Skip to main content

वाचु आनंदे!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
वाचन, माझ्या सर्वात आवडिच्या छंदांपैकी एक. तसे म्हणाल तर ट्रेकिंग, पेन्सिल स्केचेस, लिखाण हे माझे सर्वात आवडते छंद आहेत, खालोखाल टपाल तिकीटे गोळा करणे, संगीत ऐकणे, फोटोग्राफि, नाणी-नोटा जमवणे हे आणि असे अनेक छंद मला आहेत. एकेका छंदा बाबत थोडं थोडं लिहिन म्हणतोय. तर वाचन माझा आवडता छंद! किती वाचले या पेक्षा काय वाचले हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं. मुळात आपल्याला वाचता येतं हि भावनाच किती छान आहे?? मराठी-हिंदि-इंग्रजी तर आहेच पण तोडकं-मोडंक गुजराती पण मला वाचता येतं. कदाचित तुम्हाला वाटेल, वाचता येतं! यात काय विशेष? तर मग जे निरक्षर आहेत त्यांचा विचार करा. आणि मग त्यांनी कधी पु.ल.

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 23/08/2008 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाता जाता मी शिलाला म्हणालो, "म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही." हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका सोडून कायमची इकडे राहयाला आली होती,हे तेव्हाच मला तिच्याशी बोलताना कळलं.प्रथम मी तिला ओळखलंच नाही.सहाजीकच आहे इतक्या वर्षानी पाहिल्यावर माणसाच्या चेहर्‍यात राहणीत जो बदल होतो तो पटकन लक्षात येत नाही.पण बोलण्याची ढब,हंसतानाची स्टाईल,चेहर्‍या

नाहि चिरा...नाहि पणती....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

फोड रे मटका...

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 23/08/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद हे काश्मिर सगळे, एकमेकां मारिती प्रश्न विसरूनी जनांचा, फोड रे मटका धुंद त्या पदकांत सगळे, सुवर्ण कवटाळती प्रश्न हरलेल्या क्षणांचा, फोड रे मटका धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती प्रश्न विकलेल्या मतांचा, फोड रे मटका धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड
Taxonomy upgrade extras

पालक भजी

लेखक Sanika यांनी शनिवार, 23/08/2008 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
२ कप बारिक चिरलेला पालक, १ कप बारिक चिरलेला कान्दा, १ इन्च किसलेल आल, ४-५ कढिपत्ता, १ छोटा चम्चा लाल तिखट, १/२ चम्चा हळ्द, १ चम्चा धणे पुड, पाव चम्चा गरम मसाला, १ छोटा चम्चा तीळ , १ छोटा चम्चा ओवा, मिठ चविप्रमाणे, १ कप बेसन्,तेल. ६ चम्चे तेल कडकडीत गरम करा.बेसन सोडुन वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि तेलाचे मोहन घालुन १५ मिनिटे झाकुन ठेवा. त्यात बेसन व थोडे पाणी घालुन सरसरीत भिजवा. कढईत तेल तापवुन खरपूस तळा. गरमा गरम पालक भजी आल घातलेल्या चहा बरोबर खा.

सल ...

लेखक मनीषा यांनी शनिवार, 23/08/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळते मनात काही सल हलकासा जागवी थरथरती पापण्यां वरती अश्रुंचे ओले मोती | त्या गूढ जलाशयावरी तरंग हळू उमटती जे खोल अंतरी काही अनामिक उमगत नाही | मेघ नभी दाटती कडकडती त्या दामिनी -हुदयात या धुमसती आवेग अनावर किती ? उसळते धूळही वरती दशदिशा कोंदून जाती पाचोळा वाटेवरती पाउल रोखिते धरती | बंध कसले बांधती? प्राणांस कसली भिती ? जोडण्या ईश्वरापुढती हे हात न माझे उरती |

भारनियमनाचा भार

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 23/08/2008 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा महावितरणाने सांगितले की पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत वीज भारनियमन अटळ आहे. ह्या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले होते की 'पुणे पॅटर्न' मध्ये युनिटमागे जास्त पैसे दिल्यास पुणेकरांना भारनियमन सोसावे लागणार नाही. त्याला बहुतेकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पुण्यात जास्त पैसे आकारून नियमित वीज देणे सुरू झाले(नक्की ना? चू. भू. द्या. घ्या.) हाच 'पॅटर्न' मग त्यांनी ठाणे, नवी मुंबईकरीता वापरला. त्यामुळे अखंडित वीज पुरवठा मिळेल असे वाटून जास्त कोणी ह्या विरोधात गेले नाही.