Skip to main content

सुरती लोचो/चाट

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 16/07/2017 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागे सुरती लोचो ची पाकृ टाकली आणि सर्वरचाच लोच्या झाला की राव!!! तेव्हापासून पाकृ टाकायला जरा बिचकतच होतो. पण आता सुरवात म्हणून हिच पाकृ परत टंकत आहे ती गोड मानून घ्यावी. लवकरच नविन पाकृहि पेश करीन. सुरती लोचो.... गुजराथ चे फास्ट फूड, स्ट्रीट फुड. बेसन हा मुख्य घटक. तसं बघायला गेलं तर हा ढोकळ्याचाच भाउबंद पण ढोकळ्याचे जसे साचेबद्ध तुकडे असतात तसं ह्या लोच्याचं नसतं.

ये कश्मीर है - दिवस आठवा - १६ मे

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 16/07/2017 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा आमचा दिवस खरं म्हटलं तर एक राखीव दिवस होता. काश्मीर खो-यात परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते हे माहित असल्याने मी मुद्दामच आमच्या वेळापत्रकात हा एक जास्तीचा दिवस ठेवला होता. खास असे काहीच आज आम्हाला करायचे नव्हते. येथून ९० किमी दूर असलेले श्रीनगर गाठणे आणि तिथे जाताना लागणारे अवंतिपूरचे मंदिर पाहणे एवढेच आजचे आमचे किरकोळ लक्ष्य होते. तेव्हा आम्ही उशीरापर्यंत लोळत पडण्याचा आनंद अनुभवला आणि सगळे आवरून हॉटेलात नाश्ता करून आरामात निघालो. पेहेलगामवरून श्रीनगरकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाच्या बागा आहेत.

पुस्तक

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 16/07/2017 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
ते पुस्तकच आहे. दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड. एकदा तू वाचलेलं. तू तिथं नसताना मी वाचलेलं. तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही. एकदा तू, नंतर मी. कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली मी तुझे डोळे वाचले. ते पुस्तकच आहे? अजूनही? दूर तुझ्या घरात ठेवलेलं काचेआड... -शिवकन्या

बाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 16/07/2017 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे मोठे चिरंजीव कागदोपत्री इंजिनियर झाले (कागदोपत्री बरेच काही होता येते पण .....कागदोपत्री बरेच काही होणे, ह ह्या धाग्याचा विषय नाही....) म्हणून आमच्या बाबांकडे गेलो.शनिवार असल्याने बाबांच्या मठात बरीच गर्दी होती,त्यात चिलिमवाले बाबा, कटोरीवाले बाबा, खापरवाले बाबा आणि जपमाळ वाले बाबा पण होतेच. आज बाबांच्या मठांत इतकी गर्दी पाहून मी जरा हबकलोच.पण मी पाय पळता पाय काढण्यापूर्वीच बाबांची नजर आमच्याकडे वळाली आणि बाबा म्हणाले..... बाबा : या मुवि.काय काम काढलेत? तसे तुम्ही आजकाल कामाशिवाय आमच्याकडे पण येत नाही.आज मूद्दाम का आलात? आम्ही : तसे काही विशेष नाही.आपल्या कृपेने मुलगा इंजिनियर झाला.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 16/07/2017 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन) गेले काही दिवस भारत आणि चीन मधले संबंध परत ताणले गेले आहेत. दोन्ही देशात परत एखाद्या युद्धाला सुरुवात होते कि काय अशी अवस्था निर्माण झाली. आता काय होणार हे तर कालच ठरवेल परंतु ह्यावेळच्या कात्कातीचे कारण ठरला तो सिक्कीम-आपल्या सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेला डोकाला ( ला म्हणजे खिंड)ह्या भागात चीन ने घुसखोरी करत सुरु केलेले रस्त्याचे बांधकाम आणि भारताने घेतलेला आक्षेप.साधारण गेले महिनाभर भारत आणि चीनी सैन्यात ह्यावरून तणाव आहे .

विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण

लेखक शरद यांनी शनिवार, 15/07/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण श्री. माहितगार यांच्या एका धाग्यात विश्वामित्राचा उल्लेख आला होता. याची कथा सगळ्यांना माहीत असेलच असे नाही. मनोरंजक आहे. प्राचिन काळी वर्ण बदलता येत होते याची ही कहांणी. गोष्ट विश्वामित्राच्या आधीच्या पिढीपासून सुरू होते. ऋचीक हा विद्वान ब्रह्मर्षी त्याचे लग्न गाधी या क्षत्रिय राजाची मुलगी सत्यवती हिच्याशी झाले. पतिपरायण सत्यवतीवर प्रसन्न होवून ऋचीकाने तिला वर मागावयास सांगितले. ही गोष्ट सत्यवतीने आपल्या आईला सांगितली. आई म्हणाली ’तुझे पती महान तपस्वी व समर्थ आहेत.

