Skip to main content

सफर - किल्ले तोरणा

लेखक येडाखुळा यांनी मंगळवार, 24/08/2010 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, गेल्या शनिवारी मी किल्ले तोरणा येथे जाऊन आलो. एकदम मस्त ट्रेक झाला माझ्या जुन्या मित्राबरोबर.. तोरण्याची माहिती सर्वांना असेलच तरीही जुजबी ओळख करून देतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा गड घेतला. कानद खोर्यातला हा सर्वात उंच किल्ला. ( आणि कदाचित पुणे जिल्ह्यातला सुद्धा..चू.भू.देणे घेणे ) पूर्वी हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता आणि अगदीच दुर्लक्षित अवस्थेत होता. म्हणजे राजांच्या ताब्यात आल्यावरच याचं भाग्य उजळलं असं समजायला काही हरकत नाही. अतिशय उंच आणि बेलाग किल्ला आहे हा.

रक्षा हेच बंधन

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/08/2010 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचं रक्षण करायचं म्हटलं की रक्षणकर्त्याला चांगलं चुंगलं अन्न भक्षण करुन बॉडी कमवावी लागते. परंतु आजच्या सुप्परफास्ट युगात बहुतेक तरुण बंधूराजांचं फास्टीँगच होत असतं. तरीही येनकन प्रकारे जगातील सगळेच बांधव जर बॉडी बिल्डर झाले तर सर्वांचा भगिनीवर्ग सुरक्षित राहील अन् आरक्षितही! एखाद्या बहिणीकडून औक्षण करवून घेतले की तिचे रक्षण करणे भावाचे कर्तव्यच असते. आजकाल बहुतेक कुटुंबे ही त्रिकोणी राहण्यातच समाधान मानतात. अशा कुटुंबातील एकल भावांना बहिणीँचा हट्ट, मस्करी, रुसवे फुगवे काय डीव्हीडी लावून दाखवायचे? येत्या काही दशकात हेही करावे लागेल की काय कोण जाणे?

मिपा टॉप २५

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 24/08/2010 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा टॉप २५ मधील सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्य म्हणजे सर्वोच्च पंचवीसांत दोन-दोनदा सहभाग असणारे अदिती, आणि सुधीर काळे ह्यांना ह्यापी बर्डे देखील !!! प्रथम क्रमांकावर असलेल्या चोता दोन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा.

शाळा रे शाळा

लेखक भीडस्त यांनी मंगळवार, 24/08/2010 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
'अगं बायांनो तुमच्या एकेकीच्या एका वर्षाच्या फीत माझं बालवाडीपासून ते बी.डी.एस. पर्यंतचं पूर्ण शिक्षण झालंय ग'.अस्मादिकांच्या दोन कन्यारत्नांच्या दर शालेय वर्षाच्या सुरुवातीस त्या बिचार्‍या दोघींना माझ्याकडून न चुकता हे ऐकून घ्यावं लागतं. खेरीज वर्षभरातही अनेकदा त्याची पुनरावृत्ती प्रसंगोपात होत असते ती न्यारीच.तरी ही फी मोठ्या शहरातील शाळांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे.

पल पल दिल के पास...

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 23/08/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन माझा मित्र चंद्रशेखर महामुनीचे आहे. आधी इ-सकाळवर प्रकाशित झालंय पण त्याच्या परवानगीने इकडे प्रकाशित कर्तेय... पल पल दिल के पास... हर शाम आँखोपर तेरा आँचल लहेराये, हर रात यादों की बारात ले आये मै सॉंस लेता हूँ, तेरी खुशबू आती है इक महका महका सा, पैगाम लाती है मेरे दिलकी धडकन भी, तेरे गीत है पल पल दिल के पास, तुम रहती हो जीवन मिठी प्यास, ये कहती हो... प्रियतमेच्या आठवणींचं, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भासणाऱ्या तिच्या हव्याहव्याशा अस्तित्वाचं इतकं अप्रतिम वर्णन खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं.

काय ? काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी सोमवार, 23/08/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण - भाऊ-बहिणीचा स्नेह,प्रेम व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. कृष्‍णाच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. द्रौपदीने साडी किनार फाडून बांधले होते. तेव्हापासून कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला व आजीवन तिचे रक्षण केले. भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत.चित्तौढगडची राणीने बहादुरशाहपासून रक्षा करण्यासाठी हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. व हुमायूने राणीचे रक्षण केले ! "रक्षाबंधन" या सणात काळानुरूप जरासा बदल झालेला आहे.

अविस्मरणीय

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी सोमवार, 23/08/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१० समीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला ला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती. ५ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरहून परत घरी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे जाण्यास निघालो. नागपूर ते हेमलकसा जवळपास ३५० किलोमीटर अंतर आहे. वाटेत बाबा आमटेंची मुख्य कर्मभूमी आनंदवन लागत. ते नागपूरहून १०० किलोमीटर आहे. १२ वाजता तिथे पोहोचलो. आजीची (साधनाताई आमटे) भेट घेतली.