लेखकडॉ.प्रसाद दाढेयांनी बुधवार, 29/10/2008 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालच बहुचर्चित 'वेन्स्डे' चित्रपट पाहिला. निव्वळ अप्रतिम आहे. सुजाण रसिका॑नी अवश्य पहावा.
हा चित्रपट केवळ दीड तासाचाच आहे. गाणी, हिरो, हिरॉईन, कवायत नृत्ये नाहीतच. अनुपम खेर व नसरूद्दिन शाह या॑च्या कसलेल्या अभिनयाने चित्रपट अपेक्षित उ॑ची गाठतो हे सा॑गण्याचीही गरज नाही.
सध्या सगळ्या जगाला ग्रासणार्या इस्लामी दहशतवाद ह्या समस्येवर हा चित्रपट आहे. दिग्दर्शकाचा (नीरज पा॑डे) या विषयाचा व एकूणच अतिरेकी आणि त्या॑च्या विरूद्ध लढणार्या पोलीस य॑त्रणेच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास सतत जाणवत राहतो.
लेखकचाफायांनी मंगळवार, 28/10/2008 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये. तरी आम्ही बारके सारके योध्दे आहोत मदतीला. त्याचे अखंड धुम्रकांड फ़क्त तेजुच्या घरी किंवा तेजु हजर असताना तीही संदेश आणि तन्मय सह असेल तेंव्हा बंद असते. त्यालाही एक कारण आहे.
एकदा अशीच आम्हा सगळ्यांची एकत्र मैफ़ील आटोपल्यावर एक दोन दिवसानी तन्मय म्हणजे तेजुचा मुलगा एकटाच चित्र काढत होता.
लेखकमूखदूर्बळयांनी मंगळवार, 28/10/2008 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या व्याख्या आत्तापर्यंत खूप खूप केल्या गेल्या असतील.जर एखाद्या शिघ्र कवीला विचारल तर तो तितक्याच शिघ्रपणे उत्तर देइल, ' प्रेमभंग म्हणजेच प्रेम'.जर कोणा विज्ञान शिक्षकाला विचारल तर तो प्रेमाचे गूणधर्म, रचना, उप-युक्तता यावर तासाची बेल वाजेपर्यंत व्याख्यान देइल.जर कोणा मध्यमवर्गीय (अर्थातच व्ही आर एस वाल्या) मराठी माणसाला विचारल तर तो म्हणेल दर साल दर शेकडा ८ टक्के दराने वाढते तेच खरे प्रेम. जर कोणा चित्रपट कलाकाराला विचारल तर तो म्हणेल ' दर वर्षी जे बदलते (म्हणजे प्रेम, प्रेयसी नव्हे) तेच प्रेम होय'.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी मंगळवार, 28/10/2008 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचे इंग्रजी आणि गणित हे दोन विषय एकदम पक्के होते.आईचे सर्व घरगुती व्यवहाराचे हिशेब ते तोंडीच करत.२ ते ३० पर्यन्तचे पाढे,पावकी निमकी,पाउणकी ,सवायकी,दीडकीचे पाढे तोंडपाठ असल्याने गुणाकार,भागाकार,बेरीज आणि वजाबाकी हातचा मळ असायचा.
लेखकविकासयांनी मंगळवार, 28/10/2008 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच याहूच्या संकेत स्थळावर गेलो होतो आणि एक सुखद धक्का बसला!
त्यांच्या गृहपर्णावर (होमपेजवर भारतासाठीचे जे .in आहे त्यावर आहेच पण हे जगाचे मुख्य पान...) चक्क याहू या अक्षराच्या अलीकडे दोन लुकलुकत्या पणत्या आणि दुसरीकडे "हॅपी दिवाली" असा संदेश. त्याच्यावर टिचकी मारल्यावर दिवाळीवर विशेष माहीती मिळाली.
वास्तवीक अशी रेखाटने मी गुगलच्या प्रमुखपानावर कायम पाहीली आहेत पण दिवाळीसाठी मात्र दिसले नाही...
लेखकसर्वसाक्षीयांनी मंगळवार, 28/10/2008 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
कारापुर हे कर्नाटकातील एक छोटेसे खेडे. बंगलोर पासून २२० किमी तर म्हैसूर पासून ८० किमी अंतरावरचे हे छोटेसे गाव नागरहोळ्ळे अभयारण्याच्या दक्षिण पूर्वेस वसलेले आहे. इथे एका खाजगी विश्रामगृहात एक दिवस मुक्काम करून आम्ही पुढे मडिकेरीला जाणार होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर सुमारे २० किमी सामसूम भागातून प्रवास केल्यावर आम्ही मुक्कामावर पोचलो. खरेतर आमचा १० जणांचा चमू होता. आम्ही बंगलोरहून म्हैसूर व तिथुन कूर्गला जाणार होतो, पण मेव्हण्याच्या एका मित्राने आम्हाला कबिनी विषयी आग्रहाने सांगितले. वास्तविक अशा ठिकाणी जायचे म्हणजे मला पर्वणी!
लेखकविसोबा खेचरयांनी मंगळवार, 28/10/2008 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील उभा-आडव्या-सरळ-तिरप्या अश्या कुठल्याही अक्षरात बसत नाही असे नम्रपणे नोंदवू इच्छितो..! :)
'अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग..'
रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..!
रघुनंदन पणशीकर..
'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द!
लेखकसहजयांनी मंगळवार, 28/10/2008 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्याची गोष्ट. आता दिवाळी, खरेदी, आवराआवर, गाठीभेटी अश्या वातावरणात घडू नये अशी एखादी तरी घटना घडतेच. व ती घडली. ओळखीच्या एका व्यक्तिचा अपघात. ही व्यक्ती खूप जवळची अशी नाही पण जे घडले ते काही डोक्यातुन जात नाही. म्हणुन इथे उतरवण्याचा खटाटोप.
ही व्यक्ती तरुण. नुकतेच ३ महीन्यापुर्वी लग्न झालेले. पेशाने डॉक्टर. अपघात झाला, दोन्ही पाय गेले. अपघात झाला तरी कसा? समोरुन रेल्वे येतीय हे दिसतेय तरी रुळ ओलांडून जायची घाई. असे अनेकदा केले असणार आयुष्यात. नेमकी वेळ यायची होती. झालं पाय अडखळून पडला; वेळेत उठू शकला नाही.