Skip to main content

दोसतार - १५

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 05/08/2018 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42996
आम्ही भूगोल आणि नागरीक शास्त्र एक करत समुद्राला उधाणाची भरती आणि ओहोटी येताना लोकप्रतिनीधींची कामे वाचून हसू लागलो. मराठी आणि भौतीक शास्त्रातील न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम क्रीया आणि प्रतिक्रीया या नेहमीच समान परंतु एकमेकंच्या विरुद्ध दिशेने घडतात. तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. हे वाचत राहीलो. मधली सुट्टी संपून नव्या तासाचे सर वर्गावर आले तरीही आमचे वाचन चालूच राहीले.
पुस्तकं उपलब्ध नसणं याचा दोनतीन दिवसातच सगळ्यांना कंटाळा आला.

रानभाजी महोत्सव2018

लेखक त्रिवेणी यांनी शनिवार, 04/08/2018 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
एका धाग्यावर श्रीमंत पेशवे यांनी विचारणा केलीय म्हणून इकडे वेगळा धागा काढला आहे. रानभाजी ४ थे वर्ष चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण आपल्या आदिवासी गावात दर पावसाळ्यात असते. या अशा गावात गेली ३ वर्षे जनजाती कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी ""रानभाजी महोत्सव"" अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते. आपल्याला माहीतही नाहीत अशा काही उत्तम पालेभाज्या या भागात श्रावण मासात उगवतात.

आज जडी-बूटी दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 04/08/2018 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 04/08/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २ मागील भागात आपण बिस्मार्कच जर्मनीत उदय (म्हणजे तेव्हाचा प्रशिया) आणि त्याचे जर्मन एकीकरणाच्या दृष्टीने सुरु असलेले प्रयत्न इथपर्यंत आलो होतो.

शांतीदूत भारत

लेखक Sarita Dyahadroy यांनी शुक्रवार, 03/08/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
शांतीदूत भारत भारत अमुचा जगात साऱ्या,विश्वशांतीचा देतो नारा , शांतीदूत हा, या जगताचा बहुधर्माचे बहुवंशाचे, भारतवासी एक दिलाचे, विविधतेत शोधून एकता पालन करिती सहिष्णुतेचे देव धर्म अन ऐक्याची, शिकवण एका गंगेची पवित्र गंगा आणि तिरंगा, वंदन करीतो भारत सारा शांतीदूत हा, या जगताचा हिमालयातून उगम पावती, अवखळ खळखळ नद्या वाहती, पावन तिर्थी मंगल क्षेत्री ,गंगेमध्ये विलीन होती, सवे घेउनी सर्व नद्यांना ,गंगा मिळते थेट सागरा, भारतदेशा दयासागरा,वैश्विकतेचा तुला किनारा, .

पाठमोरी

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 03/08/2018 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
"आपलं कसं है लक्ष्या, वुडलॅन्ड म्हनजे वुडलॅन्ड" "आत्ता पायात सेमच हाय की बॉस, पन जबरीय राव ट्रॅक्टरटायरवानीच दिसतंय बूट" "मग लका, दोन वर्ष बघायचं नाही आता, आधीचा कंटाळा आला राव. चल काढ गाडी" चकचकीत सफारीत बसताना काचेत स्वतःलाच बघताना मात्र कंटाळा येईना. काळा शर्ट, फिटींगची जीन, खाली वुडलॅन्ड्,डोळ्यावर रेबॅन. सगळा साज कसा रोजचा फिक्स. रेबॅनमागचे डोळे मात्र फिरायचे कायम.

अशीही एक गोष्ट

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 03/08/2018 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
अशीही एक गोष्ट कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली. "Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले. "Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली. रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली. **** मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा.

पावसाळी भटकंती: महिमानगड ( Mahimaangad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 03/08/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
माणदेशाच्या दुर्गभ्रमंतीमधे आपण आज महिमानगडाची सफर करणार आहोत. महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण ( दहिवडी ) तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा-पंढरपूर रस्त्यावर साधारण पुसेगाव सोडल्यानंतर अवतीभोवती उजाड माळरान दिसायला लागतं. हे माळरान आपल्याला माण तालुक्यातील महिमानवाडीपर्यंत सोबत करतं. महिमानवाडी हे या रस्त्यावरचं आणि गडाच्या पायथ्याचं गाव. याच वाडीतून डोंगररांगातून पूर्णपणे विलग झालेल्या गडाचं दर्शन विलोभनीय वाटतं. मध्यम उंचीच्या या गडाच्या सर्व बाजू ताशीव दिसतात.

i care for u

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 02/08/2018 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
" कसा आहेस ? " " तसाच . जशी तू सोडून गेलीस , तेव्हा होतो तसाच आहे . " " आपल्यात काही नव्हतं " " तुझ्याबाजूने . माझ्याबाजूने तर नेहमीच होत, आहे आणि राहील " " बाय द वे माझं लग्न झालं " " माहित आहे मला " " तू केलस कि नाहीस लग्न " " जिच्यावर प्रेम आहे तिचा अजून होकार आला नाही " " ओह्ह कोण आहे ती " " तू आणि कोण ? " " माझं लग्न झालय " " माहितेय मला लग्नाचं आणि डिवोर्सचही " तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं " तुला काय करायचं आहे ?

भाळी लाल कुंकु

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 02/08/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाळी लाल कुंकु गळ्यात काळे मणी अस्तित्व तुझे जाणवे साजणे क्षणोक्षणी * अंगणी रोज शेणसडा रेखते नाजुक रांगोळी जोडव्याचा तो पदान्यास भासे तू नाजुक कळी * सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजला *. तुळशी समोर तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं उजळते माझे जीवन अकुकाका