दिन विशेष
माननीय संपादक,
मिसळपाववर 'दिन विशेष' नावाचे सदर चालु करता येईल का?
ह्या सदरा मध्ये त्या दिवशी घडलेल्या घटना संक्षिप्त रुपात देता येतील.
शेखर.
माननीय संपादक,
मिसळपाववर 'दिन विशेष' नावाचे सदर चालु करता येईल का?
ह्या सदरा मध्ये त्या दिवशी घडलेल्या घटना संक्षिप्त रुपात देता येतील.
शेखर.
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे,
सावळे की गोमटे या मोल नाही फारसे...
तुमचा ह्या गोष्टीवर थोडातरी विश्वास आहे का?
असल्यास -
गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का?
किंवा
आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट सोडायला प्रवृत्त
करणार का?
तात्यांनी केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन... असा आदेश सोडला होता, पण मायदेशी परतण्याच्या गडबडीत खरोखरच टाईम जास्त गेला
आमची प्रेरणा नंदन यांची अप्रतिम कविता तिचे अभंग तिची गाथा..
एक तो 'वीकांत' | तेव्हाव्ही आकांत |
झोपाया निवांत | मिळेचिना ||
उशीरा झोपणे | उशीरा उठणे |
निवांत लोळणे | आळशी मी ||
हसावे मिशीत | थोड्याशा खुशीत |
उशी ही कुशीत | घोरताना ||
स्वगत
"बाबा तू येना... बाबा तू ये. मला तू हवाय""
इतकेच म्हणते ही फोनवर. दुसरे काहीच नाही!
काय करावे. मन हेलकावतय. जाण्याची इच्छा तर खूप आहे. पण कसे जमवावे...
इतके दिवस झालेत. इतके म्हणजे किती, तर ती बोबड्या बोलां नंतर चक्क व्यवस्थित बोलू लागलीय.
अरे मग त्यात काय? एका आठवड्यात होते ही प्रोसेस.
फक्त प्रोसेस? आठवड्यात होणारी एक प्रोसेस्?
किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते. मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे.
त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.
दि. २६ फेब्रुवारी २००८ - स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२ वी पुण्यतिथी!
मिसळपाव डॉट कॉमचा सदस्य झाल्यापासून खाद्यसंस्कृतीबद्दल मला जास्तच आस्था वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या अनमोल साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे हा लेख लिहिला आहे. वेळ वाचवण्यासाठी 'गागरमें सागर' म्हणतात ना तसे पांचशे पंचावन्न पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे ठरवले आहे.
हा माझा ई सकाळ्मधे प्रकाशित झालेला अजून एक लेख .चीनमधे राहत असताना लिहिला होता.
तो अजस्त्र पक्षी उंचावरची निळाई सोडुन अलगद ढगांच्या दुलईत शिरला तेव्हाच लक्षात आले की उतरायची वेळ जवळ आली. मस्तपैकी जांभई देत जरा आखडलेले अंग ताणले आणि मांडीवरचा कॅमेरा सटकता सटकता वाचला. संध्याकाळ होत आली होती. कॅमेरा हाती लागताच विचार चमकला, चला संधी मिळाली तर आज उडता सूर्यास्त टिपावा! मी कॅमेरा सज्ज करुन ढग पार व्हायची आतुरतेने वाट पाहु लागलो. मात्र आणखी थोडे खाली येताच भ्रमनिरास झाला. आज मळभ होते, आकाशात ढगांचे राज्य होते. सूर्यनारायण आज दर्शन द्यायला राजी नसावेत. अचानक काळ्या ढगांचा पडदा किंचितसा उसवला आणि झरोक्याला इंद्रधनुष्यी छटा देत सूर्यनारायण हळूच डोकावले आणि परत गायब झाले.
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपेक्षा त्यातल्या "कोटींची" चर्चा वाचून / पाहून बरेच विचार मनात येताहेत. आयपीएल नामक क्रिकेट-व्यापार आता सूरू झाला आहे. खर पाहिलं तर व्यापार हा समाजाच्या भरभराटीचा निर्द्शक समजला जातो. नफा कमावण्याचा मुख्यहेतू असुनही, रोजगार निर्मिती, क्षेत्रिय विकास, सामाजीक व पर्यावरणाचा विकास इत्यादि हेतू साध्य करायचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवायचे अभिप्रेत असते.
आयपीएल क्रिकेट-व्यापार काय साध्य करेल ?
क्रिकेटची प्रगती ? - क्रिकेट तज्ञच या बद्दल साशंक आहेत. आपण काय लिहीणार?