Skip to main content

विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 01/07/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही. (ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.) पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 01/07/2018 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

वाहनं आणि प्रवास

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/07/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे खेड्यापाडयातला पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांतून होत असे. अगदी लग्नाचे वर्‍हाड सुध्दा या गावातून त्या गावी बैलगाडीने निघायचं. घर ते शेत आणि आजूबाजूच्या चार- पाच मैलांवर असलेल्या खेड्यापाड्यात कामेकाजे जाण्यासाठी पायी चालण्याचा तो काळ होता. याच काळात इकडे कुठे कुठे सायकलीही दिसू लागल्या. त्यावेळी अनेक कर्मचारी रोज वीस- पंचवीस मैलांचा प्रवास आपल्या सायकलींनी करत असत. 30 ते 40 वर्षांपूर्वी या प्रदेशातल्या ग्रामीण भागात क्वचित मोटरसायकली सुध्दा दिसू लागल्या होत्या. जावा आणि राजधूत कंपनीच्या या मोटारसायकलींना ग्रामीण भागात फटफट्या म्हटलं जायचं.

जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!

लेखक निनाद यांनी रविवार, 01/07/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची. आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो. हं लिही, स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत! हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते. मुगाची डाळ एक किलो गुळ अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको.

संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 01/07/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ? या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा पुन्हा टिका करताना दिसतात. काय असतील या संघ विरोधामागची कारणे ? इंग्रजांविरुद्ध मोठ्या लढाईला सुरुवात झाली ती 1857 मधे. त्याचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले आणि झाशीच्या राणीसारखे संस्थानिक त्यात सहभागी होते. पुढे वासुदेव बळवंत फडकेंनी सशस्त्र लढा दिला. सर्वात कमी वयाचा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, तीन चाफेकर बंधू फासावर चढले.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ६

लेखक रा.म.पाटील यांनी शनिवार, 30/06/2018 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate your love..) कथा - ६ पाऊस.. (प्रेमाचा साक्षीदार..) तो तिला जाऊनच देत नव्हता.. त्याने तिचा रस्ता अडवला होता.. ती हतबल होती त्याच्यापुढे.. अशावेळी एखाद्या मुलाने हीरोगिरी दाखवत तिची मदत केली असती.. पण तिच्या शेजारचा मुलगा तरी काय करणार.. तोही हतबल होता त्याच्यापुढे.. कारण त्याचाही रस्ता अडवला होता त्याने.. पावसाने.. ती आणि तो दोघेही बसस्टॉपवर उभे होते..

आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 30/06/2018 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे. "९८१ भागिले ९ किती होतात रे?" कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. "कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे." ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.) “ह्या! त्याची काय गरज आहे? ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”तो म्हणाला मी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे.

काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .

लेखक Sanjay Uwach यांनी शनिवार, 30/06/2018 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी . मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली. सर्व जगात पृथ्वीवर स्वर्ग असेल तर काश्मीर असेल ,असे सांगणारा सम्राट किंव्हा ."काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ." अशा सारखी कानावर पडणारी भाषणे . . पाकीस्तानला उद्देशून त्यांना दम भरण्या साठी केलेली नेते मंडळीची विधाने .भारतीय सेनेचे असणारे काश्मीर मधील कायमचे वास्तव, या वर होणारी सादोदित चर्चा , तसेच धर्माच्या आधारे होणारी हिंसा.

दोसतार-१३

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/06/2018 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42845
विनू अरे हात पाय धूवून घे की. आणि हे दप्तर का असे फेकले आहेस? त्या स्लीपर अगोदर नीट कोपर्‍यात काढून ठेव. आई आतून बोलावत होती. तुला रात्री जेवायला ताम्दळाची खीर चालेल ना? कुई कुई.......... काय? कुई कुई काय . काय म्हणतो आहेस नीट सांग. कुई. परत तेच. मी त्या काळी कुत्रीच्या पिललांचा विचार करत होतो आणि त्या नादात आईला होय म्हणायच्या ऐवजी कुई कुई म्हणत होतो. आज बहुतेक ती पिल्ले स्वप्नातही येणार.
पुस्तके नसल्यामुळे शाळेचा अभ्यास वगैरे अजून काही सुरू झालेले नव्हते.