणजे एक गुर्मी , उन्माद , आक्रस्ताळेपणा.

मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 11/08/2015 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया १. मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते. सिगारेट देऊन, तयार सबमिशन-फाईल घ्यायचं, साध सरळ बार्टर असतं, काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? मैत्रीच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते.

[शतशब्द कथा] रुख - रुख

लेखक इडली डोसा यांनी मंगळवार, 11/08/2015 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी सिग्नलला थांबली आणि काल डेब्राकडून आलेल्या ईमेलचा मथळा आठवला 'Thank you and good bye'. राहुनचं गेलं काल तिचं मेल वाचायचं. आता ती पुन्हा कधीच नाही भेटणार . तिच्या डेस्कजवळ थांबुन तिला शुभेच्छा तरी द्यायला हव्या होत्या. कितीवेळा म्हणाली होती कि तिला भारतीय जेवण आवडतं . राहिलचं तिच्यासाठी डबा आणायचं. एवढं वय झालं तरी बिचारी मुलीसाठी आणि नातवंडांसाठी अजून काम करत होती . चला बहुतेक मुलीला नोकरी लागलेली दिसते. आले एकदाचे सुखाचे दिवस आजीबाईंना . . . . . . . " डेब्रा???तू कशी काय इथे? काल शेवटचा दिवस होता ना तुझा? " " तुला पण मी सोडून चालले असं वाटलं का?

कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/08/2015 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही मालिकांमध्ये पात्रे खूपदा तीच ती वाक्ये म्हणत असतात . आधी मला वाटायचे, की पाणी टाकून वाढविण्याचाच तो एक प्रकार आहे. पण थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की प्रत्यक्ष जीवनात देखील आपण तीच ती वाक्ये बोलत असतो. उदाहरण म्हणून कुठलेही कडाकडा वाजणारे भांडण ऐका. जिथे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे. एक कारण जर पटले नाही, तर काही नवीन तर्क मांडावा की नाही?

.... आभास

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 11/08/2015 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ शब्द भारलेले इकडून तिकडे वाहणारे तिकडून इकडे झरणारे...... कुणाकुणाचे संचित असते क्षणामनाला जाणिव देते प्रत्यक्षाहून, अमूर्त संपन्न! भास नसे हा खास तरीही आभासाच्या जगात फिरते गूज मनाचे मनास वदते. इतक्या रुतल्या गाठी रेशीम व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौलच लावू दिगंताला निघताना तरी, हात खराच हाती घेऊ!
काव्यरस