Skip to main content

कात्रज ते सिंहगड.

लेखक sandeepn यांनी बुधवार, 04/08/2010 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
जुलै महिन्याच्या सुरवातीला कात्रज ते सिंहगड असा ट्रेक करण्याचा योग आला होता. शनिवारचा दिवस होता. सकाळी ७ लाच जुन्या कात्रज बोगद्याच्या वरुन चढायला सुरवात केली. सकाळी सकाळी स्वारगेटवरून टमटम पकडुन आम्ही ८ लोक इथे पोहचलो होतो. आधिच ट्रेक खुप अवघड आहे असे सांगण्यात आले होते , पण उस्ताहाच्या भरात त्याचा सिरिअसनेस आम्हाला कळला नव्हता. पण पहिलाच डोंगर चढतानाच पुढच्या ट्रेक ची कल्पना आली.

एसटी पुराण

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/08/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
एसटी पुराण एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली.

अहंकार

लेखक दिलीपकुमार यांनी बुधवार, 04/08/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिळवली जरी सर्व सुखे , न मिळवावा अहंकार अहंकारातुन जन्मास येतात , क्षुद्र आचार विचार. कळे न तुम्हा कधी, बदलली तुमची नीती .

Ph.d मुंबई/पुणे,माहीती हवी आहे.

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 04/08/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
'अनुभवींनी मदत करावी' हा लेख लिहला होता.त्याबद्दल एवढच सांगतो की मी त्या रात्री सांगितल्याप्रमाणे धुडगुस घातलाच!! नाही,नकार नाही आला,एक वेगळे कारण होतं.आणि त्याच्या दुस-या दीवशीही लय म्हण्जी लय पिली.आनंदात व दु:खातही.आनंद Ph.d करायला मिळणार ह्याचा व दु:ख first class ५ मार्कांसाठी गेल्याचं! अजुन एक कारण होत्,ते जास्त खाजगी आहे.........असो. मला पुणे व मुंबई university ची Ph.d ला प्रवेश मिळवण्याची प्रक्रीया,प्रवेश परीक्षेत येणा-या प्रश्नांचे स्वरुप्,त्या परीक्षेसाठी अवश्यक पुस्तके व इतर सर्व अटी वगैरे माहीती करायच्या आहेत. इथले बरेचसे पुण्याचे/मुंबईचे आहेत व माहीतीगार आहेत,त्यांनी मार्गदर्शन क

तों.पा.सु का ?

लेखक जागु यांनी बुधवार, 04/08/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
आठवले का शाळेचे दिवस ?

“ घेतला वसा षंढतेचा ”

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 04/08/2010 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
“ घेतला वसा षंढतेचा ” आपल्याच लेकरांचे रक्त जेव्ह्ना सांडते, मातेचेहि उर तेव्ह्ना आक्रंदतांना फाटते “ सिमेपारचा ” दहशतवाद सोयीची भाषा असे, फोफावतो तो सर्वत्र येथे खंत त्याची आम्हा नसे . पाहतो उध्वस्त घरे, शहरे अन उष्ण रुधीरांचे सडे, तरीहि शिकवतो जगतां आम्ही षंढतेचे नैतिक धडे. पायघड्या पसरुनी अता स्वागत कसाबाचे करा, घेउनी षंढतेचा वसा, लांगुलचालन पाक्यांचे करा. . काय येवढे काश्मिराचे देश आपुला छोटा नसे, एक काश्मीर नाही म्हणोनी काय अडते फारसे ? निरंजन वहाळेकर

सैपाकाची पथ्ये

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 04/08/2010 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच झालेल्या चर्चांमध्ये आयटीमधल्या स्त्रियांना स्वयंपाक करता येत नाही, यावा का, यावाच का, वगैरेवर साधकबाधक आणि लंबीचवडी चर्चा झाली. पण मला या बाबतीत विषय थोडा व्यापक करायचा आहे. फक्त आयटी, किंवा फक्त स्त्रियाच का, स्वयंपाक सगळ्यांनाच करता आला पाहिजे. मधुशाला यांनी खालील मत मांडलं आहे, ते पटतं... "स्वयंपाक न येणं ही तुम्हाला एवढी साधी गोष्ट का वाटते? रोज आपण जे खातो ते बनवायला सुद्धा यावं असं का वाटू नये? कमीतकमी प्रयत्न तरी करता येईल की नाही???... आता जर असं असेल की एखादी अवघड गोष्ट येत नाही, उदा. पुरणपोळी, गुळपोळी तर समजू शकतो.