Skip to main content

जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/05/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मला एका संपादक मित्राने विचारलं, ‘लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का?’ मी म्हणालो, ‘नाही.’ मी पटकन दिलेल्या ‘नाही’ उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘का?’ ‘कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी.

असे 'रामभाऊ' सगळ्या शाळांना मिळोत!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 15/05/2016 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
रामभाऊ आमच्या शाळेतले शिपाई. नाव रामभाऊ... घंटा वाजवायला, फाईली आणायला, फाईली पोचवायला, पालकांना विद्यारथ्यांचे वर्ग दाखवायला, साफसाफाई वगैरे अगदी सर्वच कामासाठी रामभाऊ! श्रीमुखात मोजून तीन-चार दात, कपाळाला स्तंभा सारखा उंच गंध, कदाचित टक्कल असावं, कदाचित म्हणतोय कारण त्यांना त्यांच्या त्या खाकी गांधी टोपी शिवाय कधी पाहिलेच नाही. दाढी एक एमएम वाढलेली, एका कानाला अत्तराचा कापूस, कंठाला अंगारा, पायात कोल्हापुरी, आता सर्वात महत्वाचं म्हणजे... त्यांचा एक खांदा दुसऱ्या खांद्यापेक्षा जरा वर असायचा नेहमी, त्यामुळे विशेषतः मागून त्यांना पाहिलं की नेहमी देव आनंदचा भास व्हायचा!

< < मजबुरी है > >

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 14/05/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

मन झिम्माड झिम्माड

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 14/05/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ होत असतानाच मागच्या वर्षी केलेल्या एका अशाच अचानक केलेल्या भ्रमंतीची आठवण आली, आंदर मावळच्या फिरस्तीची. मागच्या पावसात तसा दोनच ठिकाणी गेलो. एक माझ्या आवडत्या नाणेघाटात. जूनमध्ये जो पाऊस तुफ्फान बरसला नेमका त्याच वेळी मी नाणेघाटात होतो. त्यानंतर जो पाऊस गेला तो गेलाच. त्यानंतर मग ऑगस्ट मध्येच बाहेर पडलो ते मावळात जाण्यासाठी. आंदर मावळ म्हणजे मावळातल्या आंद्रा नदीच्या खोर्‍याचा भाग. हा भाग वेढलेला आहे तो आंद्रा, शिरोटे, वडिवळे आणि ठोकळवाडी अशा धरणांनी आणि उंच उंच डोंगररांगांनी. ४/५ महिने सोडले तर हा भाग तसा रुक्ष, दुर्गम, राकट असा.

माझा गाव

लेखक निलम बुचडे यांनी शनिवार, 14/05/2016 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या डोंगराच्या कुशीत विसावणारा ! खळखळणार्या नद्यांच्या, काठावर वसणारा !! मंदिरातील घंटानादातून, चैतन्य फुलवणारा ! साग्रसंगीत पूजेच्या, सुगंधात रमणारा !! परंपरांची कास धरणारा, रिवाजांचा मान ठेवणारा ! नव्या युगाचे स्वागत , उत्साहाने करणारा !! निसर्गाचे उपकार मानणारा, निसर्गाचा ठेवा जपणारा ! मुक्या जीव-जनावरांना, प्रेमाने वाढवणारा !! सत्याचा मान राखणारा, अन्यायाला ठेचणारा ! आणि उदार मनाने, क्षमा करणारा !! स्वाभिमान जपणारा, मान - सन्मान देणारा ! दुःखितांच्या वाटेवरही, फुले पसरवणारा !! *****----------******------------- Written by - Nilam Buchade.

३ सुत्रे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 14/05/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
हरयाणात हिस्सार रोड वर "लक्ष्मी प्रिसिजन" नावाचा एक कारखाना आहे..तिथे कामानिमित्त गेलो होतो कारखाना चालु असताना... तिथे गुप्ता नावाच्या एका बनिया समाजातल्या माणसाशी ओळख झाली व गप्पा सुरु झाल्या... हा समाज व्यावसायिक असल्याने त्याने ३ सुत्रे सांगीतली... १...साथी साथका..पैसा पास का.. २..वो सोना कीस कामका जो कान को काटे. ३..देन सच लेन झुटी... त्याचे निरूपणं असे... १...साथी साथका..पैसा पास का....आपणास अनेक दादा राम राम करणारे मित्र असतात..पण खरा मित्र तोच जो अडचणीच्या वेळी साथ देतो..नाहि तर म्हण आहेच.."फेसबुकावर हजार मित्र..बाहेर विचारत नाहि कुत्रं" पैसा पास का....म्हणजे व्यवसायात उधारी असते..अनेक

... काय म्हणतील!

लेखक रातराणी यांनी शनिवार, 14/05/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

अमलतास आणि आत्महत्या करणारे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 14/05/2016 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या रिज रोड वर शंकर रोड पासून बुद्ध गार्डन पर्यंत पसरलेले जंगल आहे. जंगलाचा चारी बाजूला भिंत आहे. हे वेगळे, भिंतीत कित्येक ठिकाणी भगदाड आहेत. गुज्जर लोक आपली जनावरे जंगलात चरविण्यासाठी या भगदाडांचा वापर करतात. रिजच्या बस स्टैंड वर तो उतरला. त्याच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत बायकोची एक जुनी साडी होती. भिंतीत पडलेल्या एका भगदाडातून आत जंगलात शिरला. दुपारचे १२ वाजलेले होते, त्यात मईचा महिना. ऊन मी-मी म्हणत होते. त्याचे सर्वांग घामाने भिजलेले होते. त्याच्या मनात विचारांचा काहूर माजलेला होता. आपल्या माथ्यावरचा घाम पुसत त्याने दूरवर पसरलेल्या जंगलावर एक नजर टाकली.