Skip to main content

इंद्रधनुष्य

लेखक चुकार यांनी मंगळवार, 20/03/2018 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
रंगआंधळा इंद्रधनुष्य, शोधतो रंगाऱ्याला. म्हणे माझे रंगव डोळे, रंग येऊ दे जगायला.
काव्यरस

सोबत आणि सोबतीचे परिणाम 

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 20/03/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झाल असावं अस मला वाटत. मग हळूहळू पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं.

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 19/03/2018 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात. हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील. आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो.

प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 19/03/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ती आली होती फक्त एकदाच घरी एक वाटी दूध मागायला मला वाटले तिला दूध आवडते म्हणून गेलो म्हशी पाळायला खरी पंचाईत तेव्हा झाली जेव्हा कळले म्हैस व्यायल्याशिवाय दुध देतच नाही म्हशींसोबत एक रेडा बघितला बाप माझ्यावर जाम भडकला शिव्या देउनी खूप बुकलला व्यक्त केले मग मी पुढचे पत्ते सांगून टाकले त्यांना , भावी सुनेला दूध आवडते इकडे झाला उलट गेम रेड्याने धरला म्हशीवर नेम रेडा असा काही चौखूर धावला प्रेमाचा डाव बघता बघता उधळला बाप माझ्यावर भरपूर पिसाळला सुरु झालं घरी भलतंच महाभारत कसलं दूध अन कसलं प्रेम ? सरळ गेलो माघारी अन म्हशी दिल्या परत सिद्धेश्वर विलास पाटणकर

एक गाणे दूरवरुनी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 19/03/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाणे दूरवरुनी, निशिदिनी झंकारते पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट भिनत जातो नाद, मग अनुनाद येतो गर्जत लय अशी अलवार मजवर प्राणफुंकर घालते रोमरोमातून काही तरल मग ओसंडते मुक्तछंदी शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी
काव्यरस

.... बाकी तुमचं चालू द्या।

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 19/03/2018 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या! काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या! फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे.

काॅपी,शाळा,पोलिस अाणि सुंदर मुली वगैरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 19/03/2018 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच …. पूर्वी परीक्षा ही एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्यनं अध्यापना सारखीच साधी आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आलयं कारण या परीक्षाचे अधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले.त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अती हुशार, हूशार, मध्यमं,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले.मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली. त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले.

चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 18/03/2018 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्‍याचा उपयोग होऊ लागला आहे.