Skip to main content

चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?

लेखक रोमना यांनी गुरुवार, 09/12/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली महा-गाई (गायीचा चाराही रु. २/- झाला आहे ) एवढि वाढली आहे की जिभेचे चोचले पुरवायचे म्हंटले, तर नाकी नऊ आणि १ कींवा १/२ नोट संपते. त्यातही जर नवीन पदार्थ चाखायला गेलो, तर पैसेवसूल झाले पाहिजेत अशी चव मिळणे कठीण. तेव्हा अशा मोक्याच्या जागांची यादी जर मिळाली तर अन्नदेवता व लक्ष्मीमातेची कृपाच होईल. मी गिरगांव (गिरणगाव नव्हे) येथे रहात असल्याने, आमच्या जवळची खाद्यभ्रमंती म्हणजे जवाहर मेंशनच्या लगतचा विनय (पूर्वीचे टेंभे) मिसळसाठी प्रसिध्द. रु. २८/- कि ३०/-. गोडट चव, मस्त फरसाण (पण हल्ली डिंमांडमुळे पैसे जास्त व सप्लाय म्हणजे क्वांटीटी कमी झालेली दिसते), वडा ठिक (थोडा गोडट) असतो.

मराठी मुद्दा ....

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 09/12/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी माणुस यावरुन बरेच वादळ अधुन मधुन उठत असते. ज्यावेळेस जेव्हा जेव्हा मराठी असा संदर्भ असलेला मुद्दा पुढे येतो तेव्हा तथाकथित विचारवंत त्याला नाके मुरडत हा जागतिकीकरणाविरोधी मुद्दा आहे, अशा प्रकारे कुणीही वागु नये इत्यादी मुद्दे उपस्थित करुन मराठी विरोधात मते मांडत असतात. ब्रिटिश भारतात (विशेषतः महाराष्ट्रात ) येण्यापूर्वी इथे (महाराष्ट्र आणि भारतातला बराचसा भुभाग) हिंदू धर्मियांचे राज्य होते. त्याचे कारण महाप्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज हेच होय याबद्दल तरी कुणाच्या मनात शंका नसावी. ज्यांच्या मनात काही शंका असेल त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा.

जागरण गोंधळ : आई देवी अंबेचा जागर मी करीतो

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 09/12/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर मी करीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो जागर करीतो देवी अंबेचा गोंधळ मी घालीतो ||धृ|| आई तू ग माझी गुणी नउवारी पातळ नेसूनी कपाळी मळवट लाल लेवूनी आई बसली सिंहावरी देवी अंबेमातेला वंदन करीतो वंदन करीतो तुळजाभवानीच्या पायी नमीतो पायी नमीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||१|| सुरू होई अश्विन महिना मनी आनंद काही मावेना नवरात्राच्या ग सोहळी नऊ दिवस आरती ओवाळी नऊ दिवसांचे उपास मी करीतो उपास करीतो सप्तश्रूंगीची मी ओटी भरीतो ओटी भरीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||२|| साडीचोळी खणा

" ने मजसी ने परत मातृ भूमीला " या गीताला १०१ वर्ष पूर्ण

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 09/12/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १० डिसेंबर २०१० स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनार्यावर १० डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या " ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला" या गीताला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन.

एक (सु)विचार

लेखक utkarsh shah यांनी गुरुवार, 09/12/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंगी आकाराने लहान असते, पण ती तुमच्या पार्श्वभागाला चावू शकते पण म्हणून तुम्ही मुंगीच्या पार्श्वभागाला चावू शकता का? नाही ना??? तात्पर्य : - कोणालाही कमी लेखू नका आणि कमी समजू नका.

चोरटा मुरारी - गौळण

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 09/12/2010 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
चोरटा मुरारी - गौळण शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी सांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥ शेला पागोटा काठी हातात अवचित येवुनिया घुसतो घरात खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी बांधा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥ यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी पकडाया जाता, होतो फ़रारी चव हा चाखी, ओठ हा माखी टांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥ व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी कमरेशी बांधा, पायाशी टांगा कोंडा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी...

अमेरीकी उन्मत्तपणा

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 09/12/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय महीला राजदूत मीरा शंकर याना जॅकसन विमानतळावर http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-dow… ही अशी वागणूक देण्यात आली. गोर्‍या लोकांना भारतीय लोकांबद्दल हा असा आकस का असतो? त्यातून राजदूतसुद्धा सुटत नाहीत. त्या ऑफिसरने जणू साडी नेसलेली महिला कधी पाहिलीच नव्हती का? मात्र अमेरीकन अधिकारी हा मस्तवालपणा अरबांसोबत दाखवत नाहीत.

पुन्हा एकदा काश्मिर खोरे...

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 08/12/2010 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मिर हा मुद्दा असा आहे की कोणी कितीही वेळा चर्चा करोत मात्र दरवेळी नव्याने चर्चा कराविशी वाटते. सध्या कारण आहे ते म्हणजे "इंडीया आफ्टर गांधी" हे पुस्तक. यातील "A Valley Bloody and Beautiful' हे प्रकरण नुकतेच वाचले. काश्मिर बद्दल अनेक नव्या गोष्टी कळल्या. त्यातील काहि रोचक तुकड्यांचा स्वैर अनुवाद इथे देतो आहे. --------- राजा हरीसिंग सप्टेंबर १९२५ पासून काश्मिरचा महाराजा होता. त्याचा बराचसा वेळ "मुंबई रेसकोर्स" आणि शिकारीस जात असे. त्याच्या चौथ्या बायकोची तर तक्रार होती की तो 'कधीही लोकांच्या संकटाच्यावेळी त्यांच्यासोबत नसतो - त्यांना भेटत नाही.