Skip to main content

राणी दुर्गावती वर लिहिलेली कविता हवी आहे..

लेखक राघव यांनी शुक्रवार, 01/07/2016 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस खाली नमूद केलेली एक हिंदी कविता शोधतो आहे पण सापडत नाहीये. नेट वर ४-५ ओळी सापडतात.. पण पूर्ण कविता काही सापडली नाही. कुणास माहित असेल तर कृपया सांगावी. कवितेचे बोलः "दुर्गावती जब रण में निकली हाथ मे थी तलवारें दो.." माहिती हवी असल्यास कोणता सदाहरीत धागा वापरतात का ह्याची कल्पना नाही. तसे असल्यास कृपया हा प्रश्न त्यात विलीन करावा ही विनंती. राघव

एक संघ मैदानातला - भाग १५

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 01/07/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.. --------------x--------------x---------- बाकीचे संघ हळूहळू येऊन बसत होते. स्पर्धेचा दुसरा दिवस असल्यामुळे सगळ्या टीम्स हजार होत्या. आमचा टाइमपास चालूच होता पण आम्हाला सगळ्यांना खर तर कोल्हापूर वि. वसई ह्या मॅचची उत्सुकता होती. सामने सुरू होत होते संपत होते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागत होते. एकूणच माहोल संथ ही नव्हता आणि फार धसमुसळाही नव्हता. जे जे जिथे जिथे हवं तसं तसं ते ते होतं... पण काही तरी मिसिंग होतं. आता शेवटची मॅच सुरू झाली होती. आम्ही वाट पाहत होतो ती ह्याच मॅचची...

सांस्कृतिक महाराष्ट्र

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/07/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. याच काळात साक्षरता संस्कृती व कला या क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे पुरातत्व पुरावे मिळतात. शैक्षणिक, धार्मिक व कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झाली. अजिंठा येथील लेणी प्रसिध्द आहेच. वाकाटक राजवटीनंतर काही काळ कलाचुरी घराण्याचे राज्य होते. नंतर चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव व शिलाहारांचे राज्य होते. काही काळ बहामणी साम्राज्य सुध्दा. छत्रपती शिवाजींकडून एकसंध महाराष्ट्राचा उदय झाला.

रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!

लेखक शान्तिप्रिय यांनी शुक्रवार, 01/07/2016 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली. तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले.

परत स्मार्टफोन!

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 01/07/2016 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
(अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'माझा पहिला स्मार्टफोन' या लेखाचा दुसरा भाग) आधीच्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे http://www.misalpav.com/node/27462 कलीयुगातले हजार वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाच्या घड्याळातला एक सेकंद असतो असं म्हणतात. यासारखंच एक नवीन समीकरण आता रुजू झालंय. आपल्या आयुष्यातल्या एका वर्षात तंत्रज्ञान एका युगाने समोर जातंय. या अनुषंगाने मोबाईल क्रांती विषयी बोलायचे झाल्यास, फक्त सहा महिन्यापूर्वी घेतलेला लेटेस्ट स्मार्टफोन तुम्ही अश्मयुगात असल्याची ग्वाही देतो.

चो..पली ३

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 01/07/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
चो.. पली बोलतोय, जरा त्रास देतोय परत "ओ.के. नावाला जागायला पाहीजे रे परेशान अली" हॅ हॅ हॅ. मला एक सांग ९२% मिळवलेल्या मुलाचे आय.आय.टी चे चान्सेस किती? "पवई कॉम्प चा चान्स ०.००३ टक्के नॉर्मल- भारत भर असलेल्या १७ आयआयटी मधे कुठलीही स्ट्रीम ०.३ टक्के" अग्गायायाया. जे आयला म्हणजे तुला भेटायलाच पाहीजे. " हे सुद्धा 'च' च्या बाराखडीत अडकला नाही तर" .................. तो आत आला. बाबा सुद्धा बरोबर होते. १.५ एकर शेती करणारा बळी राजा. दुष्काळी भागातला. कर्ज बाजारी.

कोलंबी घालून अळूची आमटी

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 01/07/2016 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबी घालून अळूची आमटी. . कोलंबी पुराणातला हा कितवा अध्याय बऱं?कितवाही असुंदेत.सगळ्याच अध्यायांसारखा स्वादिष्ट,चविष्ट.सौ.वसुमती धुरू यांच्या,एका पुस्तकात वाचलेला पण त्यात थोडा बदल करून केलेला प्रकार.शिवाय खोबऱ्यासह किंवा खोबऱ्याशिवाय करता येणारा.कोथिम्बिरीचीसुद्धा गरज नसणारा.माझ्या आवडीप्रमाणे कमीत कमी साहित्य लागणारा.

माऊली उत्सव

लेखक कवि मनाचा यांनी शुक्रवार, 01/07/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
|| माऊली उत्सव || विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं जगी नश्वरी नाही, इथे माझा राम देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा सोडूनी खेळ पाठी, हा उनसावल्यांचा चालतो मैलोन् मैल, जयघोष हरीनामाचा नाचतो मनडोलारा, नाद टाळमृदंगाचा वाहतो परमानंद डोही, वारकरी पंढरीचा मन होई रे प्रसन्न, कारणभाव सर्वसिद्धींचा तुका म्हणे तेथे

वात्रटिका - पे कमिशन

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 30/06/2016 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या पे कमिशनच्या वेळी किमान आठवड्याभर सरकारी केंटीन मध्ये पार्ट्या चालल्या होत्या. पण या वेळी २९.६.२०१६ला दुपारनंतर दिल्लीतल्या अधिकांश सरकारी केंटीन मध्ये शुकशुकाट होता. एवढेच नव्हे सरकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या दुकानांवर संध्याकाळी चहा-नमकीन, बिडी -सिगारेट, तंबाकू इत्यादी खाण्यासाठी बाबू थांबलेच नाही. मेट्रो मध्ये हि कुठलीच चर्चा घडली नाही. बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी. बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे दिनोंं कि सुरुवात झाली.

चो..पली २

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 29/06/2016 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
खालील प्रकटन मतमतांतराचा आदर राखुन,२० वर्षाच्या अनुभवावर आधारित. प्रतिसादात आलेला विषय अ‍ॅप्टीट्युड टेस्ट. अशा सर्व कल परिक्षा "सर्वसकटीकराण" ह्या सदरात मोडतात. ग्रॉस जनरायलेझशन. एक पेपर, सर्वांना सारखा. त्या पेपरातल्या मार्कांवरुन कॉमर्स, आर्ट्स, सायन्स कसे काय ठरु शकते? मुलांना त्यांचे क्षेत्र निवडायची मुभा असते, असावी. गोंधळ असेल तर माहीती द्यावी. पण कुणी तरी ३ रा एका पेपर वरुन तुमचे भविष्य ठरवणार आणि तुम्हाला सांगणार की मुलगा उपकरण अभियंता होणार? कहर आहे कळप प्रव्रुत्ती चा. ......... " ए बाबा तुला काय करायचे आहे? जे काय करायचे त्याची माहीती गोळा कर.फक्त एक कर.