Skip to main content

मराठी भाषा दिवसानिमित्त

लेखक चिम् चिम् मामा यांनी सोमवार, 27/02/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठी भाषा दिवस... त्या निमित्ताने माझ्या काही कविता. वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली, सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली! माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत, कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत! माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी भावुक शब्दांनी यावे डोळ्यात पाणी! अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही, प्रत्येक जण आपली कविता त्यात पाही! मग, माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी, आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी ! http://bhagyaswap.blogspot.in/

माझा देश

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 27/02/2012 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझा देश (१) मी लहान असतांना वाचलय या देशात सोन्याचा धुर निघायचा निर्मळ पाण्याचे झरे दुथडी भरुन वाहनार्‍या नद्या सुरम्य निसर्ग, हिरवेकंच किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि आनंदाने मधुर गीत गातो एक वितराग मुनि साधनेत मग्न संतुष्ट दोघांच्या हि मनात लवलेष नाही द्वेष भावाचा माझा देश (२) कुठे गेला माझा तो देश मि शोधतोय त्याला आटलेले झरे आटलेल्या नद्यांचे भकास किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि मनातुन धास्तावलेला एक वितराग मुनि साधनेत मग्न अशांत राग, द्वेष, क्रोध,मत्सर.... कुठे
काव्यरस

Social Networking वरील निर्बंध....

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 27/02/2012 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार.... इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी.

मना घडवी संस्कार !

लेखक यशोधन वर्तक यांनी सोमवार, 27/02/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कार हा फार ट्रिकी शब्द आहे...कधी त्याला खोल अर्थ असतो आणि कधी ते अळवावरचे पाणी असते. संस्कार हे कोणावर कधीच लादता येत नाहीत किंवा " पास " अथवा " रिजेक्ट " लेबल सारखे चिकटवता नाहीत . संस्कार दिले जातात आणि ते योग्य रीतीने घेतले जातात असा संस्कारांचा वसा पिढी दर पिढी चालू असतो . पण मुळातच ज्या व्यक्तीवर हे संस्कार होतात ती व्यक्ती पुढे जावून याला किती महत्व देते यावरून त्या संस्कारांची व्याख्या नेहमीच बदलत असते ......कालमानानुसार संस्कारबदलत जातात ...शंभरवर्ष पूर्वी केले जाणारे संस्कार कालानुरूप बदलले , तर काही संस्कार सततच्या बदलत्या परिस्थिती देखील काळाच्या कसोटींवर खरे उतरले.

सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा

लेखक गणेशा यांनी सोमवार, 27/02/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा धगधगत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यल्गार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .
काव्यरस

दिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'

लेखक सागर यांनी सोमवार, 27/02/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचे घोषित केले. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला आणि हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.

" आज मराठी भाषा- दीन ! "

लेखक विदेश यांनी सोमवार, 27/02/2012 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धरला मी अभिमान मनीं "आज मराठीभाषा-दिन " मी मराठी तू मराठी बोलू सारे आज सुदिन ! सुरेख उत्तम वा वा छान म्हणत वाहवा करू - जमेल तेथे मायमराठी आपण जवळ करू ! मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस ! मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया ! मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक ! मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब ! मराठी नेता गरजला- व्हेरी गुड ! मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
काव्यरस

आठवड्यातून भरनारया बाजारासारखे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 27/02/2012 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
तो तुकड्या तुकड्याने फिरत असतो ह्या महानगरात तो राहत असतो कोठेतरी दूर....उपनगरात वसई ,बोरीवली ,कधीकधी विरारला अंबरनाथ ,कसारा ,कधी पुण्याला ,नाशिकला देखील पोटासाठी येत असतो पहाटे उठतो चारला ,पाचला, सहा किंवा सातला डबा भरते त्याची बायको रात्रीच भिजवून ठेवते कणिक पोळ्या भाजी नि कधी चटणी तो निघतो भल्या पहाटे ,सकाळी सकाळी नि स्वप्न बघत असतो उद्याच्या सुखाची पुढच्या महिन्यात असतो बायकोचा वाढदिवस एखादया मुलाचा किंवा मुलीचा देखील छोटा परिवार सुखी परिवार [?] घट्ट डोक्यात असते त्याच्या तरीही वेळ मिळत नसतो क्षणभर....!! किती तरी दिवसात तो बायकोला नाही घेऊन गेला सिनेमाला नाही कधी प्रेमाने बघितले त्याने
काव्यरस