Skip to main content

माहेरचा अहेर!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 14/02/2013 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. नुकतेच ह्या इटलीच्या एका हेलिकॉप्टर कंपनीने भारताला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वापराकरता डझनभर हेलिकॉप्टरे अफाट भावात विकली. त्यात मोठी लाचखोरी झाली अशा आरोपाखाली इटलीच्या सरकारने त्या कंपनीच्या प्रमुखाला अटक केली. ते झाल्यावर आपले धुतल्या तांदळासारखे स्वच्छ संरक्षण मंत्री व बाकी उच्चपदस्थ खडबडून जागे झाले. आता ते ह्या प्रकरणाची "सखोल" चौकशी करणार म्हणत आहेत. नेहमीच्या स्वच्छ परंपरेनुसार इथेही काळ्या पैशाचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत.

प्रेमात धड-पडायचंय

लेखक यसवायजी यांनी गुरुवार, 14/02/2013 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
frendz & girlfrindz of MipA.,हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे.. love भाईलोग्ज, वैसे अपुन जैसे टपोरिकु क्या मालुम, के प्रेम कशाबरोबर खातात ते? पण आपल्याला ट्राय मारायचाय राव एकदा.., 'ते' लै भारी असतय म्हणं..

अरुंधती रॉय वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा काय?

लेखक बाळकराम यांनी गुरुवार, 14/02/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
भारताविरुद्ध सतत गरळ ओकणार्‍या अरुंधती रॉयनी ही मात्र कमालच केलीये. ह्या नतद्रष्ट बाईला देशद्रोहाच्या, किमान राज्यद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी इतका गंभीर आणि खळबळजनक गुन्हा तीने केला आहे. तुम्हाला काय वाटतं? संतप्त- बाळकराम

ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

लेखक बॅटमॅन यांनी गुरुवार, 14/02/2013 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रोजन युद्ध पहिला भाग. ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :) इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका: अखेरीस ८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रीक आरमारी ताफा ट्रॉयला जाण्यासाठी सज्ज झाला. ट्रॉयला येऊन ९ वर्षेही उलटून गेली.

कागा रे कागा रे

लेखक प्रशु यांनी बुधवार, 13/02/2013 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
मरणसन्न अवस्थेत 'ती' पडलीय, पतीसह सासरच्या मंडळीनी तीचा त्याग केलाय. का? असा काय गुन्हा केलाय तिने तर तीने प्रेम केलय ते सुद्धा पाटलाच्या पोरावर!!! आणी साधसुधा नाहि हा लोकविलक्षण प्रेम केलय. पण तो तीचा प्रेमी सुद्धा आज तिच्यापाशी नाही.

ती रात्र !

लेखक चाफा यांनी बुधवार, 13/02/2013 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
टप्प SSSSS. गालावर पडलेला पाण्याचा थेंब निल्याला दचकवायला पुरेसा होता. अं SS हं, घाबरल्यामुळे दचकला नव्हता तो, काहीतरी अनपेक्षित घडल्यावर होणारी ती एक सहज प्रतिक्रिया होती. नकळत त्याच्या तोंडून एक शिवी निघाली, ही सुद्धा एक सहज प्रतिक्रियाच. मुळात या असल्या वातावरणात एकट्याने एकच चाक असलेल्या बाइकची सोबत करत बसल्यावर कुणीही वैतागेलच. त्यात पंक्चर काढून आणायला गेलेला राक्या अजून परतला नव्हता. " साला, काय सगळे पंक्चर काढणारे आज संपावर गेले काय?" मनातल्या मनात बडबडून कंटाळलेला निल्या आता उघड संताप व्यक्त करत होता.

प्रश्न प्रश्न प्रश्न

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 13/02/2013 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी हल्ली मला अनेक प्रश्न पडत आहेत. (वय झाल्याचा परिणाम, नुसतेच प्रश्न पडतात उत्तरे मिळत नाहीत) तर अगदी लहानपणापासून कृष्णाने नरकासुराला, रामाने रावणाला मारल्याचा आनंद मी साजरा केला आहे. कॄष्णाने कंसाला, भीमाने जरासंधाला मारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र हल्लीच असे करणे हे पातक असल्याचे जागतिक स्तरावर मानले जाते असे समजते. मला आता मोठे प्रश्न पडलेले आहेत. १)असा आनंद साजरा करणे हे योग्य की अयोग्य? २) योग्य असेल तर आनंद कसा साजरा करावा? ३) अयोग्य असेल तर त्याचे कारण काय? ४) १९ व्या शतकाने देवाचा मृत्यु पाहिला तर २० व्या शतकाने माणुसकीचा.

पाणी पुरी

लेखक स्मिता चौगुले यांनी बुधवार, 13/02/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पुरी अ) या आधीच्या पाकृमध्ये मी गोड चटणीची(खजूराची चटणी)कृती दिली आहे आता पुढील भाग ब)पाणी - पुऱीचे तिखट पाणी साहित्य: - १) १ कप पुदिना २) १/२ कप कोथिंबिर ३) १ इंच आले ४) ४-५ हिरव्या मिरच्या ५)चिंच ( आंबट चवीच्या आवडी प्रमाणे कमी -जास्त टाकू शकता) - मी साधारण १/४ कप टाकते -नॉर्मल चवीसाठी ६) जिरे पावडर १ चमचा ७) साधे मीठ / काळे मीठ चवीप्रमाणे (दोन्ही अर्धे-अर्धे टाकू शकता ) कृती:- १) चिंच जवळपास ४०-४५ minutes पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे चिंचेचा कोळ चांगला निघेल २) चिंचेचा कोळ काढून त्यात उरलेले सर्व साहित्य टाकून मिकसर मधून एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्या (साधे मीठ आणि

उत्क्रांती- मोबाईलची.

लेखक नानबा यांनी बुधवार, 13/02/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आपल्या आयुष्यात अंतर्बाह्य बदल होतायत. इतके, की बहुतेक येत्या काही वर्षांमध्ये प्राथमिक शालेय पुस्तकांमधलं "अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत" हे विधान "अन्न, वस्त्र, निवारा या डिफॉल्ट गरजांसोबत काँप्युटर, हायस्पीड इंटरनेट आणि स्मार्ट्फोन या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत." असं बदललेलं दिसेल. या स्मार्टफोन्सच्या जगात वावरताना परवाच एका इसमाच्या हातात एक अत्यंत जुना, काळ्या रंगाचा, अँटेना असलेला वॉकीटॉकी सदृश्य मोबाईल फोन दिसला, आणि सहज डोक्यात आलं, या प्राण्याची (मोबाईलची) जन्मकथा काय असेल बरं?