Skip to main content

भटकंती गावाकडची २०२२-भाग १ : चांदवडची काही मंदिरे

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 21/03/2022 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नानंतर गेल्या ३६ वर्षात दरवर्षी काही ना काही कामानिमित्त किंवा भेटीगाठींसाठी मुंबईहून गावी जाणे होतच असते. सुरुवातीच्या दहा वर्षांत बसने किंवा रेल्वेने होणारा प्रवास नंतर चारचाकीने होऊ लागला. पहाटे नव्या मुंबईतून निघालो की नाशिक-चांदवड-मालेगाव-धुळे मार्गे संध्याकाळपर्यंत जळगांव भागात पोहचायचे. आमची पहिली गाडी होती प्रीमिअर 'पद्मिनी". सेकंड हॅन्ड . इंजिनमध्ये दुरुस्तीचे काही काम करायची आवश्यकता असावी. दर १००-१५० किमीला रेडिएटरमध्ये पाणी टाकावे लागायचे. नाशिकच्या पुढे गेले की ऊन तापायला सुरुवात व्हायची. गाडीला वातानुकूल यंत्रणा नसल्याने खूप उकाडा व्हायचा.

प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!

लेखक मार्गी यांनी रविवार, 20/03/2022 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!! नमस्कार. आपण सर्व कसे आहात? नुकताच कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्याबद्दलचे माझे विचार शेअर करतो. कदाचित आपल्याला काही मुद्दे पटतील आणि काही पटणार नाहीत. पण वेगवेगळे अँगल्स, विचार आणि दृष्टिकोन कमीत कमी विचारात तर घ्यायचे असतात ना. म्हणून हे शेअर करावसं वाटलं. कधी ट्रेकिंग, कधी फिरण्यासाठी तर कधी मदत कार्यासाठी कश्मीरला प्रवास झाले.

पुण्यात मेट्रो धावू लागली!

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 19/03/2022 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.

मुखवटे

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 19/03/2022 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
घरातून आलो माणसांच्या घोळक्यात अचंबित झालो पाहून नाना रूपे. सुख, दुःख, एकांत वेगळे प्रत्येकाचे मुकी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?" आकाश सम, जमीन विषम आहे हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे. शरीर सारखेच पण पांघरूण 'लायकी'नुसार माणूसकी सोडून सगळे बाकी जोरदार. हाव मनात व्यसन, पैसा अन् वासनेची भूक मिटते रात्रीपुरती, ओढ नाही झोपेची. कत्तली करण्यात मशगुल रक्तपिपासू ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू. घरी परत जायच्या वाटा बंद केल्या दया आणि करूणेच्या भावनाही मेल्या. यंत्र झालो नाही, माझ्यात आगच पेटेना अनोळख्या गर्दीत कुणी वाटाड्या भेटेना. जीव गुदमरला की माणूस तडफडतो मरणाच्या भितीने हातपाय मारतो.

ठेचेचा दगड

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 19/03/2022 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
दगडाची ठेच लागता रक्त येई पायात कशास होता पडला दगड असा रस्त्यात कितीतरी असे अडले असती ठेच लागून पडले असती परी न कुणी विचार करती फेकून द्यावा तो दगड कुठती असाच आला वेडा कुणी खाली वाकला तो झणी उचलूनी दगड तो पायी लांबवर कुठे फेकूनी देयी - पाषाणभेद १९/०३/२०२२
काव्यरस

माझी राधा - ३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 18/03/2022 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
भटियार चे स्वर मनामधे रुंजी घालत रहातात. त्यापासून एकदम बाजूला होता येत नाही. स्वरांना असं झट्कून टाकता येत नाही. आरोह अवरोहाच्या वेलबुट्ट्या मनात गुंजतच रहातात. बासरी ओठाला लागलेलीच आहे. मी त्यात स्वरांची फुंकर घालतो. मागील दुवा सा ध प म , प ग रे सा. पंचम गंधार घेत कोमल ऋषभावरुन षड्जावर येताना काही वेगळेच रंग डोळ्यासमोर उभे करतो हा राग. कोणी शोधला असेल. ज्या कोणी शोधला असेल त्याने तो अनुभव घेतला असेल. सामवेदात उल्लेख आहे याचा. पण संगीत हे अपौरुषेयच. अमूर्त. अनुभवायचेच. स्वर कानावाटे ऐकू येतात पण ते अंगात भिनतात. मग अलौकीक अनुभव देतात. बासरीचा नाद अनहत. तो तुमच्या रोमारोमात जातो.

नऊला दहा कमी

लेखक भागो यांनी शुक्रवार, 18/03/2022 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
नऊला दहा कमी चिंतामणी लोकल मधून उतरला आणि धावत सुटला. स्टेशनच्या घड्याळात पहिले. अरे बाप रे! नऊला दहा मिनिटं कमी. असाच पळत गेला आणि लिफ्ट वेळेवर मिळाली तर अजूनही वेळेवर ऑफिस गाठता येईल. चिंतामणी रस्त्याच्या कडेकडेन पळत होता. “एक्स्क्यूज मी प्लीज” म्हणत पळत होता.

१००व्या ईबुकचे लोकार्पण...

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 17/03/2022 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि धन्यवाद. १००वे ईबुक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. निमंत्रण आणि कार्यक्रम पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती. ह्या पुस्तिका रुपातील सादरीकरणात ९० टक्के पुस्तकातील विषय मिपावून आधीच सादर झाले आहेत.

बुरा ना मानो आज होली है !!

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 17/03/2022 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं उत्तेजक पण तरीही सवंग नसलेले , किंचीत कलात्मक, जरा वेगळं आपल्याला लिहीता येतं का याचा शोध घेतोय,कृपया हलके घेणे. मागे एक दोन बालकथा लिहील्या, त्या मलाच आवडल्या, त्यानंतर मोठ्यांनी काय घोडं मारलयं, त्यांच्यासाठी कथा नको का ? असा विचार केला....एक प्रयत्न... ----------------------------------------------------------------------- समोरची दारात रांगोळी काढत होती, दोन्ही हातात रंग घेऊन तो गेला. "ओह रंग....नको म्हणून" ती वळली, "असं कसं...

परदेशवारी-३

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 17/03/2022 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला दिवस अविस्मरणीय असतो मग तो कॉलेज मधला,नोकरीतला किवा आणखीन कुठलाही.तशीच माझी या नवीन शहरातली पहिली भ्रमंती.जमकर रॅगिंग झाली.आता वातावरणाची सवय झाली (Acclimatize).भ्रमणध्वनी पण मिळाला व घरातून NOC त्यामुळे भटकंतीचा उत्साह द्विगुणित झाला.