Skip to main content

तूच नव्याने घडशील काय

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 31/12/2007 07:28 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?
गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?

गेल्या वर्षातील दिवस जे सार्‍यांसाठी झिजलास
स्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील काय

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय

आरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोस
मग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?

Taxonomy upgrade extras

गाण्यांशी निगडीत आठवणी

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 31/12/2007 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील... ख्वाब हो तुम या कोई हकीकत.. किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे.

इथे अग्निपंख फुलले होते!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 30/12/2007 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
इथे अग्निपंख फुलले होते!... ... गावातल्या रस्त्याकडेचा मासळी बाजार फुलायला लागला आणि आसपासच्या झाडांवर पक्ष्यांचा वखवखलेला कलकलाट सुरू झाला. रात्रीच्या निवाऱ्यापुरती आणि पिलावळीच्या आसऱ्यासाठी काडीकाडी जोडून वाळल्या झाडांवर बांधलेली घरटी सोडून सगळे कावळे मासळी बाजाराकडे झेपावले. पलीकडच्या गल्लीतल्या अवाढव्य पसरलेल्या, जगण्याची आशा सोडलेल्या रुग्णाईत म्हाताऱ्यासारख्या चिंचेच्या झाडावरच्या बगळ्यांच्या थव्यांचे ध्यान मोडले आणि पांढुरके पंख पसरत घरट्यातल्या घरट्यात त्यांचा नाच सुरू झाला.

काय सांगू नवलाई

लेखक इनोबा म्हणे यांनी रविवार, 30/12/2007 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
या कविता मी संकलित केलेल्या असून मूळ कविची माहिती कवितेच्या खाली देण्यात आली आहे. काय सांगू नवलाई बाई,जाहले उन्मन उतरता पाण्यामध्ये लाज गेलीच वाहून. आता पदराशी माझ्या वारा करी हितगुज वेळी अवेळी वाजते मनामधे अलगुज. घर राहिले पाठीशी तुटे संसार पुरता काठावर यावे सांग सखे,कुणा ग करिता! कविता संग्रहः शब्द मनातले कवि: अतुल व्यं.देशमुख प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान © सौ.स्मिता देशमुख

शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 29/12/2007 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे.

विनायक परत आला.....

लेखक लबाड मुलगा यांनी शनिवार, 29/12/2007 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या 3 सदस्य आणि 6 पाहुणे आलेले आहेत. हजर सभासद प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सहज विनायक सुस्वागतम असेच येत रहा....

मन...

लेखक शब्दवेडा यांनी शुक्रवार, 28/12/2007 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन पाखरांची किलबिल ओल्या हिरव्या रानी.. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. मन मुग्ध वसंताची चाहूल मन बोचर्या शिशिरातील पानगळ.. मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन शोध सुखाचा दूरवर.. मन दु:ख दडलेले खोलवर.. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल...
Taxonomy upgrade extras

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 28/12/2007 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?