भटकंती गावाकडची २०२२-भाग १ : चांदवडची काही मंदिरे
लग्नानंतर गेल्या ३६ वर्षात दरवर्षी काही ना काही कामानिमित्त किंवा भेटीगाठींसाठी मुंबईहून गावी जाणे होतच असते. सुरुवातीच्या दहा वर्षांत बसने किंवा रेल्वेने होणारा प्रवास नंतर चारचाकीने होऊ लागला. पहाटे नव्या मुंबईतून निघालो की नाशिक-चांदवड-मालेगाव-धुळे मार्गे संध्याकाळपर्यंत जळगांव भागात पोहचायचे. आमची पहिली गाडी होती प्रीमिअर 'पद्मिनी". सेकंड हॅन्ड . इंजिनमध्ये दुरुस्तीचे काही काम करायची आवश्यकता असावी. दर १००-१५० किमीला रेडिएटरमध्ये पाणी टाकावे लागायचे. नाशिकच्या पुढे गेले की ऊन तापायला सुरुवात व्हायची. गाडीला वातानुकूल यंत्रणा नसल्याने खूप उकाडा व्हायचा.
मिसळपाव