Skip to main content

पावसाला विनंती

लेखक राजा यांनी मंगळवार, 16/06/2009 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाला विनंती
अरे अरे पावसा, तू पड भसाभसा तू पड भसाभसा वेडा झाला बळी राजा नको देऊ त्याला सजा वर पहाता पहाता, जीव झाला रड्कासा तू पड भसाभसा का रुसला आम्हावरी ? तुझ्याविना कोण तारी सा~या सजिवांचा देव, तुझ्यावरच भरवसा तू पड भसाभसा पुर्वी तानसेन राग म्हणायचा धो धो पाऊस पडायचा तु नाही पडला तर, सुर गवसेल कसा तू पड भसाभसा नद्या नालेही ओसरली तळे सुध्दा खाली झाली गुरं ढोरं वेडी झाली, जसा पाण्याविणा मासा तू पड भसाभसा तुझ्या विणा शेती नाही शेती विणा काम नाही पाण्याच्या
Taxonomy upgrade extras

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ६

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 16/06/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

या माध्यमांचं काहीतरी करा रे....

लेखक अ-मोल यांनी मंगळवार, 16/06/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
या माध्यमांचं काहीतरी करा रे.... टीम इंडिया २०-२० मधून बाहेर पडली आणि वखवखलेल्या माध्यमांनी रीतसर धोनी आणि कंपनीच्या डोक्यावर पराभवाचं खापर फोडलं. २०-२० क्रिकेट हे बरंचसं जुगार आणि नशिबावर अवलंबून आहे. त्या दिवशी तुमच्या चाली यशस्वी झाल्या, की तुम्ही जिंकणार. चुका करायला जवळपास शून्य जागा आणि १०० हून कोटी भारतीयांच्या अपेक्षेचे ओझे डोक्यावर घेवुन खेळणे सोपे नाही. गेली जवळपास दोन वर्षे धोनी आणि कंपनी विजयाचे मनोरे रचत आहे. तेव्हाही त्यांना नको इतके डोक्यावर घेवून नाचणारा हाच मीडिया होता. हल्ली वर्तमानपत्रांनाही चॅनल पत्रकारितेची इंगळी डसली आहे.

ठसे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/06/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
सुख माझे कसे, मलाच महाग झाले सोसवेना विरह , मन पिसे झाले जपले आजवरी मी, गे कसे हरवले अश्रु आज माझे, शुष्क कसे झाले वेदना मनीची नच, जाणिली कुणी भावनांचे आज, माझ्या हंसे झाले डोळ्यात साठलेले, प्रेम लुप्त झाले तुझे टाळणे मला, नित्य असे झाले आता आठवांचेही, वार दुधारी झाले शब्दांवर वेदनांचे, विकल ठसे झाले विशाल

मला आवडलेला फोटो

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 16/06/2009 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्ता नवी मुंबई पुरवणीतील एक छान फोटो. शाळेच्या पहिल्या दिवशी रडणार्‍या आपल्या मैत्रीणीचे एक मुलगी डोळे पुसुन तिला धीर देत आहे. मस्त फोटो. तुमच्या काही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी आहेत का ? अमोल --------------------------------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

इट्स मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 16/06/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा दिवस फारच धांदलीचा गेला. सुमारे १५० फोन आले. ३ सोडता बाकी सर्व 'आता आमच्या मुलांच्या भविष्याचे काय होणार' अशा प्रकारचे. जर 'पुण्य' नावाच्या गोष्टीवर विश्वास असेल तर आजुबाजुला असलेल्या १० वीच्या किंवा १२ वी च्या पालकांना लेखातील माहीती जरुर पोचवा. जर पोचवु शकाल तर तुम्हाला ह्या वर्षी आणखी काही 'पुण्य' करायची गरज नाही. १० वी मधॅ जर १०० मुलांना ९०% मार्क मिळाले तर तर त्या पैकी ५जण हेच यश १२ वी सायन्स मधे कायम ठेवु शकतात. आणि ह्या ५ पैकी फक्त २ जण सीईटी मधे १८०+ ला पोचतात. ह्या वर्षी सीइटी मधे फिजिक्स मधे मुलांची कत्तल झाली.

चित्रपट ओळख - गुडबाय लेनिन!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 16/06/2009 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपावर कम्युनिस्ट विरुद्ध इतर असा एक जबरदस्त कलगीतुरा रंगला होता. पब्लिक नुसतं तुटून पडलं होतं. बरीच राळ उडली होती. त्या निमित्ताने लहानपणी वाचलेली रशियन भाषेतून (बहुतेक अनिल हवालदार यांनी) मराठीत भाषांतरित केलेली पुस्तकं, एका मित्राच्या घरी (त्यावे वडिल सीपीआयचे मेंबर) येणारे सोविएत साहित्य (मासिकं, पुस्तकं) वगैरे आठवणी जाग्या झाल्या. मग काही दिवस जालावर कम्युनिस्ट विचारसरणी, सोविएत युनियन, पोलादी पडदा वगैरे बद्दल वाचत होतो. शीतयुद्धाच्या काळात पोलादी पडद्यामागचं जग खरंच कसं होतं हे कुतूहल तेव्हाही होतंच.

अगं अगं बशी..! - १

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/06/2009 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारणपणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट.. म्हणजे सार्वजनिक वाहतूकीची साधने कोणती ?? असा प्रश्न जेव्हा शाळेमध्ये विचारला जायचा तेव्हा अगदी न चुकता बस, टांगा, रिक्षा .. अशी यादी असायची. कारण मी शाळेत होते तेव्हा सिक्ससीटर, पिग्गि, मिनी बस असले प्रकार नव्हते. तुम्ही श्रीमंत असाल तर रिक्षातून जा.. नाहीतर टांगा, बस आहेच. इचलकरंजी मध्ये तेव्हा डेक्कन पासून एस टी स्टॅण्ड पर्यंत टांग्याची वाहतूक होती. म्हणजे गुरू टॉकि़ज पर्यंत १ रूपया आणि एस टी स्टँड पर्यंत १.५० रूपया. घोड्याच्या मागे असलेल्या टांग्यात बसायला खूप आवडायचं.