जुने घर
नुकतेच घर शिफ्ट केले. जुण्या घराच्या काही आठवणी लिहावे म्हणत होतो .. पण काही केल्या लिहिताच येइनात.. कीती आहेत त्या आठवणी .. कधी एक गोष्ट आठवते तर लगेच दुसर्या गोष्टीमुळे मन भावुक होते.. त्यामुळे काही निटसे लिहिताच येत नव्हते. तरीही काही तरी लिहित आहे .. व्यवस्थीत नाहीये जास्त पण मनाच्या हळवेपणामुळे नाही लिहु शकत आहे चांगले ..आणि येथेही विचार करुन नाही ..जसे आठवत आहे तसेच शेअर करावेशे वाटत आहे म्हनुन आपणा समोर देतो आहे
---
मी पहिलीत जावु लागलो तेच आमच्या छोट्याश्या पण मस्त घरातुन .
आई.. मिटलेला श्वास - ६
भाग ५: http://www.misalpav.com/node/15255
पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते
तळ्याकाठी निशब्द
निरव सांजवेळ
नक्षत्रांच्या फेर्यामध्ये
आठवांचा खेळ
सोनेरी क्षणांचा हा
क्षणिक कवडसा
अभिषेक सूर्यास्तास
ओघळणार्या आसवांचा
तरंगीत सुक्ष्म लाट
मनपटलावर विरता
तिमिरात सामावते
अखंड विचारधारा
---------- शब्दमेघ
काव्यरस
ईमोशनल अत्याचार
आज मिपाकर लेखक एकदम पेटले आहेत. कुणी किल्ल्याची तर कुणी विडीची आठवण करून देतय. कुणाला चिंचा आठवल्या तर कुणाला शाळेतल्या गुणपत्रिका. आणि नानांनी मनीमाऊची आठवण करून दिली. एकावेळी असला एक नोस्टाल्जीक लेख व्याकुळ करून जातो आणि आज चक्क जवळ्पास अर्धा डझन लेख वाचून आपल्या आयुष्यात आपण सगळच हरवून बसलो आहे अस वाटायला लागलय! ह्या दर्जेदार लेखनांचा अचानक महापूर येण्याचा कारण काय असेल कोणी सांगेल का? कुठला विशिष्ट पक्ष (पितृ पक्षात असाच पूर्वजांवरील लेखांचा पूर आल्याच आठवतय) वगैरे चालू आहे की काय?
हेलीओस..
माझ्या वाचकांपैकी विमानात खूपदा बसणारे किती असतील माहीत नाही. पण पूर्वीपेक्षा विमान प्रवास आता सहज केला जातो. मला आज तथाकथित साहित्यिक मूल्य नसलेलं काहीतरी लिहिण्याची खूप इच्छा होतेय. म्हणून माझा आवडता विषय विमानाचे अपघात (शुभ बोल ना-या..) घोळवत होतो डोक्यात. त्यात मला काही अपघात असे आठवले की जे खूप विचित्र किंवा वेगळे आहेत.
साउंड्ज इंट्रेस्टिंग..??
सायप्रस देशात हेलीओस एअरवेज नावाची विमान कंपनी होती.
भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था: एक बट्ट्याबोळ
शिक्षणपध्दतीचा विचार करता देशाची साक्षरता आकडेवारीत वाढवण्यावर आपण भर देतो. पण माध्यमिक शाळांतून विद्यार्थांची होणारी गळती ही आपली खरी समस्या आहे. गावात तर ही समस्या अतिशय जास्त आहे. भारतातील साडेसहा लाख खेड्यांमध्ये जवळजवळ सर्वत्र पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सवादोन लाख व मॅट्रीकपर्यंत शिक्षण देणा-या शाळा , तर दीड लाखांहून कमी आहेत. ही सरकारी आकडेवारी झाली . शाळा आहे म्हणजे तेथे शिक्षक,फळा,छत असलेली ईमारत,पटांगण इत्यादी सुविधा आहेत, असा गोड गैरसमज करुन घेणे चुकीचे होईल.
गुजरातच्या प्रगती§
गुजरातच्या प्रगतीची ही बातमी वाचून आनंद झाला
अशी प्रगती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का
तो.पा.सुटल की नाही ?
चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. मी लहान असताना भरपुर चिंचा खायचे. शेताच्या बांधावर जाऊन झाडावर दगड माडून चिंचा पाडायच्या आणि तिथेच झाडाखाली बसुन घरुन पुडीत बांधून आणलेला मिठ मसाला लावुन खायचा हे उद्योग बर्याचदा चालायचे. असे खाउन मन नाही भरायच तेंव्हा त्याच चिंचा घरी नेउन परत त्याची चटनी बनवायची आणि खायची. गोबोळी चिंचा शोधायलाही मजा यायची. चिंच हलवायला खास माणूस यायचा तेंव्हा मग त्या पिकलेल्या चिंचेत एखादी गाबोळी चिंच मिळाली की खुप आनंद व्हायचा.
"और पप्पू पास हो गया...."
हाय मी पियुषा, सदर लेख हि आमची शाळेतील आठवण आहे ,सगळ्यांच्या आयुष्यात लहानपणी शाळेतील असे काही तरी ढासु असतेच
और पप्पू पास हो गया"
शाळेतले दिवस कुणी विसरेल का कधी ?काय दिवस असतात काय धमाल ,नुसते खेळणे,मौजमजा करणे दिवसभर हुंदडणे ,
काही टेन्शन नाही, असते ते फक्त आपल्या आई बाबांना आपले रत्ने चांगल्या मार्कांनी पास तर होतील ना?त्यांची टीर-टीर अभ्यास करा, पण आपल्याला काय आपण बोले तो एकदम बिनधास्त आपले रुटीन चालू !
म्याउ... म्याउ...
म्याउ...म्याउ....
जेवण आटोपुन पडल्यापडल्या दिवाळी अंकाचं वाचन चालु होतं. तिकडे ओबामा दिल्लीतुन पूर्वेकडे गेला असल्याच्या बातम्या चालु होत्या. भारताला काय मिळालं आणि भारतानं काय दिलं यावर काथ्याकुट चालु होता. अजुन दुसर्या चॅनेलवर अशोकराव गेले पृथ्वीराज आले यावर कुठे आनंद कुठे दु:ख यावर खल चालु होता. अजुन एक चॅनेल कुठल्यातरी रिअॅलिटी शोमधल्या लग्नावर घसा खरवडुन चर्चा करत होते. दिवाळी अंकाचं वाचन हाच सर्वोत्तम पर्याय निवडुन इडीयट बॉक्स बंद केला आणि निवांत पाय पसरुन तिरपा होत अक्षरांपासुन बनणार्या शब्दांचे अर्थ लावत वाचन सुरु केले.
मिसळपाव