Skip to main content

अंतर

लेखक जयवी यांनी बुधवार, 30/04/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक हळवे…. कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.

गावांची नावं

लेखक भोचक यांनी मंगळवार, 29/04/2008 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्‍याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती.

ब्रह्मोत्सव

लेखक आर्य यांनी मंगळवार, 29/04/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मोत्सव रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला. तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव. तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/04/2008 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो. पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण). पण बर्‍याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो. खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल. फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात. मी सुरुवात करतो १) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्.येथे ओशो आश्रम तस

रस्ता-२

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 29/04/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.

अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..

आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!

ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले 

मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले

लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)

वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 29/04/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश असे आहेत:- १)रवि - दिनांक १४/०५/२००८ रोजी दुपारी ०३ वाजून ३३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. २) शुक्र- दिनांक २०/०५/२००८ रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. वरील राशीप्रवेशाच्या वेळा या मुंबई अक्षांश-रेखांशानुसार आहेत. आपला, (गणकभास्कर) धोंडोपंत