Skip to main content

"माय"

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 03/06/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधीमधी उगाचच वाटत राहतं, आपणही आभाळ व्हायला हवं होतं.. मायच्या फाटक्या नशीबावर, फाटकं का होईना.. पांघरुण व्हायला हवं होतं. पापणी होऊन अलगद, तिच्या आसवांना झेलायला हवं होतं.. तिच्या आयुष्यातल्या अंधारावर, चांदणी होवुन का होईना .. भरपुर पाझरायला हवं होतं. तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर, जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं.. राहुन राहुन मन खंतावतंय, एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन.. मनसोक्त रडायला हवं होतं. विशाल.

माझं काय चुकलं...?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 03/06/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतं अजुनही .... आपलं ते... कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं. तुझं पुन्हा पुन्हा, मान वळवून बघणं... आणि उधारीवर घेतलेल्या... सिगारेटच्या धुरात, माझं डोळ्यातलं पाणी दडवणं. तु विचारलं होतस का रे?

"आनंदी आनंद गडे!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 03/06/2009 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत. "आम्हाला पाहून तुम्ही समजला असालच" असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला, "हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्‍या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे." हे ऐकून मी म्हणालो, "बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं म

नारायणगावचा थरार!!!

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 02/06/2009 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे.

परब्रह्म

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 02/06/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रह्म विटेवरी | दोन्ही कर कटेवरी वाट भक्ताची पाहतो | देव पुंडलिकादारी संत जनाईच्या घरी | दळण कांडण करी ओव्या गातो भक्तासंगे | भावाचा भुकेला हरी देव एकनाथाघरी | कावडीने पाणी भरी सांभाळितो चोखोबाची | गुरे सावळा मुरारी तुक्याचे अभंग तारी | कान्होपात्रेला उद्धारी निवृत्ति, सोपान, मुक्ता| ज्ञानियाचा हात धरी दुमदुमली पंढरी | रिंगणात वारकरी नित्यनेमाने चालते | आषाढी कार्तिकी वारी संत मी ना वारकरी | आळविते तुला तरी आस मुक्तीची घेऊन | आले देवा तुझ्या दारी

क्रिप्टीकप्रतिपालक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 02/06/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी १ वाजता फोन खणाणला. मास्तरांचा होता. खरी तर ही मास्तरांची वामकुक्षीची नाहितर शेतसारा वसुल करायची वेळ, फोन उचलला तर पलीकडे काकू. "हे कसे तरी करत आहेत रे परा" काकू. आमचा अंदाज खरा ठरला म्हणायचे,मिपावरच्या एका लेखातील प्रतिसाद वाचुन असे काहीतरी होणार ह्याची खात्री होतीच. एकंदरीत माहीती अशी मिळाली. मास्तर प्रत्येक वाक्यात 'सर्वप्रथम' हा शब्द वापरत होते. त्यातल्यात्यात सर्वप्रथम शब्दानेच वाक्याची सुरुवात करायला बघत होते. दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले) मास्तरच्या फोन बुक मधे दोनच मिपाकरांचे फोन होते. १. परा २.

घर पहावं रंगवून!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 02/06/2009 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
घरात रंगकाम काढलं की सामानाची हलवाहलवी, झाकाझाकी, धूळ, आवाज आणि नंतरची आवराआवरी.. सगळं घर ढवळून निघतं अगदी. बर्‍याच हरवलेल्या वस्तू ह्या आवराआवरीत सापडतात तर कित्येक वस्तू आपण का जमवल्यात? असा प्रश्न पडतो. पण त्या फेकून देण्याऐवजी "असू दे, लागेल केव्हा तरी, होईल कशाला तरी.. " असं म्हणून जुने पत्र्याचे, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकचे चमचे, बशा, जुने कपडे परत खोकाबंद करून अडगवायला सज्ज होतात. ह्या सगळ्याचा धसका म्हणून की काय, जर्मनीत आल्यापासून 'घर रंगवणे' आतापर्यंत इतकी वर्षे यशस्वीपणे टाळले होते, पण आता मात्र आमच्या घरातील एक खोली अगदी रंगवायला हवीच होती.

आमची पिटर्सबर्गची यात्रा

लेखक चिन्या१९८५ यांनी मंगळवार, 02/06/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच आठवड्यात सेंट पिटर्सबर्ग(लेनिनग्राड) ला जाण्याचा योग आला.३०६ वर्षापुर्वी बांधलेले हे शहर अतिशय सुंदर आहे आणि ३०६ वर्ष ते तेथील लोकांनी जतन केले आहे हे त्याहुन महत्वाचे आहे.१७०३ साली पिटर या त्सार्(राजा)ने फिनलंड बरोबरचे युध्द जिंकले आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे शहर वसवले गेले.पिटरला यात खुप अडचणी आल्या आणि त्याला अनेकांनी विरोधही केला.पण तरीही पिटरने हे शहर वसवले.