Skip to main content

शाळेची वेळ

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 28/11/2011 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील बहूतेक शाळा ह्या दोन सत्रात भरतात. एक सकाळ सत्र व दुसरे दुपार सत्र असली त्यात विभागणी असते. विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने असे करावे लागते. या शाळांत प्राथमिक व माध्यमिक शाळा येतात. सकाळच्या शाळेची वेळ साधारणत: सकाळी ७ ते १२ व दुपारच्या शाळा ह्या दुपारी १२ ते ५:३० ह्या वेळात असतात. सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांना शाळा संपवून दिवसभर मोकळा वेळ मिळतो. ते विद्यार्थी या वेळेत घरी जावून, ताजेतवाने होवून दुपारच्या दरम्यान एखाद्या शैक्षणीक वर्गाला जावू शकतात. फावल्या वेळेचे छंद, वाचन, घरकाम करू शकतात. एखादा गरजू विद्यार्थी एखादे काम करून हातखर्चाला पैसे मिळवू शकतो.

भंगार, डबडा, पंचर आणि अजुन ही काही !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 28/11/2011 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्व-प्रकाशित वपुंच एक वाक्य आहे, की माणूस प्रेमात पडला रे पडला की सर्वात प्रथम काय करतो ते म्हणजे कविता आणी त्यांनी अशीच एका नवकवीची (आनंद बक्षी ..आपल हे..नक्षी...आपल हे..पक्षी : नव प्रेमीची ) कविता ऐकविली. ' देइन मी तुला इडली ' ' तु दे मला डोसा ' ' पाहिन कोणी आपल्याकडे ' ' तर देइन त्याला ठोसा ' अर्थात हे कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही आणि करुन घ्यायचे पण नाही !

क्रांतीतै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 28/11/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

एक बीचारे आण्णा

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 28/11/2011 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक बीचारे आण्णा, पोटात घेत नव्हते अन्नाचा दाणा, भ्रष्टाचार मुक्त करिन म्हणाले देश माझा शाहाणा. आण्णांच्या सभेला माणसं यायची खूप, भ्रष्टाचारी मात्र प्यायचे एसी मध्ये बसुन हॉट सूप, पीउन झाल्यावर सूप बोलायचे खूप, फोन आहे, वीज आहे, दूध आणि पाणी आहे, ह्या सार्र्या कारभाराचं मंत्रालयातच मंत्र्यांच मंडळ आहे, म्हणून आण्णा आमची इथे चंगळ आहे, आमच्या द्रूष्टीनं मात्र तुमचं बोलणं वंगाळ आहे. भर सभेतून उठला एक शाहाणा, अहो आण्णा देश होईल शाहाणा, पण कोण वीकत घेईल मी बनवलेल्या चांदीच्या वाहाणा? कोण जाईल शिर्डीला, कोण जाईल तिरुपतीला, मी मात्र जाईन लवकरचं, वैकुंठाला. आण्णा तुम्ही करताय सारं काही नीट, पण मला
काव्यरस