Skip to main content

रक्त पिपासू

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 27/10/2015 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
१९६० - ६५ मधले नाशिक आठवले. आता तिथेच काय, पण इतर शहरात देखील बहुदा, ढेकूण औषधाला देखील सापडत नसावेत. चांगलेच आहे म्हणा! पण साधारण दोन वर्षापूर्वी अमेरिकेत देखील ढेकणाचा (गावाचे नाव आठवत नाही) सुळसुळाट झाल्याची बातमी वाचली होती. म्हणजे काय, हे चिवट प्राणी कुठेना कुठे दबून रहात आपले रक्त शोषण करीत असतात. त्यां बोचऱ्या आठवणीसाठी शांता शेळके ह्यांची क्षमा मागून, एका गोड गीताचे विडंबन देत आहे.
काव्यरस

चौदहवी कि रात

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 27/10/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चौदहवी कि रात १९९२ साल आठ ऑक्टोबर सकाळ एक तरुण युगुल आदल्या दिवशी (०७ ऑक्टोबर १९९२) लग्न झालेलं. अत्यंत उत्साहात आणी आनंदात मुलुंडहून बसने मरोळपर्यंत आणी त्यापुढे रिक्षाने सांताक्रूझ विमानतळावर सकाळी १० च्या मुंबई कोईम्बतूर विमानाने निघाले. विमान १२ ला कोईम्बतूर ला पोहोचले. विमानातील एक मध्यमवयीन गृहस्थाने विचारले तुम्ही उटी ला जात आहात? ते हो म्हणाले. असेच एक दुसरे नाव परिणीत जोडपे त्यानाही त्याने विचारले. तो उटीच्या एका हॉटेलचा मालक होता त्याला उटीला जायचे होते. दोन जोडपी आणी तो असे पाच जण माणशी ५० रुपये देऊन मारुती व्हान ने निघाले.

द गडू शेट द गडू शेट ......:)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 27/10/2015 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
द गडू शेट द गडू शेट भरले का हो तुमचे पेट? तुम्ही म्हणे उडवून लावता भल्या भल्यांचे जम्बो जेट? इकडून सूड तिकडून अभ्या बॅट्या टक्या किसन प्यारे उचकायाचा मामिला उगा का रे लावता नेट? व्यासपीठ हे विरंगुळ्याचे मामू , मामे, फरक काय? पदर खोचून उभा/भी आहे तुमच्या समोर मामि थेट.:) काय सांगू कस्सं सांगू खरं काय खोटं काय कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट. ( ट ला ट लावून पाडलेली कविता:))
काव्यरस

लॉटरी

लेखक सायकलस्वार यांनी मंगळवार, 27/10/2015 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेकफास्ट आणि लंचच्या मधलीच वेळ असल्यामुळे कॅफेटेरिया तसा मोकळाच होता. एका कोपर्‍यात अमोल आणि प्रितेश समोर कॉफीचे रिकामे कप घेऊन टाईमपास करत बसले होते. दोघांनाही डेस्कवर परतायची घाई नव्हती. अमोल बेंचवर होता म्हणून आणि प्रितेशला तशीही काम करण्याची फारशी हौस नसे म्हणून. तेवढ्यात दोघांना समीर कॉफी घेऊन त्यांच्याच दिशेने येताना दिसला. 'काय रे भाऊ. लई बिझी झाला आजकाल. दिसत नाही कुठे तो?' अमोलने काहीतरी बोलायचे म्हणून उगीचच विचारले. खरे तर दिवसातले अकरा तास सगळे एकाच फ्लोअरवर एकमेकांसमोर असत. 'नाही रे बिझी कसला! चाललंय नेहमीसारखंच' कॉफी टेबलावर ठेवून एक खुर्ची खेचत समीर म्हणाला.

बालपण

लेखक एकप्रवासी यांनी सोमवार, 26/10/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी जाऊया आपल्या गावी, आठवणींनी भिजलेल्या वाटा धुंडाळत लपंडाव, विटी दांडू, सागरगोटीचे खेळ खेळत, आंबा फणसाच्या, चिंच आवळ्याच्या झाडात आपलं बालपण शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी………… हिरवळीत जीर्ण झाडात लपलेली आपली शाळा शोधत, खेळाचे मैदान, शाळेची घंटा, फळ्यावरचे सुविचार वाचत, आपला वर्ग, आपली जागा, रंग उडालेला फळा अंधुक झालेल्या आठवणीत आपले सवंगडी शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी…………

परीकथा भाग ४ - (फेसबूक स्टेटस १.६ ते १.७ वर्षे)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 26/10/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
. ३० सप्टेंबर २०१५ पापा ! ते सुद्धा पा पा पा पा नाही तर सुस्पष्ट आणि खणखणीत पापा .. ते सुद्धा मम्मा बोलायच्याही आधी आधी.. फिलिंग शब्द, इमॉटिकॉन्स आणि स्मायलींच्या पलीकडले :) . . २ ऑक्टोबर २०१५ वीज चमकते तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग थोड्यावेळाने आवाज ऐकू येतो. हेच सायन्स वापरून आम्ही ब्रश केल्यावर चूळ भरतो. आधी शांतपणे ग्लासातले पाणी पिऊन घेतो, मग फुर्रर करून आवाज काढतो. वीज काही आपल्या डोक्यावर कोसळत नाही, आणि आमच्या तोंडातले पाणी काही बेसिनमध्ये पडत नाही :) . . ५ ऑक्टोबर २०१५ मोठी माणसं विनोद करतात, लहान मुलं विनोद घडवतात. शनिवारी परीबरोबर तिच्या आजोळी चाललो होतो.

माळी पुनेव

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 26/10/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
माळी पुनेव! माळी पुनेवचा चंद्र जशी पन्हावली गाय धारा लागल्या दुधाच्या भिजते धरनी माय चांदन्याचं वावरातं डोले पीक हिर्वं गारं पाना पानाऊनं झरे गोळं अमृताची धारं कन्सा कन्सा वरं झाली चांदन्याची आबादानी कन्सातला दाना कसा हासे तान्ह्या पोरा वानी नयतुर्न्या पोरी वानी चंद्र हरखूनं जाये वायत्या पान्यातं नदीच्या रूपं निरखूनं पाये धुंद झाली चांदन्यानं मैना फूगळी धरते धरनीच्या मळक्यातं रई गर्गरं फिरते

पाण्याचे जगने

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 26/10/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आवडत नाही त्यास तुंबायला गुरफटुन सडायला जरी गटारात, आवडते वहायला जळमट सोडून पुढे पळायला छंदच त्याचा पळायचा झाडाच्या बुंध्याशि खेळायचा खेळहि त्याचे न्यारे अडमुठ ढेकळांना घुसळायाचे खडकांना पाझर फोडायाचे ताकत तेच्यात कोमा ला झाड तर ताड़ा माडाला मातीमोल करायची ते मुक्त आहे, मोफत आहे पर आपण त्यास बांध घालतो अन बाटलित भरतो तरी ते कुणावर ही रुसत नाही या खिशातून त्या खिशात घुसत नाही

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 26/10/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8.