Skip to main content

समस्यापूर्ती : चारोळी ..........

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 27/02/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या कॉलेजच्या जीवनात आमच्या 'सांस्कॄतीक संघाची' एक 'पंच लाईन' होती. एकदम झक्कस .......
मला ती माझ्या ब्लोग वर टाकायची आहे पण मला त्या ४ ओळींपैकी फक्त ३ ओळीच आठवत आहेत, तर मला त्याची चौथी ओळ पूर्ण करण्यास मदत करा .........
मी हा 'मिपा' च्या 'चारोळीत्तम लोकांना ' दिलेला 'खो' समजावयास हरकत नाही ....

"जिज्ञासा आमची जननी आहे ,
-------------------------
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "

 

बोलट.

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 27/02/2008 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी!
शिर्षक पाहून गो॑धळलात? जुन्या जाणत्या लोका॑ना मात्र हा प्रश्न पडला नसेल.
बोलट, म्हणजे नक्की काय बुवा? तो आहे बोल्टचा अपभ्र॑श. आता तुम्ही म्हणाल "बर॑ मग? त्याच॑ काय इथे?"

तर म॑डळी त्याच॑ अस॑ झाल॑ की, काल स॑ध्याकाळी कचेरीतून राहत्या खुराड्याकडे एका॑तवासात जाताना  अचानक मनात मळभ दाटून आल॑...खुराड्याकडे जाव॑स॑च वाटेना. मग पावल॑ आपसुक वळली ती साकीच्या मैखान्याकड॑.
ह॑sss अजुन बोलटाचा गु॑ता काही सुटत नाहीय्ये नाही का? तर ह्या मैखान्यात मला बोलट भेटला.

डायलॉग

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 27/02/2008 11:12 या दिवशी प्रकाशित केले.

माझे एक काका आहेत त्यांना कोणी विचारले की काय, ठीक चालले आहे 
ना... की ते म्हणतात, अहो कसले काय... दात पांढरे झालेत, केस 
हलायला लागलेत... 

कधी म्हणतात... आम्ही जिलबीसारखी सरळ माणसे.. चाल्लयं कसेतरी.. 

असे त्यांचे संवाद झक्कास असतात. ते प्रत्येक वाक्याला हुकुमी टाळी 
घेऊ शकतात.

सरसेनापतींचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 27/02/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.

दिनांक २७ फेब्रुवारी २००८ - हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्तक सेनेचे सरसेनापती हुतात्मा ’चंद्रशेखर आझाद’ म्हणजेच चंद्रशेखर सीताराम तिवारी यांचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन.
प्रखर राष्ट्रवाद म्हणजे काय ते स्वा. सावरकरांनी दाखवून दिले, धगधगते हौतात्म्य म्हणजे काय ते हुतात्मा भगतसिंगाने दाखवून दिले, समर्पित जीवन म्हणजे काय ते नेताजी सुभाषांनी दाखवून दिले तर एका सेनापतीचा मृत्यू कसा असावा हे हुतात्मा आझादांनी दाखवून दिले.

काळा

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 27/02/2008 07:42 या दिवशी प्रकाशित केले.

तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याहि काळातील उदाहरण घ्या दोन रंगांनी मानवी समाजजीवनात एक विषेश स्थान पटकावले आहे. मानवी भावविश्व, अर्थविश्व, राजकारण, समाजकारण, काव्य, प्रतिभा अश्या नानाविध ठिकाणी या रंगानी आपला ठसा मानवाच्या आयुष्यात उमटवला आहे. तुम्ही ओळखलंच असेल हे रंग म्हणजे काळा आणि पांढरा

चूक१

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 26/02/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा माणूस१ यांची सुंदर कविता चूक

चूक, कुठे ही, सुधारण्याची संधी आहे?
माळ घातली, ही मरणाची नांदी आहे

रोज वेगळ्या मुली फिरवल्या श्रीमंतांच्या
सापडलो अन झाली ही लटकंती आहे

बोळे असती डाव्या-उजव्या कानामध्ये
घरात अमुच्या म्हणून इतकी शांती आहे

बायको घरी नाही, आता कशास डरणे ?
"कोण बोलले ?हा जरासा शिखंडी आहे !"

सावरकर - नवीन माहीतीपूर्ण संकेतस्थळ

लेखक विकास यांनी मंगळवार, 26/02/2008 20:32 या दिवशी प्रकाशित केले.

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी.  आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे. तेथे माहीतीवाचण्या व्यतिरीक्त एमपी३ मधे सावरकरांचे आणि त्यांच्यावरील इतर मान्यवरांची भाषणे ऐकण्याची व्यवस्था आहे. खाली टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी वाचा. (म.टा. ला काय झाले?)

केवळ मिपासदस्यांनी आवर्जून पहावे असे हे संकेतस्थळ वाटल्याने सावरकरांवरील आधीच्या चर्चेत घालण्याऐवजी वेगळे लिहीले आहे. - कृपया गैरसमज नको.

संकेतस्थळः http://www.savarkar.org

कवितासंग्रह

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 26/02/2008 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक काव्ये आली, त्यांनी आपल्या मनावर आपली छाप पाडली. त्यांना आपण चाली लावल्या. विडंबने केली गेली.

चला तर मग... आपल्या ऐकीवात आलेली किंवा स्वरचित काव्ये येथे मांडूनएक कवितांचा संग्रह करुया.
म्हणजे ज्या कविता अस्तित्वात असूनही कोणाकडून ऐकल्या अथवा वाचल्यागेल्या नसतील, त्या त्यांस येथे येऊन वाचता येतील.

मी सुरुवात करतो.

लायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,
प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,
पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,
जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.

भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,

गर्जा महाराष्ट्र माझा!

लेखक मनस्वी यांनी मंगळवार, 26/02/2008 15:34 या दिवशी प्रकाशित केले.

प्रत्येकालाच आपल्या मातीबद्दल अभिमान असतो. आपली मराठी माती म्हणजे आपला महाराष्ट्र!

खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण... पुणे, जळगाव, मुंबई, नागपूर, सोलापूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक एक ना अनेक प्रदेश, शहरे अन् खेडी!

चला तर मग गप्पा मारू आपल्या मातीच्या गप्पा.. ज्या तुम्हाला माहित आहेत.. इतरांना माहित नसतील कदाचित! छोट्या खेड्याबद्दल असेल, निसर्गसौंदर्याबद्दल असेल, तिथल्या माणसांबद्दल असेल, अनुभवांबद्दल असेल.. अगदी काहीही.. जे तुमच्या मनात त्या गावाबद्दल कायमचं घर करून बसलंय........