Skip to main content

आबा (क्रमश)

लेखक शेवटचा डाव यांनी मंगळवार, 22/08/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत 'आबाा' यांंचावर बरच लिहल गेलय पण हे जरा वेगळ आहे चार भाग लिहतोय त्यातील भाग एक तिन्ही बंगल्यांच्या म्होर वावरात आबा बशेल व्हता
मन भरुन बंगले पाता पाता आबाला हुंदका आला आन आबान माग वळुन पाह्यल तसा आबा भूतकाळाच्या गर्द झाडीत शिरला
      "दादा य दादा"
दिगु न त्याच्या मोठ्या भावाला हाक मारलि
" काय झालर दिग्या "
विहरी जवळ गेलेल्या पुरुषोत्तम दादा ने वो देत प्रश्न केला
"आर पंकु बेसुध झालीय अन आबा अन भागु तिला दामुनानाच्या  बैलगाडी त घेऊन वैद कड नेताल "
 दादान सायकला टांग मारली अन तडक वैद्या कड गेला

तीन तलाक : सुप्रीम कोर्ट ने नक्की काय म्हटले

लेखक साहना यांनी मंगळवार, 22/08/2017 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय कोर्टे म्हणजे हल्ली विनोद झाली आहेत. काही दिवस मागे हाई कोर्टचा निर्णय सुप्रीम कोर्ट ने रद्द ठरवला कारण जजमेंट मध्ये जजला नक्की काय म्हणायचे आहे हे सुप्रीम कोर्टच्या जज ना समजले नाही. त्या निवाड्यातील एक परिसच्छेद खाली दिलेला आहे . [१] http://imgur.com/a/euxgg तर तीन तलाक च्या निवाड्याचे सुद्धा काही तरी तसेच झाले, नक्की निवाडा काय म्हणतो हेच काही वकिलांना सुद्धा समजले नाही. ३९५ पानाची जी जजमेंट लोक इतक्या लवकर वाचतील तरी कशी ? http://imgur.com/P6sT7QG निवाड्यातील काही मुद्दे असे आहेत १.

संस्कृती vs अंधश्रद्धा

लेखक योगेश कोयले यांनी मंगळवार, 22/08/2017 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझ्या मनातील द्वंद्व आहे काही दिवसांपासून.. शीर्षक कदाचित साजेसं नाही (मी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणारा विध्यार्थी आहे लेखनाबाबत अजूनतरी प्रगल्भता आलेली नाही) परंतु जे मला सांगायचं आहे त्यासाठी तेच बरोबर वाटतं! झालं असं आहे की या आठवड्यात गणपती येतायत सगळी कडे लगबग सुरू आहे.. घरी असतो आमच्या गणपती.. सुरुवात मीच केली आहे त्याची किंवा माझाच हट्ट होता त्यासाठी काही वर्षांपुर्वी.. त्यामुळे तयारीही माझ्याचकडे असायची.. साफ सफाई, सजावट सगळंच.. गणपती आले की एकंदरीत सगळं छान असतं, प्रसन्न वाटतं मग मित्रमंडळी, आप्तेष्ट, पाहुणे, आणि अगदी काही जवळची माणसे☺(ज्यांना इतर वेळी घरी बोलावणं अवघड) यांना आम

'गुलज़ार'

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 21/08/2017 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे! दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे! जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे! कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे! शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे! —सत्यजित

एक जिलबी आठवणींची

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 21/08/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक जिलबी आठवणींची पुर्वी दुरदर्शन आणी इतर टीव्ही वाहिन्यांवर फिलिप्स टॉप टेन , सुपरहिट मुकाबला , एकसे बढकर एक असे गाण्यांचे कार्यक्रम असत . यांमधे त्या आठवड्यात गाजत असलेली दहा हिंदी चित्रपटगीते प्रसिद्धीच्या क्रमवारीवर सादर केली जात . कधी काही कारणाने यातला कुठला एपिसोड बघता आला नाही तरी फारसे बिघडत नसे . कॉलेजच्या हॉस्टेलमधुन एखाद दुसरा फेरफटका मारला तरी वेगवेगळ्या रुम्समधुन ऐकु येत असलेल्या गाण्यांवरुन सध्याची टॉप टेन गाणी कुठली आहेत याचा अंदाज येत असे . ए. आर. रहमानच्या संगीताचे मायाजाल तेव्हा हळुहळु जनमानसाची पकड घेत होते .

लिखाण

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 21/08/2017 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

मोदी बरे ,अमित शहा वाईट ?

लेखक खाबुडकांदा यांनी सोमवार, 21/08/2017 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी वाजपेयीं जेव्हा कॉंग्रेसविरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी असत तेव्हा त्याना टिकेचे लक्ष्य केले जाई. तरी जनतेत त्यांची प्रतिमा मलिन होत नाहीसे पाहुन मग टीका करताना धोरण किंचीत बदलण्यात आले. त्यानुसार वाजपेयी सज्जन वा उदारमतवादी होते पण अडवाणी वाईट व असहिष्णू आहेत असा ओरडा केला जाऊ लागला. अडवाणींची उंची वाढतच राहिली. नंतर मोदींचा उदय झाला आणि अडवाणी हे सभ्य व समजूतदार असून मोदी हे समाजात फूट पाडणारे आणि हुकुमशहा असल्याचा शोध लावण्यात आला.

भाषण

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी सोमवार, 21/08/2017 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन) "मला भाषण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं बोलून जो माणूस भाषणास सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने भाषण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ भाषण चाललेलं असते. हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मंचाच्या समोरच बसलेल्या लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.