Skip to main content

गावातला आड

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/11/2018 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे पूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात). आड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं.

अतृप्त आत्मा -३

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
आता जयडी आमच्या गालावरुन हात फिरवतीये हे बघुन आमच्या बायडीचा मत्सर जागा झाला नसता तर आश्चर्य होतं.त्याही परिस्थितीत डोळ्यातल्या अश्रुंआडुन ? आमच्या कलंत्राने ते सर्व हेरलच.आणी खस्सदिशी जयडीचा हात बाजुला करुन हि बया हात फिरवत हमसायला लागली. च्यामायला ! अगं बया जिवंत असताना नाही कधी फिरवलास आणी आत्ताच का गं सुचलं तुला ?

अतृप्त आत्मा -२

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्यावेळाने कंटाळुन सिलींगवरुन आमचं द्रोण घेउन खाली उतरलो .म्हणलं बघु तरी आपण कसे दिसतोय ते . कालच बाबल्याच्या सलुन वरुन उधारीत दाढी आणी फेशियल करुन घेतलेलं.गोखल्यांची जयडी माहेरपणाला आलेली .ती आधीपासुनच झलक द्यायची आम्हाला.म्हणजे बॕचलर असताना इथे रहायला आलेलो तेव्हापासुनच.

Cold Blooded - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 15/11/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांचीही हत्या करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे ऐकून चारु नखशिखांत हादरली होती. रोहित बँगलोरला डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये आलेला असतानाची सारी चर्चा क्षणांत तिच्या नजरेसमोर फिरुन गेली! "मिसेस द्विवेदी, तुम्ही डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करता, राईट?" "येस!" चारु स्वत:ला सावरत उत्तरली. "तुम्ही आणि शेखर अमेरीकेहून परत येताना कोलंबियात थांबून बॅट्रॅकटॉक्सिन घेवून मुंबईला आलात, करेक्ट?" "येस! मी व्हेकेशनसाठी स्टेट्सला जाणार आहे हे कळल्यावर परत येताना बॅट्रॅकटॉक्सिनचा स्टॉक आणण्याची डॉ. मालशेंनी सूचना केली होती.

साहस

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी गुरुवार, 15/11/2018 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहस प्राची बॅकेत नोकरीस लागल्यापासून तिने फार सुट्टया घेतल्या नव्हत्या. रोजच्या धावपळीतून ती थकली होती. रोज घरातले आवरून बॅकेत जाणे, बॅकेत अकाऊंटचे काम करणे, रोजचे हिशोब ठेवणे यामुळे तिला खूप थकवा आला होता. तसंही तिच्या सुट्ट्या बर्याच बाकी होत्या तिने काही दिवस रजा घेऊन बाहेर गावी जाण्याचे ठरविले. तिने त्याच दिवशी बॅकेत रजेचा अर्ज केला आणि तो मंजूर देखील झाला. घरी आल्या आल्या तिने आई - वडिलांना आपण बाहेरगावी जात आहोत असे सांगून टाकले. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला गडचिरोली मधील एक नयनरम्य गाव सुचविले. तिही त्या ठिकाणी जाण्यास तयार झाली. तशी तिने तयारी देखील केली.

अतृप्त आत्मा -१

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 15/11/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री अचानकच आम्हाला आम्ही निवर्तल्याचं समजलं .म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो आणी आजुबाजुला थोडी कुजबुज ऐकु आली.हळुहळु कुजबुजीचं रुपांतर मुसमुसण्यात आणी नंतर गदारोळ आणी गोंगाटात झाले.त्यामुळे झोप चाळावली.डोळे उघडले तर आम्ही सिलींगला आणि द्रोण कॕमेरातुन दिसतं तसं दृष्य दिसायला लागलं. आम्ही अंथरुणातच अर्धी लुंगी वर गेलेल्या आणी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकात उताणे पडलेलो.आणी भोवती आमचे हवे नको ते सर्व नातेवाईक ,सगे संबंधी,मित्रमंडळी ,आमच्या उधार्या थकलेले बरेचसे वाणगट,गवळी ,न्हावी सगळे हजर. ओढुन ओढुन आणलेली सुतकी तोंड .काहींच्या मनातला आनंद न दिसताही जाणवत होता. च्यायला !

अस्थिकलश

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 15/11/2018 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
/ फाशीची कार्य वाही होण्या पुर्वि काही मिनिटे आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधू श्री दत्तात्रेय यांच्या कडे आपली अंतिम इच्छा प्रकट केली.. " जो पर्यंत सिंधू नदी अखंड हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले त्या साठी कितीही वर्षे लागोत..कितीही पिढ्या येवो जाओ तो पर्यंत माझ्या अस्थीचे विसर्जन करू नये.. श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर अस्थी कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडे सोपवण्यात आला नव्हता.. जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस

रमतगमत

लेखक शिवोऽहम् यांनी गुरुवार, 15/11/2018 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिंडताना दूर देशी, गर्द रानी हरवलेला कोणत्या वाटे इथे येऊन मज मी भेटलो निसरड्या वाटेवरी, हलकेच पाऊल टाकता मखमलीचा पायगोवा सोडुनी गुंगावलो वाटले विहिरीत वाकून डोकवावे मोडल्या चाहुलीने कोणत्या बोलाविले मज ना कळे वर्तुळे पाण्यावरीची स्तब्ध होऊ पाहता दिसत शेवाळातले आकाश निळसर बावरे घेता विसावा सावली पारावरी रेंगाळली ऊन कुरवाळीत होते कुरण हिरवे कोवळे दूर कोठे वाजणारी बासरी मी ऐकताना स्पर्शली कविता मनोमन मोरपंखासारखी सांजवेळी गोधुली घरट्यात पक्षी पावता मिटुनी डोळे सूर शोधत बैसलो तेजाळले

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

छकु

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 14/11/2018 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
छकु एकदा एक गंम्मत झाली.... माझी आईच शाळेत गेली. प्रयोग वही अपूर्ण म्हणून... हातावर पट्टी देखील ख्खाली; इंग्रजीच्या स्पेलिंगची; प्प्रॅक्टिस तिने नव्हतीच् केली... सरांनी 'ढ़ढ्ढोबा' म्हणताच मात्र, हिरमुसली झाली! 'छकुला नाव सांगिन....' अस मनातच म्हणाली; तेवढं म्हणून मग... माझ्यासारखीच खुश झाली. 'सारखा सारखा अभ्यास... मग खेळायचं कधी आम्ही? तुम्ही मोठे झालात..... आमच्यासाठी काही?' खूपसारं खेळून मग खूप खूप दमली; घरी येऊन एकदम 'हुश' करुन बसली. 'भूक लागली ग खूप छकु... खायला काय आहे? शूज काढून दे न....' म्हणे मी दमले आहे. 'अग तू आई नं... मग मी काय खायला देऊ?' म्हंटलं... शाळेत मिच जाईन...
काव्यरस