Skip to main content

मोसाद - भाग ७

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 11/02/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ६ मोसाद - भाग ७ २ जानेवारी १९६५, लाताकिया बंदर, सीरिया. सोविएत रशियामधून आलेलं एक जहाज किनाऱ्याला लागलं. या जहाजात के.जी.बी. ने विकसित केलेली नवीन यंत्रसामग्री होती. प्रामुख्याने रेडिओ संदेश ऐकणे आणि ते कुठून पाठवले जात आहेत, ते ट्रान्समीटर्स शोधून काढणे यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार होता.

खेकडा

लेखक सुरवंट यांनी गुरुवार, 11/02/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुजबुजणारे कोणी असतात कोणी शहाणे तर कोणी वेडे असतात दुनियेच्या या उकिरड्यावर वळवळणारे कोणी किडे असतात अरे जा शब्दांनीच मारतो तुला नंगे फकीरसुध्दा *जडे असतात काळाच्या डोहात बुडून मार तू एक खंबा कोणी हौशी तर कोणी बेवडे असतात विश्वाचा परित्याग केलास तू पण फुटलेला एक बुडबुडा तू ऐकतो आहेस ना महाराजा या आदिम रचनेचा खेकडा तू

शृँगार १

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 11/02/2016 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
उरोज नितंब आणि तसलेच काही शब्द असलेल पुस्तक होत ते . शेजारी बसलेला मुलगा ते वाचत बसला होता . छे नुसत अस काही वाचुनही लोक एक्साईट होतात . नाही म्हणजे आपण एक्साईट व्हायला हव कि नको . काही हरकत नाही , पण आता आपले दिवस कर्तृत्व दाखवण्याचे , कृती वाचत बसण्याचे नाहीत . पण काय हरकत आहे अस वाचून स्फुरण चढणार असेल तर . हं किती दिवस झाले बायकोशी नीट बोलणही झाल नाही .

लान्स नाइक हनमंतआप्पा यांना विनम्र श्रद्धांजली.

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 11/02/2016 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत. ha कर्नाटक राज्यातल्या धारवाड जिल्ह्यातलं बेटादुर हे गाव आज भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या शुरवीराचं गाव म्हणून ओळखलं जाईल. ह्या शेती करणार्‍या गावातून आजवर सहा जणांनी सैन्यात आपली कामगिरी बजावली आहे.

"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 11/02/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पुर्वेचा देश मयन्मारमधून बर्‍याच मोठ्या कालखंडानंतर तिथे लोकशाही सरकारची स्थापना झाल्याची बातमी आली. त्या सरकारमध्ये अजूनही मयन्मारी लष्कराचा (भारताच्या दृष्टीने, चीनला अप्रत्यक्षपणे भारता विरुद्धा काड्या चालू ठेवण्याची सोयीचा) सहभाग असणार आहे. मयन्मारमध्ये लोकशाही आली म्हणजे लगेच भारताचे मयन्मार सोबतचे संबंध सुधारतील का उर्वरीत आशियान देशांशी दळणवळण व्यापार सुलभ होण्यास काही मदत होईल का हे काळच सांगेल. पण तो आपल्या या धागा लेखाचा विषय नाही. धागा लेखाचा विषय आहे "थिबॉ मीन" या मयन्मारच्या (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट.

लदाख सायकल ने : लेह ते ससपोल (भाग १३)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी गुरुवार, 11/02/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या टप्प्या मध्ये ४७४ किलोमीटर चे अंतर मी पार केले. त्याच बरोबर पाच घाट पण पार केले. चांगला रस्ता थोड्याच ठिकाणी भेटला. जास्त करून खराबच मिळाला. लांब लांब पर्यंत गावच भेटले नाही. तरी पण जास्त काही अडचण न येता, हे अंतर पार केले. हे माझे मोठं यश आहे. म्हणून मी माझा, माझ्यावरच गर्व करतोय. आज ४९ किमि सायकल चालवली

दिवस पंधरावा

नऊ वाजता उठलो. उठायला कोणतीच घाई केली नाही. रात्री चांगली झोप लागली. जानेवारी महिन्यात लेह फिरून झाले होते,त्यामुळे आता काही फिरण्याची आवश्यकता नाही.

उन्हाळा आणि भटकंती...

लेखक sagarshinde यांनी गुरुवार, 11/02/2016 15:07 या दिवशी प्रकाशित केले.

उन्हाळा आणि भटकंती... हे समीकरण अनेकांना ऑड वाटते, पण मित्रांनो उन्हाळ्यातही तुम्ही अगदी मनसोक्त भटकंती करू शकता उन्हाळा हा भटकंतीसाठी तसा खडतरच ऋतू म्हणायला हरकत नाही. पण हाडाच्या ट्रेकर्सना दुर्गभ्रमंती करण्यासाठी खरं तर कुठलीही वेळ आणि ऋतू आडवा येत नसतो.पाठीवर सॅक अडकवून द-या-खो-यांत, डोंगर शिखरावर, गड-किल्ल्यांवर, रानावनात, अभयारण्ये-जंगलात आपला आनंद शोधत फिरत असतात. यासाठी या भटक्यांना कोणतीही काळवेळ आडवी येत नाही.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ७ : महाभारताच्या खुणा

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 11/02/2016 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ दोन दिवस वॅलीमध्ये आणि एक दिवस हेमकुंड साहिब, असे आमच्या योजनेनुसार पार पडल्यावर घांगरीयामधला मुक्काम संपला. सकाळी आम्ही आवरून परत गोविंदघाटकडे निघालो. आता फक्त उतरणे असल्यामुळे सगळेच न थांबता आपल्या आपल्या वेगाने फटाफट उतरले. चढताना ६-७ तास लागले होते.

राजबंदिनी (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी बुधवार, 10/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं.

माझा ट्रेक - किल्ले वसई

लेखक sagarshinde यांनी बुधवार, 10/02/2016 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी महिन्यात सुरवातीचे सलग तीन आठवडे मी अन स्वामी ने माहुलीगड, चावंड गड – शिवनेरी गड व इंदुरी व चाकांचा किल्ला असे लगातार तीन ट्रेक केले. हे सलग ट्रेक पाहून मात्र नंतरचे दोन आठवडे आईने ट्रेकसाठी घराबाहेर पायही ठेवू दिला नाही, त्यामुळे जानेवारीचा शेवट मात्र खूप कंटाळवाणा गेला. मागील आठवड्यात २ तारखेला मुकुंद चा मला कॉल आला बोलला या वीकेंड ला कुठेतरी बाहेर ट्रेक ला जावूया, मी तर लगेच तय्यार झालो तशी पैशाची तंगी माझ्याकडे अन त्याच्याकडे होती त्यामुळे कमी खर्चात होईल असा किल्ला मी शोधायला सुरवात केली, शेवटी वसई समुद्रकिनारी असलेल्या किल्ल्यावर जायचा ठरवलं.