Skip to main content

नात्याला अर्थ पुरेसा.....

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 23/10/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव? संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… … गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव… जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव…. तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव… ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे? ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…
काव्यरस

(जेव्हा) काहीच करू नये. (असं वाटतं)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 23/10/2015 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
“काहीच करायचं नाही”,किंवा “असाच कुठे तरी वेळ घालवायचा” याचा अर्थ जीवनात कुणी आळशी असणं किंवा कुणी निष्क्रिय असणं असं नव्हे.” त्या दिवशी मी नरेंद्राच्या घरी काही कामासाठी गेलो होतो.तो एकटाच घरी होता.अगदी कंटाळलेला दिसला. “कायरे,नरेंद्रा अगदीच कंटाळलेला दिसतोस.बायको घरी नाही म्हणून तुझा वेळ जात नाही काय?” मी नरेंद्राला कुतूहल म्हणून विचारलं. “काहीच करू नये असं मला बरेच वेळा वाटतं.बरेच लोक त्याकडे निराळ्या अर्थाने पहातात तो अर्थ नव्हे .काहीच करू नये याचा अर्थ-चांगला आलेला दिवस मस्त घालवावा,अमुक ठिकाणी जाणार आहे,निर्दिष्ट स्थानाकडे जाणार आहे, असं न समजून चालत रहावं असं वाटतं.जीवनातले आनंदाचे क्ष

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १० इस मोड़ से जाते हैं . . (अंतिम)

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 23/10/2015 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

बायपास...

लेखक आनंद कांबीकर यांनी शुक्रवार, 23/10/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
खुप मजा यायाची गावांत. पूर्वी एवढा पैसा कधीच दिसायचाच नाही. व्यवहार ज्वारी, बाजरी आणि गहु यांवर चालायचे. आठाभर बाजारी घातली कि हप्ताभरच्या चहाची सोय व्हायची. लोकं कष्टाळु होती तशीच प्रेमळ ही खुप होती. कुना एकाच्या दुःखावर अख्खी गल्लीच काय तर गांव गोळा व्हायचा. हाड़ाचं वैर असलं तरि दवाखाना म्हटलं कि उतरंडीत ठेवालेले पै पैसे निघायचे. अडल्या बाळंतनीला तालुक्याला नेयाला निम्म्यारातिला गाड्या जूपायच्या. पण ती अडदंड सड़क गावाला घासुन गेली अणि गांव बदलला. गावाचा भूगोल बदलला तसेच मानसशास्त्र हि बदलले. लोकांना पैस्याचा हव्यास जड़ला. कारखाने आले, मोठ मोठी दुकानं थाटली. लांडगी वाढली.

मूठभर खजूर [पूर्वार्ध]

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 22/10/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
मूठभर खजूर [पूर्वार्ध] (El Tayeb Salih यांच्या 'A Handful of Dates' या कथेचा स्वैर अनुवाद. ही कथा मूळ अरेबिक मध्ये लिहिली गेली, नंतर तिचे इंग्रजीत भाषांतर झाले.) नेमके वय नाही आठवत आता, पण खूप लहान होतो. आजोबांबरोबर बाहेर पडलो, कि गावातले लोक प्रेमाने माझे गालगुच्चे घ्यायचे, डोक्यावर हळूच टपली मारायचे.... आता हे असलं काही, ते माझ्या आजोबांबरोबर करायचे नाहीत! वडील कधीच नाही, पण आजोबा मात्र मला नेहमी त्यांच्या बरोबर बाहेर घेऊन जात. दररोज भल्या सकाळी मी कुराणपठनासाठी मशिदीत जाई. ती मशीद, ती शेते, ती नदी.....आमच्या जगण्याचे आधार! माझ्या वयाची इतर मुले मात्र मशिदीत जायला,कुराणपठन करायला कुरकुरत.

तुझ्या आठवणीत. ..

लेखक माहीराज यांनी गुरुवार, 22/10/2015 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
सजलेेली लाट.. नटलेले पाणी... तुझ्या आठवणीत गातो पुन्हा सुचलेली गाणी.. दुर उठलेल्या लाटेचे किनार्याशी गोड नाते.. ते पाणी खारट थोडे अमृताहुन ही गोड वाटे.. ओल्या सांजवेळी किरणे वाळुत शिंपडावी.. ध्यानी मनी नसताना तु किंचीत जवळ यावी... मी बावरताना..
काव्यरस

दळींद्रं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 22/10/2015 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेलबी थोडा रिंगणाला लायनीला शिवत पडला. "बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली. बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला. " ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला. मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला. "बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली. "ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला. माणिकचंदची पिचकारी मारत बब्यानं खिशात हात घातला. त्याच्या खिशात शंभर गोष्टी.

अन्नदाता सुखी भव भाग ५ - नव विचार

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 22/10/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 प्रचलित आणि रूढ विचार पद्धतीच्या विरुद्ध विचार बाळगण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतील, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Galileo Galilei (मराठी टंकताना पडलेला प्रश्न : "ग" वरचा अर्धचंद्र google मध्ये काही केल्या जमत नाही, काय करायला हवे ह

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 22/10/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!


शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?
काव्यरस

फेर..

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 22/10/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
एस टी तुन उतरलें तेव्हा बरीच रात्र झालेली. पाऊस थांबला असला तरी ढगांचा निचरा झाला नव्हता. पुन्हाकधी बरसायला सुरुवात होईल याचा नेम नव्हता. तिथुन गांव अजुन कोस भर दुर. लवकर गांव गाठायला हवं तसच ओढाही भरला असल याचा अंदाज घेत त्याने मधली वाट धरली. मधेच एखादी विज चमकायची अाणि वाट दिसायची. तो वाट काढत समोर तर दोन वर्षाच्या चिमुरडीला छातीशी कवटाळुन ती त्याच्या मागं. पायाला चिखलाची लगदाळं चिकटलेली. मधेच एखादा काटा पायात घुसुन रक्तासगट बाहेर यायचा, आग मस्तकाला भिडायची. पोरगी सारखी बिमार पडते. गांवातल्या डॉक्टरला बरेचदा दाखवलं पर पोरीला गुण येईना. सारखी रडत असते.