Skip to main content

संपादकीय! - स्वाती दिनेश - मधुरा देशपांडे

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 22/02/2016 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
sampadakiy body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleu

गणू शाळेतून हरवतो. (मराठी भाषा दिन २०१६) (पुणे जिल्ह्यातील ग्रामीण बोली)

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 22/02/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी गणूचा घरी पत्ता नव्हता. शाळा सुटून एक तास झाला होता. गणूच्या आईने तायडीला विचारले तुला त्याने काय सांगीतले का तर ती "नाय" म्हणाली. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी गणूच्या आईला काळजी वाटायला लागली. ती आणि तायडी गणूची दारातच वाट बघत उभी राहीली. गणूची आई बराच वेळ दारात चिंताग्रस्त चेह-याने उभी असल्याचे पाहुन शेजारपाजारच्या बायकां विचारपूस करायला आल्या. तायडीने त्यांना सांगीतले की शाळा सुटून दीड तास झालाय पण गणू अजून घरी आला नाही. गणूच्या आईचा आता धीर सुटू लागला. तिला नाही नाही त्या शंका येऊ लागल्या.

श्रावणसर

लेखक रातराणी यांनी सोमवार, 22/02/2016 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
काव्यरस

मावशी... मीनल मावशी

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 22/02/2016 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आईची बालमैत्रीण... पूर्ण नाव मीनल कवळे. लग्ना आधीचं मीनल राउत. मुळची आक्षीची... आई आणि ती खुप धमाल करायचे म्हणे, कबड्डी चैंप होती म्हणे! नेशनल लेवल पर्यन्त मजल!... आई आणि मावशी आणि ग्रुप सायकल चालवायचे आक्षिच्या अरुंद रास्त्यांवरून आणि मी त्यांना बघुन घराच्या फाटकावर रडरड रडायचो... हा सीन अगदी नीट आठवतो मला, एकूणच सॉलिड मैत्री! लकीली लग्न होऊन मावशी बोरिवलीत आली... आम्ही ही बोरिवलीतच राहायचो, शाळेच्या ५मिनट अंतरावर मावशी आणि १५मिंटावर आमचं, त्यामुळे शाळा झाली की आई मावशी कडून मला घ्यायला यायची... आई माझ्या 'प्रगती'पुस्तकावर खुश नसायची म्हणून माझी शिकवणी मावशी कड़े...

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 22/02/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ------------------------ आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

" झाडीपट्टी चंबल लागते" (झाडी बोली)-(मराठी भाषा दिन २०१६)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 22/02/2016 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
" झाडीपट्टी चंबल लागते" खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते लोकाइच्या मनाले फुटते पाझर येती असा मारा कुराड कोटी बी पानी भलभल लागते स्ययरात ते कईचेे गेले वापस आले नहीं! तुमची जमीन बाप्पा आमाले दलदल लागते आला घरी तई पोट्टा लडुलडु सांगे मायले झोपावले मले वो चिमन्याइचि कलकल लागते ------------ शब्दार्थ बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे, मिरगात= मृग नक्षत्रात तऱ्याची पार= तळ्याचा बाँध सब्बल= पहार कईचे= कधीचे कोटी बी = कोठे पण भलभल= धो-धो वाहणारे लडुलडु= रडत रडत --- स्वामी संकेतानंद

तपकीर गल्लीतला चिंधीचोर (पुणेरी)- (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 22/02/2016 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्र श्रेय- अभ्या.. --एक-- रेडियोच्या खरखरीने मला जाग आली. नेहेमीप्रमाणे. डोळे न उघडता मी शेजारी चाचपून बघितलं. अंथरूण गार होतं. आजी अर्थातच उठली होती. खाली सोप्यात जाऊन तिनेच रेडियो लावला असणार. "..तीनशेअठ्ठ्यातर अंश सात आठ मीटर्स, अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झवरून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज बुधवार. भारतीय सौर दिनांक..." सकाळचे सहाही वाजले नसावेत. बाजूची मोठी खिडकी आजीने उठतानाच उघडली होती. बाहेरच्या महानगरपालिकेच्या दिव्याचा उजेड पडद्यातून गाळून आत येत होता.

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 22/02/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १)

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
"विष्णू पुराण" म्हणते की, उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे.