Skip to main content

मटाची सांगितिक दिवाळखोरी...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/07/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामध्ये स्वर्गीय भास्कर चांदावरकर यांच्याविषयी अग्रलेख आहे. मात्र त्यात त्यांच्या काही गाण्यांचा उल्लेख करतांना मटा संपादकांनी भावनेच्या भरात एक घोडचूक केली आहे.. सुरेश भट साहेबांचं 'उष:काल होता होता..' हे गाणं भास्कर चंदावरकरांचं आहे असा त्यात उल्लेख आहे. वास्तविक हे गाणं चंदावरकरांचं नसून पं हृदयनाथ मंगेशकरांचं आहे. विशेष गती नसलेल्या विषयात अग्रलेख लिहायला गेलं की असं होतं! मटाचा जाहीर निषेध.. आपला, (हृदयनाथप्रेमी) तात्या.

लांडगे आले रे .... आणि परत गेले

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 27/07/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
बावीस जुलैला सूर्याला लागलेले खग्रास ग्रहण शंभर वर्षातले सर्वात मोठे होते, तसेच चोवीस जुलैला मुंबईच्या समुद्राला शंभर वर्षातली सर्वात मोठी भरती आली होती असे त्या त्या विषयांमधले तज्ज्ञ सांगतात. या दोन्ही गोष्टी आपल्या छोट्या आयुष्यात आपल्याला पहायला मिळाव्यात हे आपले केवढे मोठे भाग्य? असे वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्यासंबंधीच्या बातम्या, लेख आणि चर्चा वगैरे गोष्टी गेल्या तीन चार महिन्यांपासून सर्व प्रसारमाध्यमांवर येऊ लागल्या होत्या. हळू हळू त्यांची संख्या वाढत गेली आणि तमाम जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्कंठा निर्माण करून ती पध्दतशीरपणे वाढवत नेली गेली.

रोगप्रतिबंधाच्या धोरणातला प्राधान्यक्रम

लेखक धनंजय यांनी सोमवार, 27/07/2009 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्लूच्या संदर्भात जो धागा निघाला, त्याच्या प्रतिसादात हा उपविषय निघाला. त्याबद्दल हा वेगळा धागा काढत आहे. त्या धाग्यात श्री. नितिन थत्ते यांनी विचार केला की वेगवेगळ्या रोगांना पायबंद घालण्यासाठी काय प्राधान्यक्रम द्यावा? हा प्रश्न खरोखर गुंतागुंतीचा आहे, आणि भावनिकही आहे. प्राधान्यक्रमासाठी काही निकष पुढीलप्रमाणे १. मृत्युदर : ज्या प्रमाणात रोग घातक (मृत्यूचे कारण) असतात, त्या प्रमाणात प्राधान्यक्रम असावा, असा एक विचार कित्येकांना सुचतो.

मदत हवी आहे...

लेखक पोलिसकाका_जयहिन्द यांनी रविवार, 26/07/2009 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
मला कोणाच्याही guestbook मध्ये लिहीता येत नाही. "You are not allowed to post in this guestbook." ही सुचना येते. कोणी उपाय सुचवेल का? धन्यवाद......