Skip to main content

"जलवंती"ची ओळख

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
"जलवंती" एक अजस्र नौका जी कधीही बुडणार नाही असा तिच्या निर्मात्याचा विश्वास होता "Titanic, can never sink" "Titanic" केवळ नौका नव्हे, हे एक स्वप्न! केवळ एका मानवाचे नव्हे तर नियतीला सतत आव्हान देणाऱ्या समस्त मानवजातीचे स्वप्न हि तिची कथा जलवंतीची त्या कलाकाराची त्या नौकेची जी कधीच बुडू शकणार नव्हती कधीच ! ! !

जलवंती

लेखक Shashibhushan यांनी शुक्रवार, 22/09/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
“जलवंती” च्या निमित्ताने साल आता नेमके आठवत नाही. १९९२ किंवा ९३ असेल. “Titanic” नावाचा नवीन सिनेमा आला होता. पाहिला. त्यात न आवडण्यासारखे काहीच नव्हते. प्रचंड आवडला.

स्वयंपाकातील आयुधं

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
खल आणि बत्ता करतात ठणाणा आम्हाला काहीतरी काम सांगाना  स्टोव्ह शेगडीला लागली घरघर ग्यास सिलेंडर आला घरोघर काड्याची पेटी हिरमसून बसली लायटरने माझी जागा पटकावली यांत्रिक युगाला झाली सुरवात जुन्या बुढयाना करुया बाद वीज नी यंत्रे रुसतात जेव्हा जुने ते सोने म्हणतात तेव्हा लहानपणीच हे बडबड गीत म्हणताना मजा यायची. तरीही त्यावेळच्या त्या स्वयंपाक घरातल्या आयुधांचे अनन्यसाधारण महत्व मान्य होतेच. मला अजूनही आठवत खास पाहुणे आले की माझी आई खास कॉफी करायची. त्यासाठी खल-बत्यातून मस्त वेलची कुटायची आणि खिसणीवर जायफळ खिसून ते त्या कॉफीच्या पाण्यात टाकायची. आमच्या लहानपणी सर्रास चहा-कॉफी मिळत नसे.

ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

लेखक मार्मिक गोडसे यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को...

कप्पा मनातला

लेखक गणेश.१० यांनी शुक्रवार, 22/09/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे ही जिव्हाळ्याच्या माणसांसारखी पण अगदी चिकटून असणारी गोष्ट. त्यामुळेच की काय घरातल्या कपाटापेक्षा मनातल्या आठवणींच्या कपाटात कपड्यांनी थोडी जास्तच जागा व्यापलेली असते. त्यातला हा थोडासा अस्ताव्यस्त पण गंमतीचा कप्पा. माझ्या सर्वात जुन्या आठवणीतले कपडे मला स्पष्टपणे आठवतात.. (ओरिजिनली) हाफ शर्ट आणि हाफ पँट -- पूर्वाश्रमीच्या फुल पँटची आमच्या शेजारच्या टेलरच्या दुकानातून निघालेली दुसरी आवृत्ती. त्यानंतरची आठवण म्हणजे दिवाळसणाला गावी जमलेल्या सर्व भावंडांना एका रांगेत उभे करून घातलेले, टेलरने त्याच्या टेलिपॅथीने अंदाज घेऊन शिवलेले, नवीन कपडे. साम्यवादाचं अगदी छोटं घरगुती उदाहरण.

गहन हे मर्म दु:खाचे

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 22/09/2017 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
गहन हे मर्म दु:खाचे उमजणे कठिण किती असते साचले युगांचे अवघे निमिषात अश्रुरूप घेते उफराटे गणित विषाचे समजणे कठिण किती असते मरण्यास पुरे इवलेसे जगण्यास कितीही कमी पडते शब्दांच्या निबिड अरण्यी बहरणे कठिण किती असते अमरत्व उमलण्या आधी का मरण विकटसे हसते
काव्यरस

अनवट किल्ले १९:वारणेचे वाघ, बहादुरवाडी( Bahadurwadi ) , विलासगड, मल्लिकार्जुन( Vilasgad, Mallikarjun )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 22/09/2017 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी वारणा नदी, हिच सीमा मानुन मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले. याच वारणेच्या खोर्‍यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या वाघाच्या काळजाचा माणुस जन्मला. याच परिसरात एक प्राचीन गड विलासगड किंवा मल्लिकार्जुन व मराठाकालीन भुईकोट बहादुरवाडी वसलेले आहेत. या धाग्यात त्यांचीच माहिती घ्यायची आहे. बहादुरवाडी या भुईकोटासंदर्भात दोन कथा वाचायला मिळतात. आधी त्या पाहु आणि मग भुईकोटाची सैर करु पहिली कथा अशी आहे कि, सुमारे ३५० वर्षापुर्वी आदिलशाहीचा ४०००० सुवर्णहोनांचा खजिना विजापुरकडे चालला होता.