Skip to main content

विदर्भातला शेतकरी..

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 09/03/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे. बळीराजा हे आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार १) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला. कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत.

इक जरा छींक ही दो तुम - गुलजार ह्यांची अंतर्मुख करणारी एक कविता

लेखक व्यंकट यांनी रविवार, 09/03/2008 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
चिपचिपे दूध से नहलाते हैं आंगन में खड़ा कर के तुम्हें । शहद भी, तेल भी, हल्दी भी, ना जाने क्या क्या घोल के सर पे लुंढाते हैं गिलसियां भर के औरतें गाती हैं जब तीव्र सुरों में मिल कर पांव पर पांव लगाये खड़े रहते हो इक पथरायी सी मुस्कान लिये बुत नहीं हो तो परेशानी तो होती होगी । जब धुआं देता, लगातार पुजारी घी जलाता है कई तरह के छौंके देकर इक जरा छींक ही दो तुम, तो यकीं आए कि सब देख रहे हो । देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात प

पुन्हा पुन्हा..........काहि चमत्कारिक अनुभव.

लेखक अभिज्ञ यांनी रविवार, 09/03/2008 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
मि काहि वयाने फ़ार मोठा नाही,परन्तु अत्तापर्यन्त बरेचसे गमतिदार अनुभव माझ्या वाटेला आले आहेत. पण हेच अनुभव जर पुन्हा पुन्हा य़ायला लागतात तेन्व्हा मात्र हे काहितरि वेगळॆच घडते आहे असे लक्शात येते. मिच मुर्ख का बनतो असा मला नेहमिच प्रश्ना पडतो. त्यातलेच हे काहि चमत्कारिक अनुभव............ (अनुभव १) एखाद्याने होटेलात जावे आणि लगेच वेटरने येउन सम्पुर्ना होटेल झाडायला घ्यावे,असा अनुभव प्रत्येकास कधि ना कधि तरि नक्किच आला असेल. परन्तु हा असा अनुभव मला किति वेळा यावा? गेले १० वर्षे हा प्रकार मि सातत्यने अनुभवतोय.जवळपास ९०% वेळा मला हा अनुभव येतो. आपण चहा प्यायला एखाद्या अमृततुल्या मध्ये जावे,आणि लगिच

मी आणि माझा "संत ज्ञानेश्वर"

लेखक प्राजु यांनी रविवार, 09/03/2008 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मला इप्रसारणवर स्वरसंध्या या कार्यक्रमात "संत ज्ञानेश्वर" या विषयावर कार्यक्रम करायचा होता. तसं पाहिलं तर आम्ही(आदरार्थी एकवचन) पुणे आकशवाणीवर अक्कल पाजळत होतो आणि शब्दांचे कारंजे उधळ होतो. पण तिथे होणारे कार्यक्रम हे केवळ बाल बुद्धिशी निगडीत असत. त्यामुळे "संत ज्ञानेश्वर" या सारख्या गंभिर विषयावर कधी बोलण्याची वेळ आली नाही. तसे इप्रसारणवर इतके दिवस मी केलेले कार्यक्रम म्हणजे गीतकार, संगितकार किंवा गायक , एखादा अभिनेता यांच्याशी संबंधित होते. पण अध्यात्माची जोड असेल असा कार्यक्रम मी केलेला नव्हता.

आलबेल

लेखक सचिन यांनी रविवार, 09/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाच्या तरी पुतळ्याची कुठेतरी विटम्बना झाली म्हणून परवा आमच्याही गावामध्ये दङगल झाली ज्यान्चे नाव माहीत नाही कार्याबद्दल कल्पना नाही त्यान्च्या नावे मण्डळान्ची दगडफेकही खच्चून झाली बन्दोबस्त झाले, अश्रुधूर झाला आता सारे आलबेल आहे गोळीबारातल्या जखमी - मृतान्ची यादी देखील पुसट झाली

संडे स्पेशल (मिंटी मशरुम रोल्स)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 09/03/2008 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मशरुम आणि पुदिनाचा वापर करुन हे रोल्स स्टार्टर किंवा स्नॅक म्हणून करु शकतो. साहित्यः ४ उकडलेले बटाटे (मॅश करुन २ कप) २ ब्रेडचे स्लाईस कडा काढलेले (ब्रेड क्रम्ब्स) १/२ टी.स्पून गरम मसाला १/२ टी.स्पून लाल तिखट तेल तळण्यासाठी अंड्यातील पांढरा बलक थोडे ब्रेड क्रम्ब्स कोटींग साठी सारणः १ टे.स्पून बटर १५० ग्रॅम मशरूम बारीक चिरून (दिड कप) १/४ कप बारीक चिरलेला पुदीना १ मोठा कांदा बारीक चिरून ( अर्धा कप) मीठ, काळी मिरी पूड चवीनुसार १.बटाटे उकडून घ्या. गरम असतानाच मॅश करुन घ्या नाहीतर थंड झाल्यावर किसून घ्या. त्यात ब्रेड क्रम्ब्स, गरम मसाला, तिखट, मीठ घाला.
Taxonomy upgrade extras

मैत्री ..

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला आपल्यावर जीवापाड प्र

मोबाइलच्या आगमनाने..

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलच्या आगमनाने खरच मोबाइलच्या आगमनाने खरच एक मोटी क्रांती झाली, प्रेम करणार्यांसाटी तर इन्स्टंट मा़द्यमांची सोय झाली. असे प्रेमी अगदी सकाळ्पासन मोबाइलवर बिझी असतात मोबाइल-टु-मोबाइल फ्री स्कीमचे, ते गाडे अभ्यासक असतात..... रींगा रींगाचा खेळ सतत खेळत असत्तात बिचारे मिस कोलचे सुद्या यांचे असतात इशारे.. घ्ररात कुटेही सहज दिसणारे, यांचे मोबाइल अचानक गायब होतात येणारे मेसेज कुणी वाचु नयेत, अहो हेच त्यांचे प्रयत्न असतात... तसे हे मोबाइलप्रेमी देखील, काही कमी हुशार नसतात, घरी असल्यावर मात्र न विसरता, मोबाइल सायलेंट मोड वर टेवतात..... नेट्वक्र नसल्यावर मात्र, यांचे तोंड पाहण्यास

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही .....

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही ..... कितिहि सुदर मुलगी दिसली तरी, तीचि स्तुति करुन तिला हरबरयाच्या झाडावर चढ्वायला आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥ म्हणुन आम्हाला प्रेम... कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कोणिजर आवड्लिच तर स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला आम्हाला कधि जमलेच नाहि ॥३॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. दुसरयाचे विचार ऎकत असतांना आपले विचार मांडण्याचि संधि आम्हाला कधि साधताच आली नाही ॥४॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाही यावेतिरिक्त दुसरे काही आम्हाला ऎक