एखाद्या ठिकाणाची आठवण करून देण्याची शक्ती वासात,गंधात, असते.
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या
माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला.
झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर
मेलेलं आढळलं.
रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात
“वास” करून राहिला होता.
निसर्गाने पृथ्वीवरच्या बहुतेक जीवांना वास अनुभवण्याची दिलेली क्षमता पाहून मला
निसर्गाचं कौतुक करावसं वाटतं.
मी,अगदी साध्या गंधाच्या सामर्थ्याचंही कौतुक करतो.
हा एक विलक्षण प्रकार अनुभवता येतो.
वास सौम्य ही असतो तसाच तो जहरी असतो.
काही गंध क्षणभंगुर असतात आणि काही वर्षानुवर्षे टिकून राहतात.
मिसळपाव