Skip to main content

श्रीखंड

लेखक स्मिता. यांनी गुरुवार, 17/03/2011 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
'श्रीखंड' शब्द वाचूनच कसं शांत, शीतल वाटतं ना! बहुतेक मराठी जनतेचा आवडीचा पदार्थ आहे हा. मलासुद्धा श्रीखंड फार आवडते. योगायोगाने मिपावर अजूनपर्यंत कोणी त्याची पाकृ टाकलेली नाही (मला तरी सापडली नाही). त्यामुळे मीच हा विडा उचलला (सोपी पाकृ आहे ना ;)). असंही भारतात आता उन्हाळ्याला सुरुवात होतच आहे... तेव्हा आज बनवूया श्रीखंड! साहित्यः दही - ५०० ग्रॅम बारीक साखर - २ मोठे चमचे जाडसर वेलची पूड - १/४ लहान चमचा दूध - १/४ कप सजावटीसाठी सुका मेवा - बदाम, काजू, पिस्ता यांचे काप, बेदाणे, चारोळी, इ. (आवडीप्रमाणे) मलमलचे किंवा मऊ सूती स्वच्छ कापड कृती: श्रीखंडाची पूर्वतयारी ६ ते ८ तास आधीच करावी लागते.

सांधण दरीला

लेखक VINODBANKHELE यांनी गुरुवार, 17/03/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
सांधण दरीला गुप्चुप जाउन येउन आम्हाला जळवनार्यांचा झाईर णीशेध...................................... मंचर मधुन , नारायण गाव मधुन जाउन सदर ईसमांनी जी फोटोतील मिस़ळ सद्रुश्य वस्तु खाल्ली त्या बद्द्ल पन झाईर णीशेध, त्या वस्तु पेक्शा वरिजनल मिसळ मंचरला विसावा हाटीलात आन नारायण गाव ला मारुतिसुझुकीच्या शोरुम जवळील माउलि हाटीलात पयल्या धार ची भेटतीया. तवा परत जातानी आमास्नी न्हेल नाई तरि तर्री वाली मिसळ आमच्या बरुबर खायाला जरुर खरड लिवा.

गड्या गाव बरा

लेखक मॅक यांनी गुरुवार, 17/03/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती.... त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो ......... बघा आवडले तर......... १) पेरू २) भुईमुग शेंग

मारुती ची नावे

लेखक जय - गणेश यांनी गुरुवार, 17/03/2011 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे. आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे. आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. ...जय - हनुमान.

प्रलय

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 17/03/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय निनादतो शंख कुणाचा डमडमतो डमरू संगे महारुद्राने का उघडला तिसरा नेत्र नि:संगे विखार तो डंख शेषाचा कडकडतो दामिनी संगे सागराने का बुडवला भयभीत मित्र अंतरंगे पसरतो पंख तमाचा घणघणतो मृदुंग संगे कालाग्नी का चेतवला भाजूनी आकाशछत्र दुभंगे ढळतो पंथ पृथ्वीचा धडधडतो उल्काप्रपात संगे हलाहल तो पचवलेला कंठही लालीत आज रंगे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१७/०३/२०११)
काव्यरस

स्वप्नसखी

लेखक अनंत भावे यांनी गुरुवार, 17/03/2011 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी कविता लिहू लागलो,तुला मनात ठेउन भारावून गेलो मी,प्रिये,तुला प्रत्यक्ष पाहुन ते रुप,ते लावण्य कसे मनात साठवावे तुझ्या नशिल्या डोळ्यातून किती मद्य प्यावे तुझ्या मोहक चेहरयात गेलो मी न्हाउन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!१!! तुझी चाल,तुझ्या बोलण्याला तोड नाही गर्व,स्वार्थीपणा याची जरासुध्दा जोड नाही कसा जगू आता मी क्षणभर जरी विसरुन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!२!! माझ्या जीवनातील आता तूच प्रकाश आहे केवळ तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे तुझ्या प्रकाशाने गेले माझे जीवन उजळून भारावून गेलो मी,प्रिये.......................!!३!!

थ्री-डि

लेखक निनाव यांनी गुरुवार, 17/03/2011 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
लांबचे येते दिसून जवळ अधिक आहोत त्यात जणु आपण कधी थ्री डि ची आहे जादु कसली दुरुनच साधता येते जवळीक पहावे उतरुन तिच्यात कधी जाणावे तिचे मन माझ्यासाठी करावे हे रोमांच कधी तरी वापरून चश्मा हा अतरंगी डोळेच का नाही दिले बप्पानं थ्री डी असे वाटते कधी कधी अन कधी वाटते कि बरेच झाले आपले तर आपलेच दुक्ख इतरांचे झाले असते किती थ्री डि असावे फक्त एक चयन विरंगुळा म्हणून कधी तरी कळावे मन इतरांचे मला खरे अन माझे त्यांना कधी तरी थ्री डि असावी एक मानसिकता ज्यात आपण व्हावे कुणाचे कधी कदाचित सापडेल औषध रागाचे राग येताच कुणावर क्षणिक.. तु देखिल घाल बप्पा हा चश्मा कधी तुला देखिल ठाउक नसतील तुच बनविल्या ह्य

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.

माझा महाराष्ट्र

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी बुधवार, 16/03/2011 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
aapla maharashtra १)आता कोठे राहीली सच्चाइ अन ईमानदारी नोकरी साठी हिडंतोय मी दारोदारी, डोके घालायला घर अन दोन वेळेची भाकरी, झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन फॉर्म विक्रेत्या पुढे लाचारी, याच्याच साठी करावी लागते का ही नोकरी? २)म्यानेतुन तलवार काढल्यावर तीला चटक लागते रक्ताची, नेत्यांनाही निवडनुकीनंतर भुक लागते सत्तेची, रक्ताचाच अभिषेक द्यावा लागतो तलवारीच्या पातीला, अन मग विकतात हेच नेते महाराष्ट्राच्या मातीला.