Skip to main content

हैद्राबादी मटण बिर्याणी

लेखक मनस्वी यांनी मंगळवार, 01/04/2008 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो काल पॅराडाईज (हैद्राबाद) मध्ये हैद्राबादी मटण बिर्याणी खाल्ली! काय चव होती सांगू... काही केल्या डोक्यातून जात नाहीये. मस्त गरम गरम बिर्याणी... त्यावर अंड्यांचे काप... आत लुसलुशीत चमचमीत लज्जतदार मटण... जोडीला रायते... वा वा वा! माझ्या नॉनव्हेजीटेरिअन मित्र-मैत्रिणींसाठी खास पाककृती देत आहे... नक्की करून बघा. साहित्य : मटण (मध्यम तुकडे केलेले) - १/२ कि. बासमती तांदुळ (१/२ तास पाण्यात भिजवून) - १/२ कि. कांदा (उभा चिरून) - १५० ग्रॅ.

आयुष्य

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/04/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हणजे काय असतं देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....? खरं तर....

सुचना : गप्पाड्डा (आचार विचारांचे झटपट अदानप्रदान....)

लेखक मधु मलुष्टे यांनी मंगळवार, 01/04/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सतत काहीतरी नवीन देण्याच्या मिसळपावच्या उद्दीष्टाला धरुन आम्ही आपल्या लाडक्या संकेतस्थळावर "गप्पाड्डा" (गप्पांसाठी जागा/चॅट रुम) सुरु करायचे योजले आहे. अजून ही सोय पूर्णपणे कार्यांन्वित नसल्याने तुर्तास काही सद्स्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता आहे. तमाम मिसळपाव ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती.

वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)

लेखक एकलव्य यांनी मंगळवार, 01/04/2008 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
अथांग पाण्यात डोलणार्‍या नावा, अफाट आकाश, पानाफुलांनी लगडलेली झाडे आणि हिरवेगार गालिचे अशा या परिसरात मी अनेकदा स्वतःला विसरून जातो. माझ्या जीवनसखीलाही निसर्गामध्ये हरवून जायला आवडते त्यामुळे जरा कोठे संधी मिळाली आम्ही वॉशिंग्टनच्या त्रिस्थळी धाव घेतो. ही त्रिस्थळे म्हणजे नॅशनल मॉल, टायडल बेसिन आणि पोटोमॅक नॅशनल पार्क.

खयाली पुलाव

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 01/04/2008 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
या आठवड्याची पाककृती - खयाली पुलाव
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही एवढी व्हिस्की त्यात टाकली. "पाणी की सोडा?" त्याने विचारले. "काही नको." केशवसुमार म्हणाला. "म्हणजे? नीट घेणार की काय तू केशवा? त्रास होईल हो..." बेसनलाडू काळजीच्या स्वरात म्हणाला. "नाही... काही नको, म्हणजे काहीच नको. मी पीत नाही." "तू... पीत... नाहीस?" बेसनलाडवाने आश्चर्याने विचारले. "बापरे! म्हणजे तू अजिबातच.. अरे बापरे!

आज अचानक लाथ पडे ...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 31/03/2008 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना आज अचानक गाठ पडे... आज अचानक लाथ पडे नयन वळविता सहज कुठेतरि दिसले अंतरपट उघडे असता मनिमानसी 'तसे' मम अवचित दृष्टिस दृष्ट भिडे 'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे निसटुनि जाई संधीचा क्षण सदा तिचा संकोच नडे अयत्या वेळी अयत्या मेळी घडले हे भलतेच गडे दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे

भाग्यवान

लेखक सृष्टीलावण्या यांनी सोमवार, 31/03/2008 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
नक्की भाग्यवान कोण असतं असा मला सध्या प्रश्न पडला आहे. मी आम्हा भावंडांच्यात मधली होते. माझी मोठी बहिण बाबांची लाडकी आणि लहान भाऊ आईचा लाडका. त्यामुळे मला वाटायचे ते दोघेही भाग्यवान. लहान भावाला वाटायचे सगळ्यात लहान असले की सगळे हुकुम गाजवतात त्यामुळे सर्वांत मोठे होणे भाग्याचे. मोठ्या बहिणीला वाटायचे की मोठी म्हणून जबाबदारीची जाणीव लवकर येते त्यामुळे सर्वांत मोठे असण्यात हशील नाही. त्यापेक्षा शेंडेफळ होण्यात खरी मजा आहे. तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले होणे ह्यासारखे वाईट काही नाही आणि एकुलते एक अपत्य असणे ह्यासारखे भाग्याचे काहीच नाही.

लेखन मालिका

लेखक मनस्वी यांनी सोमवार, 31/03/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
खालील मत हे मिसळपाववर प्रस्तुत होणार्‍या लेखन मालिकांच्या प्रेमापोटी आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेपोटी आणि उत्सुकतेपोटी... (गैरसमज नसावा.) अहो वाट वाट म्हणजे बघायची तरी किती!! आज येईल पुढचा भाग... नाही उद्या नक्की येईल... नाही परवा येईल बहुतेक... या आठवड्यात तरी यायला हवा... ह्या महिन्यात येईल असं वाटतंय... पण छ्या... तात्यांचे रौशनी, सालस, धोंडोपंतांचे अच्युत गणपुले... एक ना अनेक! आम्ही मात्र ते वाचण्यासाठी इथे तिष्ठत असतो. मान्य आहे कामाच्या रगाड्यात नाही जमत एखाद्याला किंवा नाही बैठक जमत तशी जी त्या दुनियेत पुन्हा घेउन जाईल आणि शब्द न शब्द आपोआपच स्फुरेल... ह्रदयातून...

मी मराठी

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 31/03/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सार्‍या प्रसारमाध्यमांमधून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.