अध्यात्मातून समाधीकडे : काय चाललय आजकाल ?
बरेच दिवसात आपल्या सर्वांची खबर नाही
म्हणून लिहित आहे सर्वांना
कसे काय चालू आहे ? कोण कोण कुठे कुठे आहे ?
सकाळपासून रात्रीपर्यंत काय करता.
वेळ कसा घालवता, सगळं व्यवस्थित चालू आहे ना
परवा एवढे कावला का होतात ?
राणे भेटले होते परवा
कांद्याचा भाव पुन्हा चढणार म्हणत होते
पण या ७.२० च्या लोकलला आज काय झालं? आम्ही घरी कसं जायचं
जाऊदे तूम्ही बोला, कसे आहात घरी बंटी, स्वीटी बरे आहेत ना ?
पावसाळ्यापूर्वी नवे पत्रे घालून घ्या,
गणपतीला कोकणात का...
राजीव गांधी, नेहरू, अरुण नेहरू, वी पी सिन्घ, अझरूद्दीन,
सारेगामापा लिल चेम्प.
लाईफ बोय लुक्स निरमा.
मिसळपाव
आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.