असाच अजुन एक प्रवास !
पोरीच्या इवल्या इवल्या डोळ्यांनी जाऊ नका जाऊ नका म्हणत असताना जड पाऊलांनी निरोप घेऊन टॅक्सी एअर-पोर्ट कधी निघाली.
तोच रस्ता , तीच वळण तेच सोपस्कार पार पाडून विमानात स्थिरवलो. विमानाच्या खिडकीतून बाहेर बघत मनातील निराशा हळु हळु वाढु लागली होती. ढगांचे काळे-पांढरे पुंजके जितके घट्ट होत होते तितकेच मनातील निराशेचे ढग दाटले होते. अधून-मधून जमिनीवरचे पाण्यचे तलाव डोळ्यात कवडसे खुपसत होते. जे खर तर सुंदर दिसायला हव होत तेच खुपत होत.
कसला कंटाळा आला आहे , कसली निराशा आहे हेच कळेना.
मिसळपाव