गायीचे आत्मवृत्त

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/07/2017 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी गाय आहे. माझ्यात देव वास्तव्य करत असल्यामुळे मला माणसाचं प्रबोधन करायचा हक्क आहे. म्हणून तर आता बोलायची हिंमत करते: मला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. राजस्थानात गाय आणि वासरूच्या जोडीला एकशे पाच रूपये अनुदान मिळतं तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या माणसांच्या जोडप्याला सत्तर रूपये मिळतात. वि. दा.

वेग आणि विस्थापन – एकाच नाण्याच्या दोन बाजू (Relation between Velocity and Displacement)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 15/07/2017 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
राजा विक्रम जसा वेताळाच्या भेटीसाठी निघत असे तस तस त्याला त्याचं विकट हास्य आठवून थरकाप होई पण त्यापेक्षा जास्त त्याचे प्रश्न ऐकून तो विचारात पडे. त्याप्रश्नांचा विचार करता करता वेताळाचं थरकाप उडवणारं रूप विसरायला होई. कधी कधी हा वेताळच आहे का पूर्व जन्मी शास्त्रज्ञ असलेल्या माणसाचं भूत आहे असेही विचार चमकून जात. “राजा फार विचार करतोस माझ्या पूर्वजन्माचा. तेवढा विचार माझ्या या प्रश्नाचा कर. एक माणूस एका दगडाला लाथ मारतो. दगडाला स्वत:ची बुद्धी नाही. तो पडून होता. लाथ मारली तेव्हा तो फरफटत गेला. मग या साध्या गोष्टीत तुम्ही विस्थापन, वेग, बल वगैरे भुतं का काढली? आणि त्यांना ओळखून काय मिळतं?

अनवट किल्ले १४: खोल खोल पाणी , वल्लभगड, हरगापुर ( Vallabhgad, Haragapur) आणि गंधर्वगड (Gandharvgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 15/07/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे -बेंगळुरू मार्गावरून बेळगावच्या दिशेने निघालो कि कोल्हापुरनंतर येणारे महत्वाचे गाव म्हणजे संकेश्वर. संकेश्वरच्या आधी तीन कि.मी. वर एक छोटीसी टेकडी दिसते, त्यावरच तटबंदीची शेलापागोटे चढवून त्याला किल्ल्याचे रुप दिले आहे, हा आहे "हरगापुर". पायथ्याशी असलेल्या वल्लभगड गावच्या सानिध्याने त्याला "वल्लभगड"असेही म्हणतात. वल्लभगडाच्या इतिहासात डोकावून पाहू. वल्लभगड नेमका कोणी बांधला याची निश्चित माहिती नाही मात्र वाचीव माहितीनुसार, कोल्हापूर प्रांतावर असणारा शिलाहारांचा अंमल पाहता हा किल्ला बांधण्याचे श्रेय देखील कोल्हापूर जिल्ह्यातील इतर किल्ल्याप्रमाणे शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते.

प्राक्तनाचे संदर्भ

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 14/07/2017 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्राक्तनाचे संदर्भ अस्तित्वाचे प्रश्न आसपास उत्तरांचे तुकडे साकोळत राहिलो सुदंर कोलाज करता येईल म्हणून प्रत्येक चौकटीत शोधत राहिलो आकार मनात आधीच कोरून घेतलेले ठरवून घेतलेल्या रंगासहित सर्जनचे सोहळे सहज नसतात माहीत असूनही सोयिस्कर दुर्लक्ष करीत गेलो बहरून येण्याआधी उजाड व्हायचं असतं याचं भान राहिलंच नाही ऋतू हलक्या पावलांनी येत राहिले त्यांच्या सोहळ्याना अनेकदा सामोरा गेलोही पण त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधी परतीला पावलं लागलेली असायची हाती उरायच्या विसर्जनाच्या देठ खुडलेल्या निष्प्राण खुणा स्वप्नाळलेल्या नेत्रात सुखांचे निर्झर शोधण्याच्या नादात ओथंबलेल्या पापण्यांची थरथर कळलीच नाही थेंबाना